शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वादळ टळले, पाऊस कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चक्रीवादळ जिल्ह्याला टाळून गेल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु रात्री १० वाजेनंतर जोरदार वाऱ्यांसह ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चक्रीवादळ जिल्ह्याला टाळून गेल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु रात्री १० वाजेनंतर जोरदार वाऱ्यांसह पावसाची रिपरिप सुरू होती. पहाटेपर्यंत पाऊस सुरू होता. यामुळे फळ पिकांचे मोठे नुकसान झाले तर काही ठिकाणी रस्ते पाण्यात गेले. नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जिल्ह्यात कुठेही जीवीत हाणी झाली नाही. दरम्यान, गुरुवारी जिल्ह्यातील अनेक भागात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.जिल्हा प्रशासनाने चक्री वादळाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात सर्वत्र दक्षता घेतली होती. हवामान विभागाने नंदुरबारला रेड अलर्ट देखील दिला होता. त्यामुळे बुधवारी दुपारी ३ वाजेनंतर बाजारपेठा बंद करण्यात आल्या होत्या. नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सुरक्षीत स्थळी देखील हलविण्यात आले होते. रात्री उशीरापर्यंत प्रशासन दक्ष होते. परंतु वादळाने दिशा बदलल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. परंतु अती पावसामुळे नुकसान होऊ नये यासाठी मात्र दक्षता घेण्यात आली. तरीही शेती पिकाचे पावसामुळे नुकसान झाले. रस्तेही पाण्यात गेले. वीज पुरवठा अनेक भागात १० ते १२ तास खंडित होता.वादळ नाही, पण पाऊस बरसलावादळ आले नाही , परंतु पाऊस बºयापैकी बरसला. रात्री ९ वाजेपासून पावसाची रिपरिप सुरू झाली होती. रात्री ११ वाजता हवेचा वेग वाढून पावसाचाही वेग वाढला होता. हवेच्या वेगामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे विजेच्या ताराही तुटल्या. मोठी वित्त हाणी मात्र कुठेही झाली नाही. पावसाची रिपरिप पहाटे दोन ते अडीच वाजेपर्यंत सुरूच होती. नंतर मात्र पावसाचा वेग मंदावला. सकाळी पावसाने विश्रांती घेतली. दिवसभर मात्र ढगाळ वातावरण कायम होते.नवापूर, नंदुरबारात पाऊसगुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास नवापूर व नंदुरबार तालुक्यातील अनेक भागात मध्यम ते हलका पाऊस झाला. नंदुरबारात सायंकाळपर्यंत रिपरिप सुरू होती. त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाल्याचे दिसून आले. तालुक्याच्या पश्चिम पट्टयात पावसाचा जोर बºयापैकी होता.१२ तास वीज खंडितनंदुरबार तालुक्यासह अनेक भागात बुधवारी रात्रीपासून ते गुरुवारी पहाटेपर्यंत तब्बल १० ते १२ तास वीज पुरवठा खंडित झाला होता. पावसामुळे आणि वादळामुळे काही मुख्य वीज वाहिनीचे नुकसान झाल्याने ही समस्या निर्माण झाली होती. सकाळी दुरूस्ती करून ८ वाजता वीज पुरवठा सुरळीत करण्यात वीज कंपनीला यश आले. त्यामुळे ग्रामिण भागात संपुर्ण रात्र वीज पुरवठा खंडित राहिला. वीज कंपनीने मान्सूनपूर्व दुरूस्ती करून उपाययोजना देखील केलेल्या असतांनाही वाळवाच्या पावसातच वीज कंपनीच्या तयारीचे आणि नियोजनाचे वाभाडे निघाल्याचे दिसून आल्याने नागरिकांनी नाराजीही व्यक्त केली.पंचनामे करण्याच्या सुचनावादळ आणि पावसामुळे शेती आणि घरांचे नुकसान झाले असल्यास तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेतात सध्या फळ पिकांमध्ये केळी, पपई आहे.त्यांचे नुकसान झाले. याशिवाय सातपुड्यात आंब्याचेंही मोठे नुकसान झाले आहे. नंदुरबार व शहादा तालुक्यात वादळामुळे काही घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. पंचनामे पुर्ण झाल्यावर नुकसानीचा एकुण अंदाज कळणार आहे.निर्माणाधिन रस्त्यांची दुरावस्थाजिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. निर्माणाधिन असलेल्या रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने गाळ व चिखल निर्माण झाला होता. त्यामुळे रहदारीवर परिणाम झाला होता. चिखलातून वाहनचालकांना वाट काढावी लागत होती. कोळदा-खेतिया रस्ता, समशेरपूर-करणखेडा, असलोद-वैजाली रस्ता यासह इतर रस्त्यांची कामे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्या कामांवर परिणाम झाला आहे.

बुधवारी दिवसभर व पहाटेपर्यंत झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्हा जलमय झाला. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद नंदुरबार तालुक्यात ५९ मि.मी.इतकी झाली. त्या खालोखाल शहादा तालुक्यात ४८, नवापूर तालुक्यात ४०, तळोदा तालुक्यात ३५, अक्कलकुवा तालुक्यात २८ तर धडगाव तालुक्यात सर्वात कमी १३ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. सध्या कमी दाबाचा पट्टा असल्याने जिल्ह्यातील काही भागात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.