शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

उघडय़ा रोहित्रामुळे विद्यार्थी असुरक्षित : कोठार आश्रमशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 11:56 IST

महावितरण अभियंत्यांना निवेदन

कोठार : तळोदा तालुक्यातील कोठार येथील अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या जवळ असणारी विद्युत रोहित्र विद्याथ्र्यासाठी धोकादायक ठरत आहे. रोहित्राचे इतरत्र स्थलांतर करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून शाळा व्यवस्थापनाकडून होत आहे.सातपुडय़ाच्या पायथ्याशी असणा:या तळोदा तालुक्यातील कोठार येथे मागील 25 वर्षापासून अनुदानित आश्रमशाळा सुरु आहे. या शाळेत सुमारे आठशे विद्यार्थी निवासी स्वरूपात शिक्षण घेतात. गावात सुरुवातीलाच मुख्य रस्त्यालगत ही आश्रमशाळा आहे. गावाला वीज पुरवठा करण्यासाठी गावात प्रवेश करणा:या मुख्य रस्त्याच्या लगतच विद्युत वितरण कंपनीकडून रोहित्र अर्थात डीपी बसविण्यात आली आहे.परंतु ज्या ठिकाणी हे विद्युत रोहित्र बसविण्यात आले आहे ती जागा गैरसोयीची आह़े आश्रमशाळेचे विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच जनावरांसाठीदेखील धोकेदायक ठरणारी आहे. या रोहित्रामध्ये व शाळेच्या आवारात केवळ एक संरक्षक भिंतीचे अंतर आहे. या भिंतीला लागूनच विद्याथ्र्याची पाणी व कपडे धुण्याची सोय आहे. गावात प्रवेश करणा:या मुख्य रस्त्याला लगत हे विद्युत रोहित्र आहे.या रस्त्यावर व रोहित्राच्या परिसरात दिवसभर विद्यार्थी, ग्रामस्थ, वाहने व शेतशिवारात विविध कामानिमित्त ये-जा करणा:या जनावरांची वर्दळ असते. ह्या विद्युत रोहित्रावरील फ्यूजपेटीचा दरवाजा अनेकदा उघडा असण्याचे दिसून आले आहे. कळत-नकळत रस्त्यावरून जाणा:या व्यक्ती किंवा प्राण्याचा स्पर्श झाला तर अनुचित प्रकार घडू शकतो. शिवाय गावात प्रवेश करणारा रस्ता हा चढावावरील असल्याने या रस्त्यावरून गावात जाणारी दुचाकी व चारचाकी वाहने ही वेगात चढत असतात.अश्या परिस्थिती वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन थेट रोहित्रावर देखील आदळून मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे हे रोहित्र गावातील मोकळ्या जागेत किंवा इतरत्र स्थलांतर करावे अशी मागणी मागील दोन वर्षापासून शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे.परंतु याकडे वीज वितरण कंपनीच्या अधिका:यांचे दुर्लक्ष होत आह़े सलसाडी ता.तळोदा येथे वीजेचा धक्का लावून विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना शाळा व्यवस्थापनाकडून हे विद्युत रोहित्र इतरत्र स्थलांतरित करण्यात यावे, अश्या मागणीचे पत्र बोरद व तळोदा अश्या दोन्ही कार्यालयातील वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना देण्यात आले आहे. भविष्यात कोणत्याची प्रकारची अप्रिय घटना घडू नये यासाठी वीज वितरण कंपनीने याकडे कानाडोळा न करता तात्काळ आश्रमशाळेलगत असणारे हे विद्युत रोहित्र स्थलांतरित करण्यासाठी योग्य कार्यवाही करणे अपेक्षित आहे.