शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

11 लाखांच्या निधीची चार लाखात बोळवण

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: September 18, 2017 10:55 IST

अस्वच्छ क्षेत्रातील कामगार पाल्यांची व्यथा : संपूर्ण पैसा खर्च होऊनही निधीची कमतरता

ठळक मुद्दे बाद अर्ज भरताना कर्मचा:यांची धावपळ योजनेचा लाभ मिळण्याबाबत समाजकल्याण विभाग लाभाथ्र्याकडून माहिती मागविण्यात येत असत़े योजेनची कार्यवाही ऑनलाईन असल्याने संबंधित निधी लाभाथ्र्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असतो़ परंतु आधिच जेमतेम शिक्षण झालेल्या लाभ कुठल्याही योजनेत निधी कमी पडू दिला जाणार नाही़ हा निधी केंद्र शासनामार्फत येत असतो़ विभागाला अधिक निधी लागत असेल तर त्यांनी तसा प्रस्ताव पाठवावा़ अधिकचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल़ -राजेंद्र कलाल प्रादेशिक उपायुक्त, नाशिक़

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील कातडी कामगारांच्या पाल्यांसाठी 11 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असतानादेखील प्रत्येक्षात 3 लाख 70 हजारांचा निधी देऊन बोळवण करण्यात आली आह़े त्यामुळे मागील वर्षी संबंधित लाभाथ्र्याना पूर्ण निधीचे वाटप करण्यात आल्यावरही यंदा निधीची कमतरता असल्याने लाभाथ्र्यासमोर समस्या निर्माण होत आह़ेजिल्ह्यात कातडी कामगार म्हणजेच अस्वच्छ कामगारांच्या लाभार्थी पाल्यांची संख्या 552 इतकी आह़े त्यासाठी साधारणत 10 ते 11 लाखांच्या निधीची आवश्यकता आह़े त्यामुळे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे 11 लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती़ परंतु प्रत्यक्षात 3 लाख 70 हजार रुपयांचाच निधी समाज कल्याण विभागाला अद्यापर्पयत प्राप्त झाला आह़े त्यामुळे उर्वरीत लाभाथ्र्याचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आह़े मिळालेल्या 3 लाख 70 हजार रुपयांचा निधी समाज कल्याण विभागाकडून 199 लाभाथ्र्याचा वाटप करण्यात आला आह़े प्रती लाभार्थी विद्यार्थी 1 हजार 850 प्रमाणे या निधीचे वाटप करण्यात येत असत़े त्यामुळे आतार्पयत 199 लाभाथ्र्याना 3 लाख 68 हजार 150 रुपये निधीचे वाटप करण्यात आले आह़े त्यामुळे उर्वरीत 353 विद्याथ्र्याचे काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आह़े  मागील वर्षी कातडी कामगारांच्या पाल्यांना समाजकल्याण विभागाकडून 8 लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आला होता़ त्यापैकी सर्वचा सर्व निधी हा लाभाथ्र्याना वाटप करण्यात आला होता़ परंतु यंदा लाभार्थी  संख्या वाढली त्यामुळे साहजिकच निधीची मागणीही वाढली आह़े  परंतु निधीची कमतरता जाणवत असल्याने यंदा लाभार्थी विद्याथ्र्याची परवड होणार असल्याचे दिसून येत आह़े जिल्ह्यात मोठय़ा संख्येने अस्वच्छ कामगार, कातडी कामगार आहेत़ मुळात हा व्यवसाय करणारे लोक दारिद्रय रेषेखालील असल्याने शासनाकडून त्यांना विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येत असतात़ त्यासोबतच त्यांच्या पाल्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागू               नये यासाठी केंद्रशासनाकडून   नाशिक येथील प्रादेशिक उपायुक्त कार्यालयामार्फत लाभाथ्र्याना दरवर्षी निधीचे वाटप करण्यात येत असत़े निवड झालेल्या अस्वच्छ कामगारांच्या पाल्यांना प्रत्येकी 1 हजार 850  इतक्या निधीचे वाटप करण्यात येत असत़े यातून त्यांचा शिक्षणाचा खर्च निघावा हा उद्देश शासनाचा असतो़ परंतु केंद्राकडूनच निधीची कमतरता भासत असल्याने येथील लाभार्थी विद्याथ्र्याना निधीपासून वंचित रहावे लागत आह़े दरम्यान, नाशिक येथील प्रादेशिक उपायुक्त कार्यालयातून  तीन ते चार टप्प्यांमध्ये हा निधी देण्यात येत असतो़ 3 लाख 70 हजार रुपयांचा निधीदेखील 2016-2017 या वर्षासाठी 3 टप्प्यात आला असल्याचे विभागाकडून सांगण्यात आल़े दरम्यान, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून तत्परतेने लाभाथ्र्याना निधीचे वाटप करण्यात येत असले तरी यात अनेक अडचणी येत असतात़ सर्वप्रथम  पुरेस निधी मिळण्यास विलंब होत  असतो़ त्यातच संपूर्ण योजना ही ऑनलाईन पध्दतीने चालते त्यामुळे काही वेळा लाभाथ्र्याचे ऑनलाईन अर्ज भरतानाही ‘सव्र्हर’  ची समस्या जाणवत असत़े  त्यामुळे येथील कर्मचा:यांना अर्ज भरताना अनेक अडचणी येत असतात़