शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वादळ टळले, पाऊस कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चक्रीवादळ जिल्ह्याला टाळून गेल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु रात्री १० वाजेनंतर जोरदार वाऱ्यांसह ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चक्रीवादळ जिल्ह्याला टाळून गेल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु रात्री १० वाजेनंतर जोरदार वाऱ्यांसह पावसाची रिपरिप सुरू होती. पहाटेपर्यंत पाऊस सुरू होता. यामुळे फळ पिकांचे मोठे नुकसान झाले तर काही ठिकाणी रस्ते पाण्यात गेले. नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जिल्ह्यात कुठेही जीवीत हाणी झाली नाही. दरम्यान, गुरुवारी जिल्ह्यातील अनेक भागात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.जिल्हा प्रशासनाने चक्री वादळाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात सर्वत्र दक्षता घेतली होती. हवामान विभागाने नंदुरबारला रेड अलर्ट देखील दिला होता. त्यामुळे बुधवारी दुपारी ३ वाजेनंतर बाजारपेठा बंद करण्यात आल्या होत्या. नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सुरक्षीत स्थळी देखील हलविण्यात आले होते. रात्री उशीरापर्यंत प्रशासन दक्ष होते. परंतु वादळाने दिशा बदलल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. परंतु अती पावसामुळे नुकसान होऊ नये यासाठी मात्र दक्षता घेण्यात आली. तरीही शेती पिकाचे पावसामुळे नुकसान झाले. रस्तेही पाण्यात गेले. वीज पुरवठा अनेक भागात १० ते १२ तास खंडित होता.वादळ नाही, पण पाऊस बरसलावादळ आले नाही , परंतु पाऊस बºयापैकी बरसला. रात्री ९ वाजेपासून पावसाची रिपरिप सुरू झाली होती. रात्री ११ वाजता हवेचा वेग वाढून पावसाचाही वेग वाढला होता. हवेच्या वेगामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे विजेच्या ताराही तुटल्या. मोठी वित्त हाणी मात्र कुठेही झाली नाही. पावसाची रिपरिप पहाटे दोन ते अडीच वाजेपर्यंत सुरूच होती. नंतर मात्र पावसाचा वेग मंदावला. सकाळी पावसाने विश्रांती घेतली. दिवसभर मात्र ढगाळ वातावरण कायम होते.नवापूर, नंदुरबारात पाऊसगुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास नवापूर व नंदुरबार तालुक्यातील अनेक भागात मध्यम ते हलका पाऊस झाला. नंदुरबारात सायंकाळपर्यंत रिपरिप सुरू होती. त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाल्याचे दिसून आले. तालुक्याच्या पश्चिम पट्टयात पावसाचा जोर बºयापैकी होता.१२ तास वीज खंडितनंदुरबार तालुक्यासह अनेक भागात बुधवारी रात्रीपासून ते गुरुवारी पहाटेपर्यंत तब्बल १० ते १२ तास वीज पुरवठा खंडित झाला होता. पावसामुळे आणि वादळामुळे काही मुख्य वीज वाहिनीचे नुकसान झाल्याने ही समस्या निर्माण झाली होती. सकाळी दुरूस्ती करून ८ वाजता वीज पुरवठा सुरळीत करण्यात वीज कंपनीला यश आले. त्यामुळे ग्रामिण भागात संपुर्ण रात्र वीज पुरवठा खंडित राहिला. वीज कंपनीने मान्सूनपूर्व दुरूस्ती करून उपाययोजना देखील केलेल्या असतांनाही वाळवाच्या पावसातच वीज कंपनीच्या तयारीचे आणि नियोजनाचे वाभाडे निघाल्याचे दिसून आल्याने नागरिकांनी नाराजीही व्यक्त केली.पंचनामे करण्याच्या सुचनावादळ आणि पावसामुळे शेती आणि घरांचे नुकसान झाले असल्यास तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेतात सध्या फळ पिकांमध्ये केळी, पपई आहे.त्यांचे नुकसान झाले. याशिवाय सातपुड्यात आंब्याचेंही मोठे नुकसान झाले आहे. नंदुरबार व शहादा तालुक्यात वादळामुळे काही घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. पंचनामे पुर्ण झाल्यावर नुकसानीचा एकुण अंदाज कळणार आहे.निर्माणाधिन रस्त्यांची दुरावस्थाजिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. निर्माणाधिन असलेल्या रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने गाळ व चिखल निर्माण झाला होता. त्यामुळे रहदारीवर परिणाम झाला होता. चिखलातून वाहनचालकांना वाट काढावी लागत होती. कोळदा-खेतिया रस्ता, समशेरपूर-करणखेडा, असलोद-वैजाली रस्ता यासह इतर रस्त्यांची कामे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्या कामांवर परिणाम झाला आहे.

बुधवारी दिवसभर व पहाटेपर्यंत झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्हा जलमय झाला. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद नंदुरबार तालुक्यात ५९ मि.मी.इतकी झाली. त्या खालोखाल शहादा तालुक्यात ४८, नवापूर तालुक्यात ४०, तळोदा तालुक्यात ३५, अक्कलकुवा तालुक्यात २८ तर धडगाव तालुक्यात सर्वात कमी १३ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. सध्या कमी दाबाचा पट्टा असल्याने जिल्ह्यातील काही भागात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.