शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

सापाला पकडून केली जनजागृती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील कलसाडी येथील जि.प. शाळेतील महिला शिक्षिकांनी सर्पमित्राच्या सहाय्याने शाळेतील साप जीवंत पकडून त्याला ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील कलसाडी येथील जि.प. शाळेतील महिला शिक्षिकांनी सर्पमित्राच्या सहाय्याने शाळेतील साप जीवंत पकडून त्याला जीवदान तर दिलेच त्यासोबत विद्यार्थ्यांच्या मनातील भीतीही घालवली.कलसाडी शाळेला चारही बाजूंनी संरक्षण भिंत आहे. तरीही १० ते १५ दिवसांपासून एक ‘पाणदिवळ’ जातीचा चार-साडेचार फुटाचा साप शाळेच्या परिसरात दिसायचा. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा साप १५ दिवसात तीन ते चारवेळेस दिसला आणि लगेच कुठेतरी लपून बसायचा. शनिवारी हा साप पुन्हा शाळेच्या मागच्या बाजूला विद्यार्थ्यांना दिसला. मुख्याध्यापक रजेवर असल्याने विद्यार्थ्यांनी उपशिक्षिका स्नेहल सर्जेराव गुगळे यांना साप निघाल्याचे सांगितले. गुगळे यांनी तात्काळ स्वत: सापाच्या दिशेने जात मीना पाटील व निर्मला सामुद्रे यांनाही बोलावले. या सापावर आता आपण व्यवस्थित लक्ष ठेवू आणि सर्पमित्रांच्या सहाय्याने कोणत्याही परिस्थितीत आपण याला आज जीवंत पकडू व विद्यार्थ्यांच्या मनातील भीती कोणत्याही परिस्थितीत घालवूच, असा या महिला शिक्षिकांनी निश्चत केला. याआधीही दोनवेळा त्या सापाला जीवंत पकडण्याचा प्रयत्न केला होता पण तो फटीत घुसून जायचा आणि कुठेतरी लपून बसायचा. स्नेहल गुगळे यांनी याआधी सर्पमित्र राजेश ठोंबरे यांच्याकडून साप पकडण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. परंतु आपले १० महिन्याचे लहान बाळ सोबत असल्याने त्यांनी यावेळेस स्वत: साप न पकडता त्यांच्या संपर्कातील शहादा येथील सर्पमित्र राहुल कोळी यांच्याशी फोनवर संपर्क करून त्यांना कलसाडी जि.प. शाळेत बोलावले. शहाद्याहून कलसाडीला सर्पमित्र येईपर्यंत जवळपास २० ते २५ मिनिटे या महिला शिक्षिका सापावर लक्ष ठेवूनच होत्या. सर्पमित्र आल्यावर काही वेळातच सापाला पकडून त्यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर स्नेहल गुगळे यांनीही स्वत: साप हाताळत तो पाणदिवड जातीचा बिनविषारी परंतु अतिशय चपळ व रागीट साप असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. आपल्याला कुठेही व कधीही साप आढळून आल्यास त्याला न मारता सर्पमित्रांना फोन करून बोलवावे मग ते साप पकडून पुढे पुन्हा एखाद्या शेतात सोडून देतात. त्याला स्पर्श झाल्याशिवाय किंवा आपण त्रास दिल्याशिवाय तो आपल्याला काहीही करत नाही, अशी माहिती मीना पाटील यांनी दिली. निर्मला सामुद्रे यांनीही साप हा शेतकऱ्याचा मित्र असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. कोकणी, कलाल सर व गांगुर्डे यांनी साप पकडण्याची मोहीम पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवले. सापाबद्दलची सर्व माहिती जाणून घेतल्यावर हा साप एक किलोमीटर अंतरावरील शेतातील पाण्यात सोडून देण्यात आला. महिला शिक्षिकांच्या या धाडसाचे गाव व परिसरात कौतुक होत आहे.