शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

सौर पॅनलमुळे मोलगीत दूरसंचार सेवा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नियमित वीज पुरवठा होत नसल्याने मोलगीतील बीएसएनएल टॉवरमधून सेवाच मिळत नव्हती, यातून बीएसएनएल टिकेचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नियमित वीज पुरवठा होत नसल्याने मोलगीतील बीएसएनएल टॉवरमधून सेवाच मिळत नव्हती, यातून बीएसएनएल टिकेचे धनी ठरले. बहुतांश कामे आॅनलाईन झाली, परंतु मोलगीत सेवेअभावी कामे होत नसल्याने तक्रारी वाढल्या. असे असतांनाच राज्यपाल कोश्यारी दौऱ्यावर आले, दरम्यान दूरसंचार सेवेबाबत प्रश्न उपस्थित झाला. त्यानुसार टॉवरसाठी स्वतंत्र सौर उर्जेचे पॅनल मजूर करीत दूसंचार सेवा सुरळीत करण्यात आली.दुर्गम भागातील प्रमुख बाजारपेठेच्या ठिकाणांपैकी मोलगी हे गाव असून तेथे तीन राज्यातील नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे तेथे सर्वच सुविधांची आवश्यकता भासत असते. परंतु सद्यस्थितीत अतिमहत्वाची ठरणारी दूरसंचार सेवाच मिळत नव्हती. त्यामुळे वारंवार नागरिकांमार्फत तक्रारी करण्यात आल्या. तर आॅनलाईन कामे रखडत असल्याने ग्रहकांमधील संतापाची तीव्रताही वाढली. दरम्यान संतप्त ग्राहकांकडून टॉवर जाळण्याची तयारीही करण्यात आली होती. काही महिन्यापासून सेवा पूर्णत: बंद पडली असतांनाच राज्यपाल कोश्यारी हे मोलगी दौºयावर आले होते.राज्यपालांच्या दौºयाच्या वेळेसही दूरसंचार विभागाची हीच परिस्थितीत तेथे पाहायला मिळाली. तर नागरिकांकडूनही याबाबत काही तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारींचा आढावा घेतता असता. वीज वितरणकडून पुरेसा वीज पुरवठा होत नसल्यामुळे दूरसंचारच्या सेवेवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. तेथील सेवेची गरज लक्षात घेत बीएसएनएलमार्फत मोलगी टॉवरसाठी स्वतंत्र सौर पॅनल मंजूर झाले. त्यामुळे मोलगीसह परिसरातील ग्राहकांना सुरळीत सेवा मिळणार असल्याची माहिती अभियंता तसेच केंद्राचे प्रभारी गिरासे यांनी दिली.४नव्याने बसविण्यात आलेल्या सौर ऊर्जा पॅनलची क्षमता तीन किलो वॅट आहे. त्यामुळे बीएसएनएल टॉवरच्या माध्यमातून पूर्ण क्षमतेने ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात झाली आहे. या टॉवरची क्षमता पाच किलो मिटरची असल्याचे सांगण्यात येत असल्याने मोलगीकर, बाजार व अन्य कामानिमित्त येणारे नागरिकांसह भगदरी, काठी, निंबीपाडा, बिजरीपाटी, साकलीउमर, बोतवा, उखिल्ली सोरासापडा बिजरीगव्हाण येथील ग्राहकांनाही या टॉवरच्या माध्यमातून सेवा मिळणार आहे.४खंडीत वीज पुरवठ्यामुळे दूसंचारच्या सेवेवर मोठा परिणाम होत होता. अपेक्षित वीज पुरवठा करण्यासाठी बीएसएनएलकडून वीज वितरणकडे वारंवार पाठपुरावा करुनही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे बीएसएनएलने स्वतंत्र सौर ऊर्जेचे पॅनल उपलब्ध करुन देण्यासाठी निती आयोगाकडे दि. ४ नोव्हेंबर २०१९ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रस्ताव देत मागणी केली होती. प्रस्ताव दाखल केल्यानंतरही पाठपुरावा करण्यात आला. परंतु या पॅनलसाठी कुठल्याही हालचाली होतांना दिसून आल्या नाही. त्यामुळे प्रस्ताव मंजूर होण्याची कुठलीही प्रतिक्षा न करता बीएसएनएलमार्फतच स्वतंत्र पॅनल मंजूर करण्यात आले आहे.