शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
4
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
5
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
7
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
8
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
10
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
11
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
12
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
13
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
14
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
15
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
16
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
18
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
19
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
20
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?

शहाद्यात नागरिकांकडून ‘सोशल डिस्टन्सिंग’ला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असले तरी अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी संचारबंदीच्या कालावधीत देण्यात येणाऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असले तरी अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी संचारबंदीच्या कालावधीत देण्यात येणाऱ्या शिथिलतेचा काही नागरिकांकडून गैरफायदा घेतला जात असून यामुळे सोशल डिस्टन्स पाळण्याच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. दरम्यान, मंगळवारी प्रेस मारुती मैदानावर भाजीपाला विक्रेत्यांसाठी जागेची आखणी करून विक्रेते व ग्राहकांनी नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.शहरात सकाळी आठ ते दुपारी बारा या कालावधीत अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रशासनाने नागरिकांना सवलत दिली आहे. मात्र या सवलतीचा गैरफायदा घेण्याचे प्रकार वाढल्याने प्रशासन हतबल झाले आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसोबत बँकांमधून पैसे काढण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. विशेषत: सुरक्षित अंतर ठेवून एकावेळेस केवळ चार ग्राहकांना बँकेच्या आत प्रवेश देण्याचे निर्बंध प्रशासनाने घातले असले तरी बँक व्यवस्थापनाकडून याचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. बँकेत येणाºया ग्राहकाला सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी बंधनकारक न करता त्याला बँकेत व पतसंस्थांमध्ये प्रवेश दिला जात आहे. यामुळे बँकांमध्ये नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी सोशल डिस्टन्सिंग या मोहिमेला हरताळ फासण्याचे उद्योग सुरू आहेत.पालिका प्रशासनाने शहरात पाच ठिकाणी तात्पुरते भाजीपाला मार्केट सुरू केले असले तरी या सर्व ठिकाणी बेशिस्त कारभार सुरू आहे. दररोज सहजपणे भाजीपाला उपलब्ध होत असल्याने ताजा भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. नागरिकांची गर्दी होत असल्याने परिसराला या कालावधीत यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. विशेष म्हणजे भाजी विक्रेता व ग्राहक नागरिक या दोघांकडून शासकीय नियमांचे खुलेआम उल्लंघन होत आहे.सुुरुवातीला संचारबंदी व नंतर लॉकडाऊन कालावधी या काळात प्रशासनाच्या आवाहनाला जनतेची साथ लाभत असल्याने सीमावर्ती भाग असतानाही आपल्या तालुक्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. एवढा वेळ नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य केले आहे. जनतेने १४ एप्रिलपर्यंत काटेकोरपणे शासकीय नियमांचे पालन करावे. परिस्थिती नियंत्रणात असल्याबाबत जनतेला सूचित केले जाईल. मात्र लॉकडाऊनच्या या अखेरच्या आठवड्यात जनतेने गांभीर्याने नियमांचे पालन केले नाही तर भविष्यात याचे दुष्परिणाम सोसावे लागतील. यासाठी प्रशासनाच्यावतीने नागरिकांनी घरीच राहावे, असे आवाहन तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.सर्व भाजी, फळे विक्रेत्यांनी शहादा येथील स्टेट बँकेच्या शाखेजवळ भरणारा बाजार हे ८ एप्रिलपासून सकाळी सात ते दुपारी १२ यावेळेत प्रेस मारुती मैदान येथे आखणी केल्यानुसार बसण्याचे करावे. तसेच एकावेळेस एकच व्यक्ती आपल्यासमोर राहील याची दक्षता घ्यावी. आपल्या दुकानासमोर एकावेळेस एकापेक्षा अधिक व्यक्तींशी व्यवहार करताना आढळून आल्यास सक्तीची कारवाई करण्यात येईल, याची सर्व विक्रेत्यांनी यांची नोंद घ्यावी.-राहुल वाघ,मुख्याधिकारी, शहादा नगरपालिका.