शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

ऐच्छिक असतानाही कर्जातून कापली गेली विम्याची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 13:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पीक विम्याचा परतावा मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कर्जातून कापल्या जाणाºया विमा पद्धतीवर नाराजी व्यक्त केली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पीक विम्याचा परतावा मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कर्जातून कापल्या जाणाºया विमा पद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती़ यातून यंदा कर्ज घेताना पिक विमा ऐच्छिक करण्यात आला होता़ परंतू यानंतरही असंख्य शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून विम्याची रक्कम कापली गेली असून हे कसे, झाले हा विचार करुन आता शेतकरी हैराण झाले आहेत़जिल्ह्यात दरवर्षी खरीप पिकांची लागवड करणाºया शेतकºयांपैकी ४० टक्के शेतकरी पिक कर्ज घेतात़ जिल्हा बँकेमार्फत सोसायटी, प्रत्यक्ष बँक शाखांसह राष्ट्रीयकृत बँकांकडून हे कर्ज घेण्यात येते़ यंदा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सर्व बँकांनी १०० टक्के कर्ज पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले होते़ परंतु अद्याप बँकांचे कामकाज रेंगाळल्याचे चित्र आहे़ महात्मा ज्योतिबा फुले कृषी कर्जमुक्ती योजनेतून १३ हजार शेतकºयांना कर्जमाफी देण्यात आली आहे़ परंतू यातील बहुतांश शेतकरी पिक कर्जापासून वंचित आहेत़ एकीकडे हे शेतकरी कर्जापासून वंचित असताना दुसरीकडे कर्ज देणाºया बँकांनी शेतकºयांच्या कर्जातून विम्याची रक्कम कापून घेत कर्ज दिल्याचे प्रकार समोर आले आहेत़ या प्रकारात शेतकºयांची चूक दर्शवत बँकांनी हात वर केले आहेत़ शेतकºयांनी कर्ज घेताना बँकांकडे भरलेल्या अर्जात विमा घ्यावी किंवा नाही, अशा खूणा करावयाच्या होत्या़ यातून बºयाच बँकांचे कर्जाचे अर्ज हे अत्यंत किचकट आणि इंग्रजाळलेले असल्याने शेतकºयांनी हा कॉलम सोडून दिला होता़ मात्र चाणाक्ष बँकांनी होकार असो किंवा नसो शेतकºयांचा विमा कापून कर्जाची रक्कम दिली आहे़ असे असले तरी ३१ जुलै रोजी पूर्ण झालेल्या पिक विम्याच्या मुदतीत जिल्ह्यातील साडेचार हजारापेक्षा अधिक शेतकºयांनी विमा केलेला नसल्याची माहिती आहे़ यातून कर्ज वाटपात बँका उघड्या पडत असल्याचे समोर आले आहे़ जिल्हा बँकेने शेतकºयांना वाटप केलेले कर्ज हे १० ते ३० हजाराच्या घरात आहे़ यातही बºयाच शेतकºयांचा विमा कापला गेला असल्याने त्यांना तुरळक रक्कम भेटली आहे़

शासनाकडून यंदा प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै देण्यात आली होती़ हा विमा ऐच्छिक करण्यात आल्याचे आधीच घोषित होते़ परंतू शेतकऱ्यांनी अर्जावर हवे किंवा नाही अशी खूण न केल्यास सरसकट विमा रक्कम कापून घेण्याचे आदेश काढण्यात आले होते़ यात आदेशांचे बँकांनी तंतोतंत पालन केले आहे़जिल्ह्यातील साडेचार हजार शेतकऱ्यांनी यंदा विमा केल्याची माहिती देण्यात आली आहे़ यातही हे शेतकरी जिल्हा बँकेचे सभासद असल्याचे सांगण्यात आले आहे़ राष्ट्रीयकृत बँकेत विम्यात सहभागी होण्यासाठी सीएससी सेंटरवर जावून अर्ज करणे बंधनकारक होते़ सीएससी सेंटर्सची जिल्ह्यातील आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही़ ही आकडेवारी १५ आॅगस्टसमोर येणार आहे़ यात दीड हजार शेतकºयांचा समावेश होवून पिक विम्याची आकडेवारी ही सहा हजारापर्यंत जाण्याची चिन्हे आहेत़बºयाच शेतकºयांच्या खात्यातून ३१ जुलै नंतर रक्कम कापली गेल्याचे संदेश येऊ लागल्यानंतर या प्रकाराचा ग्रामीण भागात उलगडा झाला आहे़ सोमवारी बºयाच शेतकºयांनी बँकांना संपर्क केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे़ शासनाच्या निर्र्देशानुसार ही रक्कम कापली गेली असल्याचे बँकांच्या प्रशासनाकडून शेतकºयांना सांगण्यात आले आहे़