शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

ऐच्छिक असतानाही कर्जातून कापली गेली विम्याची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 13:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पीक विम्याचा परतावा मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कर्जातून कापल्या जाणाºया विमा पद्धतीवर नाराजी व्यक्त केली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पीक विम्याचा परतावा मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कर्जातून कापल्या जाणाºया विमा पद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती़ यातून यंदा कर्ज घेताना पिक विमा ऐच्छिक करण्यात आला होता़ परंतू यानंतरही असंख्य शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून विम्याची रक्कम कापली गेली असून हे कसे, झाले हा विचार करुन आता शेतकरी हैराण झाले आहेत़जिल्ह्यात दरवर्षी खरीप पिकांची लागवड करणाºया शेतकºयांपैकी ४० टक्के शेतकरी पिक कर्ज घेतात़ जिल्हा बँकेमार्फत सोसायटी, प्रत्यक्ष बँक शाखांसह राष्ट्रीयकृत बँकांकडून हे कर्ज घेण्यात येते़ यंदा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सर्व बँकांनी १०० टक्के कर्ज पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले होते़ परंतु अद्याप बँकांचे कामकाज रेंगाळल्याचे चित्र आहे़ महात्मा ज्योतिबा फुले कृषी कर्जमुक्ती योजनेतून १३ हजार शेतकºयांना कर्जमाफी देण्यात आली आहे़ परंतू यातील बहुतांश शेतकरी पिक कर्जापासून वंचित आहेत़ एकीकडे हे शेतकरी कर्जापासून वंचित असताना दुसरीकडे कर्ज देणाºया बँकांनी शेतकºयांच्या कर्जातून विम्याची रक्कम कापून घेत कर्ज दिल्याचे प्रकार समोर आले आहेत़ या प्रकारात शेतकºयांची चूक दर्शवत बँकांनी हात वर केले आहेत़ शेतकºयांनी कर्ज घेताना बँकांकडे भरलेल्या अर्जात विमा घ्यावी किंवा नाही, अशा खूणा करावयाच्या होत्या़ यातून बºयाच बँकांचे कर्जाचे अर्ज हे अत्यंत किचकट आणि इंग्रजाळलेले असल्याने शेतकºयांनी हा कॉलम सोडून दिला होता़ मात्र चाणाक्ष बँकांनी होकार असो किंवा नसो शेतकºयांचा विमा कापून कर्जाची रक्कम दिली आहे़ असे असले तरी ३१ जुलै रोजी पूर्ण झालेल्या पिक विम्याच्या मुदतीत जिल्ह्यातील साडेचार हजारापेक्षा अधिक शेतकºयांनी विमा केलेला नसल्याची माहिती आहे़ यातून कर्ज वाटपात बँका उघड्या पडत असल्याचे समोर आले आहे़ जिल्हा बँकेने शेतकºयांना वाटप केलेले कर्ज हे १० ते ३० हजाराच्या घरात आहे़ यातही बºयाच शेतकºयांचा विमा कापला गेला असल्याने त्यांना तुरळक रक्कम भेटली आहे़

शासनाकडून यंदा प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै देण्यात आली होती़ हा विमा ऐच्छिक करण्यात आल्याचे आधीच घोषित होते़ परंतू शेतकऱ्यांनी अर्जावर हवे किंवा नाही अशी खूण न केल्यास सरसकट विमा रक्कम कापून घेण्याचे आदेश काढण्यात आले होते़ यात आदेशांचे बँकांनी तंतोतंत पालन केले आहे़जिल्ह्यातील साडेचार हजार शेतकऱ्यांनी यंदा विमा केल्याची माहिती देण्यात आली आहे़ यातही हे शेतकरी जिल्हा बँकेचे सभासद असल्याचे सांगण्यात आले आहे़ राष्ट्रीयकृत बँकेत विम्यात सहभागी होण्यासाठी सीएससी सेंटरवर जावून अर्ज करणे बंधनकारक होते़ सीएससी सेंटर्सची जिल्ह्यातील आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही़ ही आकडेवारी १५ आॅगस्टसमोर येणार आहे़ यात दीड हजार शेतकºयांचा समावेश होवून पिक विम्याची आकडेवारी ही सहा हजारापर्यंत जाण्याची चिन्हे आहेत़बºयाच शेतकºयांच्या खात्यातून ३१ जुलै नंतर रक्कम कापली गेल्याचे संदेश येऊ लागल्यानंतर या प्रकाराचा ग्रामीण भागात उलगडा झाला आहे़ सोमवारी बºयाच शेतकºयांनी बँकांना संपर्क केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे़ शासनाच्या निर्र्देशानुसार ही रक्कम कापली गेली असल्याचे बँकांच्या प्रशासनाकडून शेतकºयांना सांगण्यात आले आहे़