शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

राज्यस्तरीय वारकरी संमेलनात ‘शेतकरी आत्महत्येवर चिंतन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 13:14 IST

संतसंमेलन : विविध 12 ठरावांवर झाली चर्चा

नंदुरबार : शेतकरी हाच वारकरी, त्याची आत्महत्या ही चटका लावणारी ठरते, शेतकरी आत्महत्या का करतो, याचा शोध घेत सतांनी ‘लोकपिठावरुन’ सतत प्रबोधन करुन शेतक:यांना समंजस कराव़े आत्महत्या थांबवण्यासाठी शासनानेही योग्य ती मदत करुन शेतक:यांचे पुनवर्सन करावे असे चिंतन राज्यस्तरीय वारकरी संमेलनात गुरुवारी करण्यात आल़े नंदुरबार शहरातील माळीवाडा भागात रामकृष्ण नगरीत 21 डिसेंबरपासून राज्यस्तरीय वारकरी संमेलनास सुरुवात झाली होती़ अखिल भारतीय वारकरी मंडळाने आयोजित केलेल्या या संमेलानाचा शुक्रवारी समारोप होणार आह़े तत्पूर्वी गुरुवारी सकाळी संतसंमेलन घेण्यात येऊन विविध ठराव करण्यात आल़े या ठरावांनंतर उपस्थित संत, मंडळाचे पदाधिकारी, वारकरी आणि शेतकरी यांच्या उपस्थितीत या ठरावांवर चर्चा होऊन दीर्घ चिंतन झाल़े व्यासपीठावर अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, देव गोपाळ शास्त्री महाराज, संत बाबाजी महाहंस महाराज आडगावकर, संतोषनंद शास्त्री महाराज, अनिल महाराज वाळके, अविनाश जोशी महाराज, विजय महाराज जाधव, नामदेव शास्त्री महाराज टेंभेकर, संध्याबाई माळी, भिला खोरीकर, अंबादास महाराज कोडदेकर, समाधान महाराज आदी उपस्थित होत़े प्रास्ताविक अनिल महाराज वाळके यांनी केल़े सूत्रसंचालन ज्ञानेश्वर महाराज माळी तर आभार पावबा महाराज अक्राळेकर यांनी मानल़े पसायदानाने समारोप झाला़ शासनाकडून दरवर्षी केवळ 60 भजनी कलावंतांना अनुदान दिले जात़े ही संख्या वाढवून 300 करण्यात यावी तसेच पेन्शनमध्ये वाढ करावी़वारक:यांना आरोग्य व आपत्कालीन मदत देण्यात यावी़ शेतकरी-वारकरी हा प्रश्न शासनाने गांभिर्याने घेऊन शेतक:यांची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घ्यावा़गावागावात संतांच्या सहाय्याने व्यसनमुक्ती विषयावर प्रबोधन करण्यात याव़ेबेटीबचाव, पर्यावरण, कुपोषण, महिला सक्षमीकरण या विषयांना शासनाने प्राधान्य द्याव़ेअखिल भारतीय वारकरी मंडळाच्या सहाय्याने राज्यात वारकारी भजन, तत्त्वज्ञान, संत साहित्याचे शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात यावी़अध्यात्म विज्ञान यांची समीक्षा करत सांगड घालून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करावा़समाजात धर्मनिष्ठेबाबत प्रबोधन करण़ेवारक:यांमध्ये शासनाच्या विविध योजनाची माहिती होऊन त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण़ेतिर्थक्षेत्रांची माहिती सामान्यांर्पयत पोहोचवण्यासाठी शासनाने प्रयत्न कराव़े गुजरात राज्यात अखिल भारतीय मंडळाने कार्य करुन वारकरी संप्रदाय आणि संत साहित्य पोहोचवाव़े