शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

वृक्षसंवर्धन प्रतिष्ठानतर्फे अभ्यास दौरा व वृक्षसंवर्धन अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:23 IST

या अभ्यास दौऱ्यात वृक्षांची लागवड कशी करावी, कोणते वृक्ष लावणे आवश्यक आहे, त्यांची वाढ कशी करावी, पाण्याचे नियोजन कसे ...

या अभ्यास दौऱ्यात वृक्षांची लागवड कशी करावी, कोणते वृक्ष लावणे आवश्यक आहे, त्यांची वाढ कशी करावी, पाण्याचे नियोजन कसे केले आहे. वृक्षसंवर्धनासाठी नि:स्वार्थ व कशाप्रकारे मेहनत घेतली व केली जात आहे आदी गोष्टींचा अभ्यास करण्यात आला. अमळनेर येथील टेकडी ग्रुपशी येथील प्रतिष्ठानतर्फे प्रदीप पाटील, ज्ञानी कुलकर्णी, अनिल पाटील, अंशुमन पाटील, सतीश सोनवणे, माधव पाटील यांनी चर्चा केली. वृक्षसंवर्धनासाठी काय केले पाहिजे याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी प्रतिष्ठानच्या प्रतिनिधींमार्फत वृक्षारोपणही करण्यात आले. प्रतिष्ठानतर्फे ज्ञानी कुलकर्णी यांनी टेकडी ग्रुपचे आभार मानले. त्याचप्रमाणे अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर परिसरात झालेले वृक्षारोपण व दोंडाईचा येथील हस्ती स्कूलच्या परिसरातील टेकडीवरचे वृक्षारोपण व जलनियोजन कसे केले आहे याचीही पाहणी केली. शहाद्याजवळील हनुमान टेकडी (अनरदबारी) याठिकाणीही वृक्षसंवर्धन प्रतिष्ठानतर्फे टेकडी हिरवीगार करण्याचा संकल्प केला असून, तसे अभियान याच पावसाळ्यापासून सुरू करणार आहेत. यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या अभ्यास दौऱ्यात प्रदीप पाटील, प्रा.ज्ञानी कुलकर्णी, अनिल पाटील, अंशुमन पाटील, माधव पाटील, के.के. सोनार, गुलाल पाटील, नवल वाघ, राजेंद्र माळी, विलास पाटील, भूषण बाविस्कर, गुणवंत पाटील, मनोज पाटील, जगन पाटील, किशोर पाटील, आर.टी. पटेल, नरेंद्र पाटील, शरद पाटील आदी वृक्षमित्रांनी अभ्यास दौऱ्यात सहभाग घेतला.