शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

राज्यात नंदुरबार पालिकेची ११ स्थानांची मजल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 12:29 IST

स्वच्छ सर्व्हेक्षण : पुढील वर्षी पहिल्या दहामध्ये येण्याचा पालिकेचा प्रयत्न

नंदुरबार : स्वच्छता सर्व्हेक्षणात नंदुरबार पालिकेने गेल्या वर्षाच्या तुलनेत आपले स्थान सुधारले आहे. राज्यात ४४ व्या स्थानावरून ३३ वे स्थान मिळवले आहे. तर देशात १८० व्या स्थानावरून १२२ वे स्थान मिळविले आहे. पालिकेने राबविलेल्या स्वच्छताविषयक विविध उपाययोजनेमुळे हे शक्य झाल्याचा पालिकेचा दावा आहे. दरम्यान, पुढील वर्षी राज्यात पहिल्या दहा स्वच्छ शहरांमध्ये येण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.स्वच्छ शहरांची यादी नुकतीच घोषीत करण्यात आली आहे. या यादीत नंदुरबारने उत्तूंग भरारी घेतली आहे. राज्यस्तरावर ११ रॅन्कची सुधारणा झाली तर देशपातळीवर ५८ रॅन्कची सुधारणा झाली आहे. यामुळे पालिकेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून पुढील वर्षी पहिल्या दहा शहरात येण्यासाठी पालिकेचा पुरेपूर प्रयत्न राहणार असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले.हगणदारीमुक्ती...शहरात ज्या कुटूंबाकडे शौचालय नाही अशा कुटूंबांची अर्थात घरांचे सर्व्हेक्षण तीन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. त्यात जवळपास १३०० कुटूंबे शौचालय नसलेली आढळून आली होती. त्यानुसार केंद्र व राज्य शासनाने पालिकेला वर्षभरात १३२० वैयक्तिक शौचालये बांधकाम करण्याचे टार्गेट दिले होते. त्या सर्व कुटूंबांना शासनाच्या हिस्स्याचे अनुदान देण्यात आल्यानंतर १३२० शौचालयांचे बांधकाम पुर्ण करण्यात आले. त्यानंतरही काही कुटूंब आढळून आल्यानंतर त्यांनाही अनुदान देण्यात आले. त्यामुळे उद्दीष्टापेक्षा अधीक अर्थात १३५० वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पुर्ण झाले. त्यांचा वापर होतो किंवा कसा याचेही सर्व्हेक्षण करण्यात आले.सार्वजनिक शौचालयेशहरात विविध भागात ५०० शिटचे सार्वजनिक शौचालये देखील आहेत. त्यामुळे उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या तीन वर्षात बांधण्यात आलेल्या नवीन सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी कायमस्वरूपी राहू शकेल याची काळजी घेण्यात आली आहे. स्वच्छतेबाबत अशा ठिकाणी विशेष दक्षता घेतली जात आहे.घंटागाडीचा प्रयोगशहरातील कचºयाची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने गेल्या १० वर्षांपासून घंटागाडीचा उपक्रम सुरू केला आहे. काही भागात दररोज तर काही भागात एक दिवसाआड घंटागाडी जावून कर्मचारी घरोघरी जावून कचरा गोळा करतात. अगदी मोठ्या व उच्चभ्रू वस्तींपासून ते अगदी झोपडपट्टीत देखील घंटागाडी जात असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कचºयाची समस्या सुटली आहे.भुमीगत गटारीचा प्रश्नशहरात भुमीगत गटारीचा प्रकल्प मात्र यशस्वी होऊ शकला नाही. आजही या प्रकल्पाअंतर्गत अनेक समस्या आहेत. थेट पाणी नळवा रस्त्यावरील शुद्धीकरण प्रकल्पात पोहचू शकत नाही. ठिकठिकाणी चेंबर फुटले आहेत. पाताळगंगा नदीमधून गेलेली ड्रेनेज लाईन अनेक ठिकाणी फोडण्यात आली आहे. यामुळे या भागात मोठी समस्या निर्माण झाली आहे.