शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

तिधारे पुलाचा स्लॅब काम पूर्ण होण्याआधीच वाकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:29 IST

याबाबत अपूर्ण कामाबद्दल वृत्तपत्रातून सविस्तर वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेऊन काही प्रमाणात हालचाल केली. या वेळी आमदार ...

याबाबत अपूर्ण कामाबद्दल वृत्तपत्रातून सविस्तर वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेऊन काही प्रमाणात हालचाल केली. या वेळी आमदार राजेश पाडवी यांनीही समक्ष भेट देऊन सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर वर्षभरात रस्त्याचे काम पूर्ण झाले व पुलाच्या उर्वरित कामालाही सुरुवात झाली.

पुलाचे निकृष्ट बांधकाम

तिधारे गावाजवळील लाखो रुपये खर्चाच्या पुलाचे बांधकाम अनेक वर्ष अपूर्ण असताना याबाबत आवाज उठविल्यावर या कामास दिवाळीपूर्वी सुरुवात झाली. वास्तविक अपूर्ण कामाबाबत आमदार राजेश पाडवी यांनी समक्ष भेट देत कामाची चौकशी करून संबंधित अभियंता व ठेकेदार यांच्यावर निश्चित कारवाई होईल व कामाचा योग्य दर्जा ठेवून काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र आता या पुलाच्या कामाची स्थिती बघितल्यास काम अजूनही अपूर्णच असून, काम अत्यंत निकृष्ट व हलक्या दर्जाचे झाले आहे. भविष्यात पुलावरून वाहतूक सुरू झाल्यास तो लवकरच कमकुवत होऊन केव्हा कोसळेल याचा नेम नाही, अशी भीतीदेखील ग्रामस्थांनी बोलून दाखविली.

पुलाचा स्लॅब टाकताना लोखंचे प्रमाण व सिमेंटचे प्रमाण कमी वापरण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या पुलाचा स्लॅबदेखील आताच वाकून गेला आहे. यावरून काम कसे झाले असेल हे कुणा तज्ञाला सांगण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया काही जागरूक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

लोकप्रतिनिधी गप्प का?; प्रशासनही सुस्त

रस्त्यासह पुलाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असताना व तेही धिम्या गतीने काम होत असल्याने या भागातील कामांबाबत संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तिधारे भागातील कामाबाबत आमदारांनी अभियंता व ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असताना संबंधितांवर काय करवाई झाली असा प्रश्न उपस्थित होत असून, आताही काम निकृष्ट होत असताना तक्रारी होऊनही लोकप्रतिनिधी गप्प का? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रस्ता व पुलाच्या कामाची गुण व नियंत्रण समितीकडून चौकशी व्हावी

तिधारे भागातील रस्ता, पुलाच्या कामाची गुण व नियंत्रण विभाग यांच्यामार्फत सखोल चौकशी होऊन काम तातडीने योग्य दर्जाने पूर्ण करण्यात यावे, अन्यथा जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.