लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोळदा ते खेतिया या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. ठेकेदाराने रस्ता रुंदीकरण करताना मोठ्या प्रमाणावर वृक्षांची कत्तल केली आहे. त्यातच या महामार्गावर काही हिरव्यागार व सुस्थितीत असलेल्या वृक्षांना लाकूड तस्कारांनी आगी लावल्यामुळे वृक्षसंवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत संबंधीत विभागाने वेळीच लक्ष देण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.शहादा ते नंदुरबार मार्गावर अवैधपणे झाडे तोडून लाकडाची तस्करी करणाऱ्यांकडून विविध क्लृपत्या लढविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणजे झाडाच्या बुंध्याला आग लावून ते झाड पाडले जाते व रात्रीच्यावेळी आधुनिक हत्यारे वापरुन लाकूड लांबविले जाते. एकीकडे झाडे जगविण्यासाठी सर्वस्तरारून प्रयत्न होत असताना मात्र जी झाडे जगली आहेत, सावली देत आहेत त्यांना वाचविणार कोण? चांगल्या अवस्थेतील झाडे जाळून त्या लाकडाची तस्करी केली जात आहे. तरीही साधी कोणी विचारणा करताना दिसत नाही. झाडे लावण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात. मात्र प्रत्यक्षात ते वाचविण्यासाठी कोणताही प्रयत्न होत नाही. झाडांच्या बुंध्याला आग लावतो कोण? याचा साधा तपासही कोणी घेत नाही रस्त्यावरील चांगली झाडे रात्रीतूनच आग लावून खाली पाडली जातात. हे पाडणारे व त्याची विल्हेवाट लावणारे कोण? याचा शोध घेण्याची गरज आहे. महामार्गावर दिवसाढवळ्या असा प्रकार घडत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सर्रास अवैधपणे वृक्षतोड करणाऱ्यांकडे वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने लाकूड तस्करांचे फावले आहे. संबंधितांनी लाकड तस्करांवर कडक कारवाई करुन त्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींसह वाहनधारकांकडून केली जात आहे.झाडांच्या बुंध्यांना आग लावून त्या लाकडाची तस्करी करण्याचा प्रकार नवीन नसून दिवसाढवळ्या झाडांना आगी लावल्याचे चित्र महामार्गावर ये-जा करणाºयांना सहज दिसते. शहादा ते प्रकाशा रस्त्यावर हा प्रकार अनेकवेळा पहावयास मिळत आहे. गेल्या आठवडाभरात दोन ते तीन हिरव्यागार झाडांच्या बुंध्याला आगी लावण्यात आल्या. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे सर्वत्र शांतता आहे. याचाच फायदा हे लोक घेत आहेत.
झाडांना आगी लावून लाकडाची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 12:47 IST