शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

केळीच्या खांबांसोबत जळाली सामाजिक वनीकरणाची झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 13:01 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 25 : नंदुरबार तालुक्यातील पाचोराबारी ते करणखेडा रस्त्या दरम्यान असलेल्या धिरजगाव फाटय़ाजवळ अज्ञातांकडून केळीचे खांब जाळण्यात आले आह़े परंतु या खांबासोबत सामाजिक वनीकरण विभागाकडून लावण्यात आलेली झाडेही जळून खाक झाली असल्याची भिषण घटना समोर आली आह़े या घटनेबाबत पर्यावरण प्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आह़े सध्या केळीचा ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 25 : नंदुरबार तालुक्यातील पाचोराबारी ते करणखेडा रस्त्या दरम्यान असलेल्या धिरजगाव फाटय़ाजवळ अज्ञातांकडून केळीचे खांब जाळण्यात आले आह़े परंतु या खांबासोबत सामाजिक वनीकरण विभागाकडून लावण्यात आलेली झाडेही जळून खाक झाली असल्याची भिषण घटना समोर आली आह़े या घटनेबाबत पर्यावरण प्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आह़े सध्या केळीचा हंगाम जोरात सुरु आह़े केळी काढल्यानंतर उर्वरीत केळीच्या खांबांची शेतक:यांकडून विल्हेवाट लावण्यात येत असत़े काही वेळा ऊस उत्पादक शेतक:यांकडून या केळीच्या खांबांना इतरत्र फेकूण देण्यात येत असत़े तर काहींकडून एखादी निजर्न ठिकाणी नेत खांब जाळून टाकण्यात येत असतात़ या ठिकाणीही मोकळ्या जागेत खांबांची जाळून विल्हेवाट लावण्यात आली आह़े परंतु लगतच इतरही वृक्ष असल्याने यामुळे तेदेखील जळून खाक झाले आहेत़ त्यामुळे संबंधित प्रशासनाने दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आह़े या ठिकाणी केळीचे खांब जाळण्यासाठी आणण्यात आले होत़े परंतु रस्त्यालगत लावण्यात आलेल्या वृक्षांजवळच हे खांब जाळल्याने तसेच उन्हामुळे या आगीने अधिकच पेट घेतल्याने साधारणात 20 ते 25 झाडांचे खोड या आगीत जळाले आह़े त्यामुळे पुढील काळात हे झाडे टिकाव धरु शकतील की नाही यावर प्रश्नचिन्ह आह़े अशाच घटना इतरही ठिकाणी होण्याची शक्यता असल्याने याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आह़े