शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

साडेतीनशे शाळांना मिळणार सौरउर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 12:04 IST

वीज जोडणीची अडचण : दुर्गम भागातील सर्वाधिक शाळा, प्रस्ताव तयार करणार

ठळक मुद्देअंगणवाडींना सर्वाधिक उपयोग होणार.. अंगणवाडय़ांना सध्या अमृत आहार योजना, कुपोषीत बालकांची काळजी, त्यांची नोंदणी, वेळोवेळी वजन घेणे, पोषण आहार योजना यासह इतर विविध योजनांसाठी काम करावे लागते. ही बाब लक्षात घेता अंगणवाडींचा सर्व रेकॉर्ड ठेवण्यासाठी त्यांना सं

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील साडेतीनशे प्राथमिक शाळा व जवळपास अडीच हजार अंगणवाडय़ांना वीज जोडणी नसल्यामुळे अनेक योजना राबवितांना अडचणी येत आहेत. डिजीटल शाळा उपक्रम देखील यामुळे अडकला आहे. ही समस्या लक्षात घेवून आता वीज पुरवठा नसलेल्या शाळा आणि अंगणवाडी यांना सौर उज्रेद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.   जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी यांना अनेक ठिकाणी वीज पुरवठा होऊ शकत नाही. त्याला कारण भौगोलिक परिस्थिती किंवा संबधीत शाळेर्पयत वीज पोहचलेली नाही. त्यामुळे अशा शाळा डिजीटल होण्यापासून वंचीत आहेत. शिवाय अशा शाळांमध्ये संगणकावरील काम किंवा इतर तत्सम उपक्रम राबविण्यास देखील अनेक अडचणी येत असतात. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी आता वीज कंपनी आणि जिल्हा प्रशासनाने अशा शाळांमध्ये सौर उज्रेद्वारा वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवडय़ात जिल्ह्यात येवून गेलेले उर्जामंत्र्यांनी याबाबत माहिती घेवून तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने वीज कंपनी आणि जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. जिल्हा परिषद शाळानंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यात एकुण एक हजार 393 शाळा चालविल्या जातात. यापैकी एक हजार 53 शाळांना वीज पुरवठा जोडणी देण्यात आलेली आहे. परंतु त्यातही अनेक शाळांची वीज थकबाकी किंवा इतर कारणांनी वीज पुरवठा खंडित झालेला आहे. पुन्हा नव्याने त्यांना वीज जोडणी मिळू शकलेली नाही. अशा शाळांची संख्या देखील 100 पेक्षा अधीक आहे. त्यामुळे वीज नसलेल्या अशा एकुण जवळपास साडेचारशे शाळा असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक शाळेला वीज जोडणी आवश्यक आहे. त्याआधारे संगणकावरील कामकाज, विद्याथ्र्याना संगणकाचे शिक्षण देणे, विविध प्रयोगांसाठी देखील वीज आवश्यक असते.सर्वाधिक दुर्गम भागातीलवीज जोडणी नसलेल्या सर्वाधिक शाळा या दुर्गम भागातील आहेत. अशा शाळांच्या गावाच्या ठिकाणीच वीज पोहचलेली नाही तेथे शाळेला कुठून वीज मिळेल असा प्रश्न आहे. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील सर्वाधिक शाळा आहेत. या दोन्ही तालुक्यातील 300 तर इतर तालुक्यातील 40 शाळांचा समावेश आहे.अडीच हजार अंगणवाडय़ाजिल्ह्यात दोन हजार 434 अंगणवाडी आहेत. त्यापैकी एकाही अंगणवाडीला वीज जोडणी नसल्याचे सांगण्यात आले. केवळ 17 अंगणवाडय़ांनी वीज पुरवठय़ासाठी कोटेशन भरलेले आहे. अद्याप त्यांना वीज जोडणी मिळालेली नाही. लवकरच या अंगणवाडींना वीज जोडणी मिळणार आहे. आता सर्वच अर्थात अडीच हजार अंगणवाडींना वीज पुरवठा करण्यासाठी पाऊले उचलण्यात आली आहेत. या अंगणवाडींना सौर उज्रेवर आधारीत वीज पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी डीपीआर तयार करण्यात येणार   असून त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले