शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

काँग्रेस-शिवसेना युतीचा ‘नंदुरबार पॅटर्न’ला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 16:27 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्याच्या सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना युतीचे पक्षीय राजकारण ‘सख्खे भाऊ-पक्के वैरी’ असे असताना विचारांनी वेगळे असलेले काँग्रेस आणि शिवसेना यांची नंदुरबार पालिकेतील युती हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे ही युती एकत्र लढली आणि यशस्वीही झाल्याने त्याची चर्चा राज्यात सर्वदूर पसरली आहे.नंदुरबार पालिका ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्याच्या सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना युतीचे पक्षीय राजकारण ‘सख्खे भाऊ-पक्के वैरी’ असे असताना विचारांनी वेगळे असलेले काँग्रेस आणि शिवसेना यांची नंदुरबार पालिकेतील युती हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे ही युती एकत्र लढली आणि यशस्वीही झाल्याने त्याची चर्चा राज्यात सर्वदूर पसरली आहे.नंदुरबार पालिका निवडणुकीत मागील पंचवार्षिक काळात काँग्रेससोबत असलेला ‘चौधरी गट’ काँग्रेसपासून विभक्त झाला आणि भाजपमध्ये गेला. त्यामुळे चौधरी गट आणि डॉ.विजयकुमार गावीत एकत्र आल्यामुळे भाजपची शक्ती वाढली होती. अशा स्थितीत नंदुरबार पालिका निवडणुकीत धोका होऊ नये यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी राजकारणाचे नवे डावपेच खेळले. भाजपपासून नाराज असलेला शिवसेनेचा गट त्यांनी जोडला. शिवसेनेचे शहरात फारसे प्रभाव नाही याची जाणीव असतानाही त्यांनी अनेक संभाव्य धोक्यांचा विचार करून ही चतुराई केली. विशेषत: गेल्यावर्षी झालेल्या शहादा पालिकेच्या निवडणुकीतील पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्यांनी या गटाला जोडले. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांना काँग्रेससोबत घेऊन निवडणूक लढवली. त्यात एकूण 39 जागांपैकी पाच जागा शिवसेनेला दिल्या व 34 जागांवर काँग्रेसचे उमेदवार दिले. अर्थात या युतीला शिवसेनेच्या राज्यस्तरीय नेत्यांचा सुरुवातीला अधिकृत दुजोरा नव्हता. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हा प्रमुखांवर सोडून पक्षाने अधिकृत जबाबदारी टाळली होती. परंतु युती झाल्यानंतर निवडणुकीच्या प्रचार काळात जसा या युतीला लोकांचा पाठींबा मिळाला तसा नेत्यांनीही त्याला मान्यता दिली. राज्यमंत्री दादासाहेब भुसे व संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी स्वत: शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या प्रभागात सभाही घेतली.नंदुरबार शहरात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा वैयक्तिक प्रभाव व संपर्क दांडगा आहे. संपूर्ण निवडणुकीचा प्रचार हा त्यांच्याभोवतीच केंद्रीत राहिला आणि त्याच बळावर त्यांनी यशही मिळविले. या निवडणुकीत नगरसेवकपदाच्या 39 जागांपैकी 28 जागांवर काँग्रेस-शिवसेना युतीचा विजयी झाल्या. त्यात काँग्रेसचे 34 पैकी 24 तर शिवसेनेचे पाचपैकी चार जागा आल्या. काँग्रेसच्या यशापेक्षा शिवसेनेला ज्या चार जागा मिळाल्या त्याची चर्चा राजकारणात अधिक होत आहे. शिवसेनेचा वैयक्तिक प्रभाव की काँग्रेसच्या प्रभावाचा फायदा याबाबतही चर्चा रंगत आहे.अर्थात चर्चा काहीही असली तरी काँग्रेस आणि शिवसेना युतीचा ‘नंदुरबार पॅटर्न’ हा राज्याच्या राजकारणात चर्चेचा ठरला आहे.