शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
4
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
7
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
8
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
9
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
10
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
11
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
12
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
13
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
14
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
15
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
16
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
17
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
18
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
19
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
20
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी

तिधारे पुलाचा स्लॅब काम पूर्ण होण्याआधीच वाकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:29 IST

याबाबत अपूर्ण कामाबद्दल वृत्तपत्रातून सविस्तर वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेऊन काही प्रमाणात हालचाल केली. या वेळी आमदार ...

याबाबत अपूर्ण कामाबद्दल वृत्तपत्रातून सविस्तर वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेऊन काही प्रमाणात हालचाल केली. या वेळी आमदार राजेश पाडवी यांनीही समक्ष भेट देऊन सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर वर्षभरात रस्त्याचे काम पूर्ण झाले व पुलाच्या उर्वरित कामालाही सुरुवात झाली.

पुलाचे निकृष्ट बांधकाम

तिधारे गावाजवळील लाखो रुपये खर्चाच्या पुलाचे बांधकाम अनेक वर्ष अपूर्ण असताना याबाबत आवाज उठविल्यावर या कामास दिवाळीपूर्वी सुरुवात झाली. वास्तविक अपूर्ण कामाबाबत आमदार राजेश पाडवी यांनी समक्ष भेट देत कामाची चौकशी करून संबंधित अभियंता व ठेकेदार यांच्यावर निश्चित कारवाई होईल व कामाचा योग्य दर्जा ठेवून काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र आता या पुलाच्या कामाची स्थिती बघितल्यास काम अजूनही अपूर्णच असून, काम अत्यंत निकृष्ट व हलक्या दर्जाचे झाले आहे. भविष्यात पुलावरून वाहतूक सुरू झाल्यास तो लवकरच कमकुवत होऊन केव्हा कोसळेल याचा नेम नाही, अशी भीतीदेखील ग्रामस्थांनी बोलून दाखविली.

पुलाचा स्लॅब टाकताना लोखंचे प्रमाण व सिमेंटचे प्रमाण कमी वापरण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या पुलाचा स्लॅबदेखील आताच वाकून गेला आहे. यावरून काम कसे झाले असेल हे कुणा तज्ञाला सांगण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया काही जागरूक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

लोकप्रतिनिधी गप्प का?; प्रशासनही सुस्त

रस्त्यासह पुलाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असताना व तेही धिम्या गतीने काम होत असल्याने या भागातील कामांबाबत संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तिधारे भागातील कामाबाबत आमदारांनी अभियंता व ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असताना संबंधितांवर काय करवाई झाली असा प्रश्न उपस्थित होत असून, आताही काम निकृष्ट होत असताना तक्रारी होऊनही लोकप्रतिनिधी गप्प का? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रस्ता व पुलाच्या कामाची गुण व नियंत्रण समितीकडून चौकशी व्हावी

तिधारे भागातील रस्ता, पुलाच्या कामाची गुण व नियंत्रण विभाग यांच्यामार्फत सखोल चौकशी होऊन काम तातडीने योग्य दर्जाने पूर्ण करण्यात यावे, अन्यथा जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.