शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

शहाद्यात नागरिकांकडून ‘सोशल डिस्टन्सिंग’ला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असले तरी अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी संचारबंदीच्या कालावधीत देण्यात येणाऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असले तरी अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी संचारबंदीच्या कालावधीत देण्यात येणाऱ्या शिथिलतेचा काही नागरिकांकडून गैरफायदा घेतला जात असून यामुळे सोशल डिस्टन्स पाळण्याच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. दरम्यान, मंगळवारी प्रेस मारुती मैदानावर भाजीपाला विक्रेत्यांसाठी जागेची आखणी करून विक्रेते व ग्राहकांनी नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.शहरात सकाळी आठ ते दुपारी बारा या कालावधीत अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रशासनाने नागरिकांना सवलत दिली आहे. मात्र या सवलतीचा गैरफायदा घेण्याचे प्रकार वाढल्याने प्रशासन हतबल झाले आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसोबत बँकांमधून पैसे काढण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. विशेषत: सुरक्षित अंतर ठेवून एकावेळेस केवळ चार ग्राहकांना बँकेच्या आत प्रवेश देण्याचे निर्बंध प्रशासनाने घातले असले तरी बँक व्यवस्थापनाकडून याचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. बँकेत येणाºया ग्राहकाला सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी बंधनकारक न करता त्याला बँकेत व पतसंस्थांमध्ये प्रवेश दिला जात आहे. यामुळे बँकांमध्ये नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी सोशल डिस्टन्सिंग या मोहिमेला हरताळ फासण्याचे उद्योग सुरू आहेत.पालिका प्रशासनाने शहरात पाच ठिकाणी तात्पुरते भाजीपाला मार्केट सुरू केले असले तरी या सर्व ठिकाणी बेशिस्त कारभार सुरू आहे. दररोज सहजपणे भाजीपाला उपलब्ध होत असल्याने ताजा भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. नागरिकांची गर्दी होत असल्याने परिसराला या कालावधीत यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. विशेष म्हणजे भाजी विक्रेता व ग्राहक नागरिक या दोघांकडून शासकीय नियमांचे खुलेआम उल्लंघन होत आहे.सुुरुवातीला संचारबंदी व नंतर लॉकडाऊन कालावधी या काळात प्रशासनाच्या आवाहनाला जनतेची साथ लाभत असल्याने सीमावर्ती भाग असतानाही आपल्या तालुक्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. एवढा वेळ नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य केले आहे. जनतेने १४ एप्रिलपर्यंत काटेकोरपणे शासकीय नियमांचे पालन करावे. परिस्थिती नियंत्रणात असल्याबाबत जनतेला सूचित केले जाईल. मात्र लॉकडाऊनच्या या अखेरच्या आठवड्यात जनतेने गांभीर्याने नियमांचे पालन केले नाही तर भविष्यात याचे दुष्परिणाम सोसावे लागतील. यासाठी प्रशासनाच्यावतीने नागरिकांनी घरीच राहावे, असे आवाहन तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.सर्व भाजी, फळे विक्रेत्यांनी शहादा येथील स्टेट बँकेच्या शाखेजवळ भरणारा बाजार हे ८ एप्रिलपासून सकाळी सात ते दुपारी १२ यावेळेत प्रेस मारुती मैदान येथे आखणी केल्यानुसार बसण्याचे करावे. तसेच एकावेळेस एकच व्यक्ती आपल्यासमोर राहील याची दक्षता घ्यावी. आपल्या दुकानासमोर एकावेळेस एकापेक्षा अधिक व्यक्तींशी व्यवहार करताना आढळून आल्यास सक्तीची कारवाई करण्यात येईल, याची सर्व विक्रेत्यांनी यांची नोंद घ्यावी.-राहुल वाघ,मुख्याधिकारी, शहादा नगरपालिका.