शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बीएड् प्रवेशासाठी लवकरच तिसरी फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 12:41 IST

विद्याथ्र्याची लगबग : ऑपशन फॉम एडिट करण्यासाठी दिली होती मुदत

नंदुरबार : बीएड् प्रवेश प्रक्रियेच्या सुरुवातीला भरलेल्या ऑपशन फॉर्म एडिट करण्याची मुदत संपली असून आता विद्याथ्र्याकडून तिस:या प्रवेश फेरीची तयारी करण्यात येत आह़े साधारणत अडीच महिन्याआधी बीएड प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑपशन फॉर्म भरण्यात आले             होत़े जिल्ह्यासह सर्वत्र बीएड् प्रवेश प्रक्रिया सुरु असून अद्याप दोन प्रवेश फे:या पूर्ण झालेल्या आहेत़ साधारणत: 6 ऑक्टोबरला तिसरी प्रवेश फेरी प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आह़े अडीच महिन्यांपूर्वी बीएड् प्रवेशासाठी विद्याथ्र्याकडून ऑपशन फॉर्म भरुन घेण्यात आला होता़ यात, विद्याथ्र्याला पाहिजे असलेले बीएड् कॉलेज, दुस:या व तिस:या क्रमांकाच्या पर्यायी महाविद्यालयाचे नाव, शैक्षणिक माहिती आदींचा समावेश होता़ परंतु  विद्याथ्र्याच्या सोयीनुसार प्रवेश घेऊ इच्छिना:या महाविद्यालयांचा आद्यक्रम बदलत असतो़ त्यामुळे संबंधित महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी भरण्यात आलेला  अर्ज पुन्हा एडिट करण्याची सुविधा शिक्षण विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात आलेली होती़ त्यानुसार 21 ते 25 सप्टेंबर्पयत ऑपशन   फॉर्म एडिट करण्याची मुदत देण्यात आलेली होती़ त्यामुळे विद्याथ्र्याकडून सायबर कॅफे आदींवर गर्दी करण्यात येत        आह़े जागा शिल्लक असल्याने चौथ्या प्रवेश फेरीची शक्यता कमीचनंदुरबारसह जळगाव, धुळे जिल्ह्यातील ग्रॅन्टेड् तसेच नॉन ग्रँटेड् महाविद्यालयांमध्ये बीएड्च्या जागा रिक्त असल्याने तिस:या प्रवेश फेरीमध्येच बहुतेक विद्याथ्र्याचा प्रवेश निश्चित होण्याची शक्यता आह़े त्यामुळे साहजिकच चौथी प्रवेश फेरी होण्याची शक्यता कमी असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आह़े संपूर्ण जिल्ह्यात साधारणत 20 शिक्षणशास्त्र महाविद्यालये आहेत़ त्यातील एनटीव्हीएस शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालय, देवमोगरा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, शहादा येथील पुज्य सानेगुरुजी विद्याप्रसारक मंडळ शिक्षणशास्त्र महाविद्यालय एस़एच़ नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय आदींमध्ये विद्याथ्र्याचा जास्त ओढा असल्याची माहिती देण्यात आली आह़े पुढील वर्षापासून बीएड्चा कालावधी वाढण्याची चर्चा सर्वत्र सुरु झालेली आह़े काही वर्षापूर्वी केवळ 9 महिन्यांचा बीएड्चा अभ्यासक्रम करण्यात आला होता़ त्यानंतर पुन्हा अभ्यासक्रमात वाढ होऊ त्याचा कालावधी 2 वर्षाचा करण्यात आला आह़ेबीएड्ची तिसरी प्रवेश फेरी  साधारणत: 6 ऑक्टोबरपासून सुरु होणार असल्याने त्यासाठी विद्याथ्र्याकडून जात वैधता प्रमाणपत्र दाखला, महाराष्ट्र रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला आदी विविध दाखल्यांची जुळवाजुळव करावी लागत आह़े ऑपशन फॉर्म एडिट करण्यासाठी 25 सप्टेंबर ही शेवटची मुदत होती़ त्यामुळे विद्याथ्र्याकडून सायबर कॅफे तसेच महाविद्यालयात गर्दी करण्यात आली होती़ त्याच प्रकारे ओबीसी, एससी, एसटी आदी विविध कोटय़ातून प्रवेश मिळणार असल्याने साहजिकच त्या-त्या प्रशासकीय यंत्रणेकडून जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठीही धडपड करण्यात येत आह़ेजिल्ह्यातील आदिवासी विद्याथ्र्याना त्यांच्या जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आह़े नंदुरबार येथील  अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीच्या कार्यालयात जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी विद्याथ्र्याची मोठी गर्दी करण्यात येत असत़े परंतु प्रशासनाचे ढिसाळ नियोजन असल्याने विद्याथ्र्याची गैरसोय होत आह़ेत्या तुलनेत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण विभागाकडून एससी, ओबीसी आदी संवर्गातील विद्याथ्र्याना लागलीच जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात येत असल्याने विद्याथ्र्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े