शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पदोन्नतीच्या कोट्यातील आरक्षित पदे भरण्यासाठी निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:29 IST

तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाचा ७ मे २०२१ चा आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा. सर्वोच्च न्यायालयातील ...

तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाचा ७ मे २०२१ चा आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित विशेष अनुमती याचिकेच्या निर्णयास अधीन राहून अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, निर अधिसूचित जाती, भटके विमुक्त, विशेष मागासप्रवर्ग यांना सन २००४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ८, महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिनियम २००१ या कायद्यानुसार पदोन्नतीच्या सर्व टप्प्यावर पदोन्नतीतील आरक्षण देणारा शासन आदेश निर्गमित करण्यात यावा. भारतीय संविधानातील भाग तीनच्या मूलभूत हक्काची तरतूद असणाऱ्या कलम १६ मधील १६ (१), १६ (२), १६ (४), १६ (४) क नुसार महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग जाती समूहांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे यासाठी पदोन्नतीच्या सर्व टप्प्यावर पदोन्नतीतील आरक्षण देणारा कायदा करण्यात यावा. महाराष्टात अनुसूचित जाती, जमाती, निर अधिसूचित जमाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग अधिकारी व कर्मचारी यांची थांबलेली पदोन्नती प्रक्रिया तात्काळ पूर्ववत सुरू करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. १९ मे रोजी संपूर्ण राज्यात काळीफित आंदोलन करण्यात आल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष रोहिदास वळवी यांनी दिली.

यावेळी राज्य उपाध्यक्ष रोहिदास वळवी, प्रोटॉनचे जिल्हा संयोजक विष्णू जोंधळे, दीपक पानपाटील, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक कुवर, बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हाध्यक्ष संजय निकुंभे, प्रोटॉन, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ.साहेबराव ईशी, जिल्हाध्यक्ष कृष्णा जगदेव उपस्थित होते.