शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

काँग्रेस-शिवसेना युतीचा ‘नंदुरबार पॅटर्न’ला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 16:27 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्याच्या सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना युतीचे पक्षीय राजकारण ‘सख्खे भाऊ-पक्के वैरी’ असे असताना विचारांनी वेगळे असलेले काँग्रेस आणि शिवसेना यांची नंदुरबार पालिकेतील युती हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे ही युती एकत्र लढली आणि यशस्वीही झाल्याने त्याची चर्चा राज्यात सर्वदूर पसरली आहे.नंदुरबार पालिका ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्याच्या सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना युतीचे पक्षीय राजकारण ‘सख्खे भाऊ-पक्के वैरी’ असे असताना विचारांनी वेगळे असलेले काँग्रेस आणि शिवसेना यांची नंदुरबार पालिकेतील युती हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे ही युती एकत्र लढली आणि यशस्वीही झाल्याने त्याची चर्चा राज्यात सर्वदूर पसरली आहे.नंदुरबार पालिका निवडणुकीत मागील पंचवार्षिक काळात काँग्रेससोबत असलेला ‘चौधरी गट’ काँग्रेसपासून विभक्त झाला आणि भाजपमध्ये गेला. त्यामुळे चौधरी गट आणि डॉ.विजयकुमार गावीत एकत्र आल्यामुळे भाजपची शक्ती वाढली होती. अशा स्थितीत नंदुरबार पालिका निवडणुकीत धोका होऊ नये यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी राजकारणाचे नवे डावपेच खेळले. भाजपपासून नाराज असलेला शिवसेनेचा गट त्यांनी जोडला. शिवसेनेचे शहरात फारसे प्रभाव नाही याची जाणीव असतानाही त्यांनी अनेक संभाव्य धोक्यांचा विचार करून ही चतुराई केली. विशेषत: गेल्यावर्षी झालेल्या शहादा पालिकेच्या निवडणुकीतील पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्यांनी या गटाला जोडले. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांना काँग्रेससोबत घेऊन निवडणूक लढवली. त्यात एकूण 39 जागांपैकी पाच जागा शिवसेनेला दिल्या व 34 जागांवर काँग्रेसचे उमेदवार दिले. अर्थात या युतीला शिवसेनेच्या राज्यस्तरीय नेत्यांचा सुरुवातीला अधिकृत दुजोरा नव्हता. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हा प्रमुखांवर सोडून पक्षाने अधिकृत जबाबदारी टाळली होती. परंतु युती झाल्यानंतर निवडणुकीच्या प्रचार काळात जसा या युतीला लोकांचा पाठींबा मिळाला तसा नेत्यांनीही त्याला मान्यता दिली. राज्यमंत्री दादासाहेब भुसे व संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी स्वत: शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या प्रभागात सभाही घेतली.नंदुरबार शहरात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा वैयक्तिक प्रभाव व संपर्क दांडगा आहे. संपूर्ण निवडणुकीचा प्रचार हा त्यांच्याभोवतीच केंद्रीत राहिला आणि त्याच बळावर त्यांनी यशही मिळविले. या निवडणुकीत नगरसेवकपदाच्या 39 जागांपैकी 28 जागांवर काँग्रेस-शिवसेना युतीचा विजयी झाल्या. त्यात काँग्रेसचे 34 पैकी 24 तर शिवसेनेचे पाचपैकी चार जागा आल्या. काँग्रेसच्या यशापेक्षा शिवसेनेला ज्या चार जागा मिळाल्या त्याची चर्चा राजकारणात अधिक होत आहे. शिवसेनेचा वैयक्तिक प्रभाव की काँग्रेसच्या प्रभावाचा फायदा याबाबतही चर्चा रंगत आहे.अर्थात चर्चा काहीही असली तरी काँग्रेस आणि शिवसेना युतीचा ‘नंदुरबार पॅटर्न’ हा राज्याच्या राजकारणात चर्चेचा ठरला आहे.