शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

तब्बल ५४ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली भरारी पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बारावीची १८ फेब्रुवारी तर दहावीची ३ मार्चपासून सुरू होणाºया बोर्डाच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ५४ अधिकाऱ्यांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बारावीची १८ फेब्रुवारी तर दहावीची ३ मार्चपासून सुरू होणाºया बोर्डाच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ५४ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली भरारी पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक पोलीस अधिकारी, तीन पोलीस व दोन होमगार्ड असा बंदोबस्त राहणार आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होईल यादृष्टीने नियोजन करण्याच्या सुचना जिल्हाधिकाºयांनी बैठकीत दिल्या.दहावी व बारावीच्या परीक्षांना लवकरच सुरुवात होणार आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हाव्या यासाठी जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. कॉपी रोखण्यासाठी तब्बल ५४ अधिकाºयांचा समावेश असलेली विविध भरारी पथके नेमण्यात आली आहेत. यासंदर्भात नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी नुकतीच बैठक घेवून आवश्यक त्या सुचना दिल्या. जिल्ह्यात दहावी व बारावी मिळून एकुण ७० परीक्षा केंद्र राहणार आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर तालुक्यतील अधिकारी यांना नियुक्ती देतांना त्यांचा तालुका बदल करण्यात यावा. भरारी पथकांमध्ये जिल्हाधिकारी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, माध्यमिक व प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिका यांचे भरारी पथक असावे तसेच एक महिला भरारी पथक देखील कार्यान्वीत राहणार आहे.केंद्रसंचालकांनी आपल्या केंद्रावरील उपकेंद्र संचालक, सहायक केंद्र संचालक, बिल्डींग कंडक्टर, पर्यवेक्षक, परीक्षार्थी यांच्याजवळ मोबाईल व तत्सम उपकरणे राहणार नाहीत याची काळजी घेतली जाणार आहे.प्रश्नपत्रिका वेळेत पोहचतील आणि त्या फुटणार नाहीत यासाठी वेगळी यंत्रणा कार्यान्वीत राहणार असून त्याचे नियोजन करण्यात येणार आहे. सर्वच केंद्रावर पुर्णवेळ बैठे पथक देखील कार्यान्वीत राहणार आहे. परीक्षा केंद्राच्या १०० मिटरच्या आत पालकांना येण्यास बंदी करणार असून तशा सुचना त्या ठिकाणी नियुक्त पोलीस कर्मचारी देण्यात येणार आहे. प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी अचानक कुठल्याही परीक्षा केंद्रावर भेटी देणार आहेत. उपद्रवी केंद्रांवर तसेच इतर आवश्यक त्या केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यासाठी सुचना देण्यात आल्या आहेत.जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम यांनी परीक्षेच्या तयारीचा आढावा सादर केला. यावेळी सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.४तालुकाअंतर्गत परीक्षा केंद्राचे पर्यवेक्षक अथवा दोन केंद्रात अदलाबदल करून नियोजन करण्यात येणार आहे. या पद्धतीला शिक्षकांनी सुरुवातीला विरोध केला, परंतु प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहिले. तालुका बदल करण्यासंदर्भात मात्र यंदा निर्णय झालेला नाही.