शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

राज्यात नंदुरबार पालिकेची ११ स्थानांची मजल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 12:29 IST

स्वच्छ सर्व्हेक्षण : पुढील वर्षी पहिल्या दहामध्ये येण्याचा पालिकेचा प्रयत्न

नंदुरबार : स्वच्छता सर्व्हेक्षणात नंदुरबार पालिकेने गेल्या वर्षाच्या तुलनेत आपले स्थान सुधारले आहे. राज्यात ४४ व्या स्थानावरून ३३ वे स्थान मिळवले आहे. तर देशात १८० व्या स्थानावरून १२२ वे स्थान मिळविले आहे. पालिकेने राबविलेल्या स्वच्छताविषयक विविध उपाययोजनेमुळे हे शक्य झाल्याचा पालिकेचा दावा आहे. दरम्यान, पुढील वर्षी राज्यात पहिल्या दहा स्वच्छ शहरांमध्ये येण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.स्वच्छ शहरांची यादी नुकतीच घोषीत करण्यात आली आहे. या यादीत नंदुरबारने उत्तूंग भरारी घेतली आहे. राज्यस्तरावर ११ रॅन्कची सुधारणा झाली तर देशपातळीवर ५८ रॅन्कची सुधारणा झाली आहे. यामुळे पालिकेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून पुढील वर्षी पहिल्या दहा शहरात येण्यासाठी पालिकेचा पुरेपूर प्रयत्न राहणार असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले.हगणदारीमुक्ती...शहरात ज्या कुटूंबाकडे शौचालय नाही अशा कुटूंबांची अर्थात घरांचे सर्व्हेक्षण तीन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. त्यात जवळपास १३०० कुटूंबे शौचालय नसलेली आढळून आली होती. त्यानुसार केंद्र व राज्य शासनाने पालिकेला वर्षभरात १३२० वैयक्तिक शौचालये बांधकाम करण्याचे टार्गेट दिले होते. त्या सर्व कुटूंबांना शासनाच्या हिस्स्याचे अनुदान देण्यात आल्यानंतर १३२० शौचालयांचे बांधकाम पुर्ण करण्यात आले. त्यानंतरही काही कुटूंब आढळून आल्यानंतर त्यांनाही अनुदान देण्यात आले. त्यामुळे उद्दीष्टापेक्षा अधीक अर्थात १३५० वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पुर्ण झाले. त्यांचा वापर होतो किंवा कसा याचेही सर्व्हेक्षण करण्यात आले.सार्वजनिक शौचालयेशहरात विविध भागात ५०० शिटचे सार्वजनिक शौचालये देखील आहेत. त्यामुळे उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या तीन वर्षात बांधण्यात आलेल्या नवीन सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी कायमस्वरूपी राहू शकेल याची काळजी घेण्यात आली आहे. स्वच्छतेबाबत अशा ठिकाणी विशेष दक्षता घेतली जात आहे.घंटागाडीचा प्रयोगशहरातील कचºयाची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने गेल्या १० वर्षांपासून घंटागाडीचा उपक्रम सुरू केला आहे. काही भागात दररोज तर काही भागात एक दिवसाआड घंटागाडी जावून कर्मचारी घरोघरी जावून कचरा गोळा करतात. अगदी मोठ्या व उच्चभ्रू वस्तींपासून ते अगदी झोपडपट्टीत देखील घंटागाडी जात असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कचºयाची समस्या सुटली आहे.भुमीगत गटारीचा प्रश्नशहरात भुमीगत गटारीचा प्रकल्प मात्र यशस्वी होऊ शकला नाही. आजही या प्रकल्पाअंतर्गत अनेक समस्या आहेत. थेट पाणी नळवा रस्त्यावरील शुद्धीकरण प्रकल्पात पोहचू शकत नाही. ठिकठिकाणी चेंबर फुटले आहेत. पाताळगंगा नदीमधून गेलेली ड्रेनेज लाईन अनेक ठिकाणी फोडण्यात आली आहे. यामुळे या भागात मोठी समस्या निर्माण झाली आहे.