शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
6
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
7
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
8
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
9
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
10
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
11
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
12
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
13
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
14
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
15
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
16
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
19
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
20
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?

वाळू तस्करी रोखण्यासाठी पथके स्थापन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 11:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाळू तस्करी रोखण्यासाठी तालुकास्तरावर पथके स्थापन करावी अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी अधिकाऱ्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वाळू तस्करी रोखण्यासाठी तालुकास्तरावर पथके स्थापन करावी अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वाळू सनियंत्रण समिती, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, महसूल, जैव विविधता समिती व वृक्ष लागवड व संवर्धन समितीची बैठक घेवून आढावा घेतला.यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, सुधीर खांदे, गाºहाणे निराकरण प्राधिकरणाचे सचिव संदीप कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, कार्यकारी अभियंता अनिल पवार, अमरदिप पाटील, उपवनसंरक्षक सुरेश केवटे, अनिल थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी एन. डी. बोडके, इंडियन मेडीकल असोशिएशनचे डॉ. राजेश वळवी, जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी सौजन्या पाटील, जिल्हा प्रशासन अधिकारी राहूल वाघ जिल्ह्यातील सर्व तहसिलदार गट विकास अधिकारी व संबंधित यंत्रणेचे अंमलबजावणी अधिकारी उपस्थित होते.जिल्हा वाळू सनियंत्रण समिती बैठकीत वाळूघाटांच्या प्रस्तावाबाबत चर्चा करुन वाळू घाटांचे प्रस्ताव तात्काळ तहसिलदारांनी सादर करावे असे निर्देश दिले. तसेच तहसिलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनी वाळू घाटांना नियमितपणे भेटी देवून तपासणी करावी. तसेच वाळूच्या अवैद्य वाहतुकीला प्रतिबंध करण्यासाठी तालुकास्तरावर तात्काळ पथक कार्यान्वीत करावेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामांचा आढावा घेतांना प्रलंबित असलेली कामे लवकर पूर्ण करावेत. खाजगी क्षेत्रावर, शेताच्या बांधावर वृक्ष लागवडीचा उपक्रम शेतकºयांना आर्थिक लाभ देणारा असल्याने त्यांना वृक्षलागवडीसाठी प्रोत्साहित करावे. तसेच प्रत्येक विभागास सन २०२०-२१ चा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात याव्या असे सांगितले. महसूल विभागातील पुरवठा, गौणखजिन, टंचाई, निवडणूक, कुळवहिवाट, भुसंपादन, संजय गांधी योजना या विभागांचा आढावा घेण्यात आला.जैविक विविधता व्यवस्थापन संदर्भात जिल्हा व तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या असून जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपंचायत व ग्रामपंचायत स्तरावरील समित्यांनी जैविक विविधता संदर्भात नोंदवह्यांमध्ये नोंदी घ्याव्यात व जैविक विविधतेचे काम मुदतीत पुर्ण करावेत. अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी संबंधित अधिकाºयांना दिल्या.वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत दर वर्षी लागवड केलेल्या वृक्षांचे चांगल्याप्रकारे संगोपन करुन जिल्ह्यात शंभर टक्के वृक्ष जगलेले दिसतील असे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.