शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

नंदुरबार जिल्ह्याच्या दृष्टीने यंदाचा उन्हाळा तापदायक राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST

भारतीय हवामान विभागाने यंदाचा उन्हाळी हंगाम मार्चपासून मे महिन्यापर्यंत तापमान कसं राहील, याच्या अंदाजाचा वेध घेणारं एक पत्रक नुकतंच ...

भारतीय हवामान विभागाने यंदाचा उन्हाळी हंगाम मार्चपासून मे महिन्यापर्यंत तापमान कसं राहील, याच्या अंदाजाचा वेध घेणारं एक पत्रक नुकतंच प्रसिद्ध केलं. देशातील दक्षिणेकडची काही राज्य वगळता यंदा उन्हाच्या झळा अपेक्षेपेक्षा जास्तच तीव्र असतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये यंदा उत्तर, ईशान्य, वायव्य भारत आणि पूर्वेकडच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक कमाल तापमान तर हिमालयाच्या पायथ्याशी असलेले प्रदेश, ईशान्य आणि दक्षिणेकडच्या काही राज्यांमध्ये या कालावधीतलं किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यंदा ओडिशा, छत्तीसगडसह महाराष्ट्रातल्या कोकण विभागाला यंदा तीव्र उन्हाळ्याचा इशारा देण्यात आला आहे.

तापमानाचा अंदाज जास्त वर्तवल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकास, फळबागांना केळी, पपई, भाजीपाला पिकांना गरजेनुसार योग्य अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. जेणेकरून पिकांना उष्माचा ताण बसणार नाही आणि जमिनीचे तापमान नियंत्रित राहील. कमी पाणी लागणाऱ्या पिकांची आणि कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड करावी, आंतरमशागतीची कामे वेळेवर करावीत, तण व्यवस्थापन करावे, पिकात प्लास्टिक आच्छादनाचा वापर करावा, जेणेकरून मातीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन ओलावा जास्त वेळ टिकून राहील, अशी माहिती कृषी हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी दिली.

हवामानात होणारे बदल तसेच दर मंगळवारी आणि शुक्रवारी विस्तृत हवामान अंदाज आणि कृषी सल्ला जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांच्याकडून whatsapp व इतर माध्यमातून देण्यात येतो, तो मिळवण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ८२७५००९६५९/८८०५५११४८८ या नंबरवर व्हॅाट्‌स ॲपवर मेसेज करावा, तसेच जिल्ह्याचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला पाहण्यासाठी मोबाइलच्या प्ले स्टोरमधून “मेघदूत” ॲप डाऊनलोड करावे, अशी माहिती डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबारचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांनी दिली.