लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनमुळे गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील एसटीचे चार आगार बंद आहेत़ यामुळे तब्बल ५० लाख रुपयांचे दैनंदिन नुकसान होत आहे़ दरदिवशी चारही आगारातून होणाऱ्या २ हजार बसफेºया बंद असल्याने बसस्थानकांवर शुकशुकाट पसरला आहे़कोरोना थोपवण्यासाठी देशभरात सध्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आला आहे़ यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शहरे आणि खेड्या गावांमध्ये शुकशुकाट आहे़ एसटीच्या नंदुरबार, नवापुर, अक्कलकुवा आणि शहादा आगार रविवारपासून बंद आहे़ यामुळे चारही आगारातील दीड हजाराच्या जवळपास कर्मचारी सुटीवर असल्याने आगारांचे कामकाज बंद आहे़ नंदुरबार बस आगारातून दर दिवशी ६७६, शहादा ७५०, नवापुर ३६५ तर अक्कलकुवा बसआगारातून दर दिवशी २३५ अशा एकूण २ हजार बसफेºया रद्द झाल्या आहेत़ नंदुरबार आगारात ५७६, नवापुर आगारातील २३५, अक्कललकुवा २५० तर शहादा आगारातील ५०० कर्मचारी सुटीवर आहेत़ बस फेºया होत नसल्याने नंदुरबार आगाराचा दररोज होणारा ४२ होणारा ३३९ हजार किलोमीटर, नवापुर २४ हजार, शहादा ३४ हजार तर अक्कलकुवा आगाराचा १४ हजार किलोमीटर बसेसचा प्रवास थांबला आहे़ नंदुरबार आगारातून व शहादा आगारातून दिवसाला १५ ला, नवापूर ९ लाख ४० तर अक्कलकुवा आगारातून सुमारे साडेसात लाख रुपयांची कमाई होते़ यातून चारही आगारांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनासह कार्यशाळांमधील कामांवर भर दिला जातो़ सध्या कर्मचारी पगारी सुटीवर असले तरी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याने चारही आगारांचे नुकसान हे कोट्यावधी रुपयांच्या घरात पोहोचणार आहे़ बसेस नसल्याने ग्रामीण भागाचा शहरी भागासोबतच संपर्क पूर्णपणे तुटला आहे़ बसेससोबतच खाजगी प्रवासी वाहनेही बंद करण्यात आली आहे़ यामुळे चालकांच्या रोजगारावर परिणाम होत असून त्यांनीही कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगत रविवारपासूनच वाहने बंद केली होती़ सोबतच शहरात येणाºया आराम बसेसही बंद झाल्याने नुकसानीचा आकडा मोठा होत आहे़
एसटी थांबल्याने चारही आगारांचे दररोज ५० लाख रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 12:34 IST