शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

दुर्गम भागात कोरोनाचा फैलाव; आराेग्य सुविधांकडे साफ दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:31 IST

नंदुरबार जिल्ह्यातील सध्याची कोरोना परिस्थिती व पूर्णता: संचारबंदी बाबत जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ...

नंदुरबार जिल्ह्यातील सध्याची कोरोना परिस्थिती व पूर्णता: संचारबंदी बाबत जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, मोलगी व धडगाव येथे कोरोना लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचा दौरा केला होता. या दौऱ्यानिमित्त नागरिकांना मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु त्या फोल ठरल्या असून, कोरोना परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सर्वसामान्यांसाठी मदतीची घोषणा करतील, असे वाटत होते. आरोग्य सुविधेत बदल होईल अशी अपेक्षा होती. जिल्ह्यातील रूग्णालयांमध्ये कोरोना उपाययोजनांसाठी डॉक्टर, नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल पण तसे काही झाले नाही.

यापूर्वी कोरोनाबाधित रूग्णांच्या परिसरात आरोग्य विभागाकडून विशेष उपाययोजना केल्या जात होत्या. आता परिसर निर्जंतुकसुध्दा केला जात नाही. रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे ट्रेसिंग केले जात नाही. रूग्णांच्या घरापर्यंत रूग्णवाहिकेची सुविधा केली जात नाही, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर लाखों रूपयांचा खर्च होतो. परंतु कोरोनाचा अटकाव करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर बेडची सुविधा होत नसल्याने महाआघाडी सरकार रूग्णांना वाऱ्यावर सोडत आहे. त्यामुळे कोरोना मृत्युदर वाढल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केला. तसेच जिल्ह्यात प्रशासनाने १ एप्रिल ते १५ एप्रिलपर्यंत संचारबंदीचे आदेश दिले आहेत. संचारबंदीमुळे व्यावसायिक, व्यापारी, हातावर पोट भरणारे, मजूर कामगार यांना आर्थिक झळ पोहचणार आहे. संचारबंदीला आमचा मुळीच विरोध नाही. पण, प्रशासनाने आर्थिक मदतीची तरतूद करावी, अशी मागणी आहे.