शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

साडेतीनशे शाळांना मिळणार सौरउर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 12:04 IST

वीज जोडणीची अडचण : दुर्गम भागातील सर्वाधिक शाळा, प्रस्ताव तयार करणार

ठळक मुद्देअंगणवाडींना सर्वाधिक उपयोग होणार.. अंगणवाडय़ांना सध्या अमृत आहार योजना, कुपोषीत बालकांची काळजी, त्यांची नोंदणी, वेळोवेळी वजन घेणे, पोषण आहार योजना यासह इतर विविध योजनांसाठी काम करावे लागते. ही बाब लक्षात घेता अंगणवाडींचा सर्व रेकॉर्ड ठेवण्यासाठी त्यांना सं

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील साडेतीनशे प्राथमिक शाळा व जवळपास अडीच हजार अंगणवाडय़ांना वीज जोडणी नसल्यामुळे अनेक योजना राबवितांना अडचणी येत आहेत. डिजीटल शाळा उपक्रम देखील यामुळे अडकला आहे. ही समस्या लक्षात घेवून आता वीज पुरवठा नसलेल्या शाळा आणि अंगणवाडी यांना सौर उज्रेद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.   जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी यांना अनेक ठिकाणी वीज पुरवठा होऊ शकत नाही. त्याला कारण भौगोलिक परिस्थिती किंवा संबधीत शाळेर्पयत वीज पोहचलेली नाही. त्यामुळे अशा शाळा डिजीटल होण्यापासून वंचीत आहेत. शिवाय अशा शाळांमध्ये संगणकावरील काम किंवा इतर तत्सम उपक्रम राबविण्यास देखील अनेक अडचणी येत असतात. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी आता वीज कंपनी आणि जिल्हा प्रशासनाने अशा शाळांमध्ये सौर उज्रेद्वारा वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवडय़ात जिल्ह्यात येवून गेलेले उर्जामंत्र्यांनी याबाबत माहिती घेवून तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने वीज कंपनी आणि जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. जिल्हा परिषद शाळानंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यात एकुण एक हजार 393 शाळा चालविल्या जातात. यापैकी एक हजार 53 शाळांना वीज पुरवठा जोडणी देण्यात आलेली आहे. परंतु त्यातही अनेक शाळांची वीज थकबाकी किंवा इतर कारणांनी वीज पुरवठा खंडित झालेला आहे. पुन्हा नव्याने त्यांना वीज जोडणी मिळू शकलेली नाही. अशा शाळांची संख्या देखील 100 पेक्षा अधीक आहे. त्यामुळे वीज नसलेल्या अशा एकुण जवळपास साडेचारशे शाळा असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक शाळेला वीज जोडणी आवश्यक आहे. त्याआधारे संगणकावरील कामकाज, विद्याथ्र्याना संगणकाचे शिक्षण देणे, विविध प्रयोगांसाठी देखील वीज आवश्यक असते.सर्वाधिक दुर्गम भागातीलवीज जोडणी नसलेल्या सर्वाधिक शाळा या दुर्गम भागातील आहेत. अशा शाळांच्या गावाच्या ठिकाणीच वीज पोहचलेली नाही तेथे शाळेला कुठून वीज मिळेल असा प्रश्न आहे. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील सर्वाधिक शाळा आहेत. या दोन्ही तालुक्यातील 300 तर इतर तालुक्यातील 40 शाळांचा समावेश आहे.अडीच हजार अंगणवाडय़ाजिल्ह्यात दोन हजार 434 अंगणवाडी आहेत. त्यापैकी एकाही अंगणवाडीला वीज जोडणी नसल्याचे सांगण्यात आले. केवळ 17 अंगणवाडय़ांनी वीज पुरवठय़ासाठी कोटेशन भरलेले आहे. अद्याप त्यांना वीज जोडणी मिळालेली नाही. लवकरच या अंगणवाडींना वीज जोडणी मिळणार आहे. आता सर्वच अर्थात अडीच हजार अंगणवाडींना वीज पुरवठा करण्यासाठी पाऊले उचलण्यात आली आहेत. या अंगणवाडींना सौर उज्रेवर आधारीत वीज पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी डीपीआर तयार करण्यात येणार   असून त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले