शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

सौर पॅनलमुळे मोलगीत दूरसंचार सेवा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नियमित वीज पुरवठा होत नसल्याने मोलगीतील बीएसएनएल टॉवरमधून सेवाच मिळत नव्हती, यातून बीएसएनएल टिकेचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नियमित वीज पुरवठा होत नसल्याने मोलगीतील बीएसएनएल टॉवरमधून सेवाच मिळत नव्हती, यातून बीएसएनएल टिकेचे धनी ठरले. बहुतांश कामे आॅनलाईन झाली, परंतु मोलगीत सेवेअभावी कामे होत नसल्याने तक्रारी वाढल्या. असे असतांनाच राज्यपाल कोश्यारी दौऱ्यावर आले, दरम्यान दूरसंचार सेवेबाबत प्रश्न उपस्थित झाला. त्यानुसार टॉवरसाठी स्वतंत्र सौर उर्जेचे पॅनल मजूर करीत दूसंचार सेवा सुरळीत करण्यात आली.दुर्गम भागातील प्रमुख बाजारपेठेच्या ठिकाणांपैकी मोलगी हे गाव असून तेथे तीन राज्यातील नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे तेथे सर्वच सुविधांची आवश्यकता भासत असते. परंतु सद्यस्थितीत अतिमहत्वाची ठरणारी दूरसंचार सेवाच मिळत नव्हती. त्यामुळे वारंवार नागरिकांमार्फत तक्रारी करण्यात आल्या. तर आॅनलाईन कामे रखडत असल्याने ग्रहकांमधील संतापाची तीव्रताही वाढली. दरम्यान संतप्त ग्राहकांकडून टॉवर जाळण्याची तयारीही करण्यात आली होती. काही महिन्यापासून सेवा पूर्णत: बंद पडली असतांनाच राज्यपाल कोश्यारी हे मोलगी दौºयावर आले होते.राज्यपालांच्या दौºयाच्या वेळेसही दूरसंचार विभागाची हीच परिस्थितीत तेथे पाहायला मिळाली. तर नागरिकांकडूनही याबाबत काही तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारींचा आढावा घेतता असता. वीज वितरणकडून पुरेसा वीज पुरवठा होत नसल्यामुळे दूरसंचारच्या सेवेवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. तेथील सेवेची गरज लक्षात घेत बीएसएनएलमार्फत मोलगी टॉवरसाठी स्वतंत्र सौर पॅनल मंजूर झाले. त्यामुळे मोलगीसह परिसरातील ग्राहकांना सुरळीत सेवा मिळणार असल्याची माहिती अभियंता तसेच केंद्राचे प्रभारी गिरासे यांनी दिली.४नव्याने बसविण्यात आलेल्या सौर ऊर्जा पॅनलची क्षमता तीन किलो वॅट आहे. त्यामुळे बीएसएनएल टॉवरच्या माध्यमातून पूर्ण क्षमतेने ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात झाली आहे. या टॉवरची क्षमता पाच किलो मिटरची असल्याचे सांगण्यात येत असल्याने मोलगीकर, बाजार व अन्य कामानिमित्त येणारे नागरिकांसह भगदरी, काठी, निंबीपाडा, बिजरीपाटी, साकलीउमर, बोतवा, उखिल्ली सोरासापडा बिजरीगव्हाण येथील ग्राहकांनाही या टॉवरच्या माध्यमातून सेवा मिळणार आहे.४खंडीत वीज पुरवठ्यामुळे दूसंचारच्या सेवेवर मोठा परिणाम होत होता. अपेक्षित वीज पुरवठा करण्यासाठी बीएसएनएलकडून वीज वितरणकडे वारंवार पाठपुरावा करुनही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे बीएसएनएलने स्वतंत्र सौर ऊर्जेचे पॅनल उपलब्ध करुन देण्यासाठी निती आयोगाकडे दि. ४ नोव्हेंबर २०१९ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रस्ताव देत मागणी केली होती. प्रस्ताव दाखल केल्यानंतरही पाठपुरावा करण्यात आला. परंतु या पॅनलसाठी कुठल्याही हालचाली होतांना दिसून आल्या नाही. त्यामुळे प्रस्ताव मंजूर होण्याची कुठलीही प्रतिक्षा न करता बीएसएनएलमार्फतच स्वतंत्र पॅनल मंजूर करण्यात आले आहे.