शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
3
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
4
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
5
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
6
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
7
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
8
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
9
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
10
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
11
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
12
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
13
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
14
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
15
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
16
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
17
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
18
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
19
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
20
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

तिधारे पुलाचा स्लॅब काम पूर्ण होण्याआधीच वाकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:29 IST

याबाबत अपूर्ण कामाबद्दल वृत्तपत्रातून सविस्तर वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेऊन काही प्रमाणात हालचाल केली. या वेळी आमदार ...

याबाबत अपूर्ण कामाबद्दल वृत्तपत्रातून सविस्तर वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेऊन काही प्रमाणात हालचाल केली. या वेळी आमदार राजेश पाडवी यांनीही समक्ष भेट देऊन सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर वर्षभरात रस्त्याचे काम पूर्ण झाले व पुलाच्या उर्वरित कामालाही सुरुवात झाली.

पुलाचे निकृष्ट बांधकाम

तिधारे गावाजवळील लाखो रुपये खर्चाच्या पुलाचे बांधकाम अनेक वर्ष अपूर्ण असताना याबाबत आवाज उठविल्यावर या कामास दिवाळीपूर्वी सुरुवात झाली. वास्तविक अपूर्ण कामाबाबत आमदार राजेश पाडवी यांनी समक्ष भेट देत कामाची चौकशी करून संबंधित अभियंता व ठेकेदार यांच्यावर निश्चित कारवाई होईल व कामाचा योग्य दर्जा ठेवून काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र आता या पुलाच्या कामाची स्थिती बघितल्यास काम अजूनही अपूर्णच असून, काम अत्यंत निकृष्ट व हलक्या दर्जाचे झाले आहे. भविष्यात पुलावरून वाहतूक सुरू झाल्यास तो लवकरच कमकुवत होऊन केव्हा कोसळेल याचा नेम नाही, अशी भीतीदेखील ग्रामस्थांनी बोलून दाखविली.

पुलाचा स्लॅब टाकताना लोखंचे प्रमाण व सिमेंटचे प्रमाण कमी वापरण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या पुलाचा स्लॅबदेखील आताच वाकून गेला आहे. यावरून काम कसे झाले असेल हे कुणा तज्ञाला सांगण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया काही जागरूक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

लोकप्रतिनिधी गप्प का?; प्रशासनही सुस्त

रस्त्यासह पुलाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असताना व तेही धिम्या गतीने काम होत असल्याने या भागातील कामांबाबत संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तिधारे भागातील कामाबाबत आमदारांनी अभियंता व ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असताना संबंधितांवर काय करवाई झाली असा प्रश्न उपस्थित होत असून, आताही काम निकृष्ट होत असताना तक्रारी होऊनही लोकप्रतिनिधी गप्प का? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रस्ता व पुलाच्या कामाची गुण व नियंत्रण समितीकडून चौकशी व्हावी

तिधारे भागातील रस्ता, पुलाच्या कामाची गुण व नियंत्रण विभाग यांच्यामार्फत सखोल चौकशी होऊन काम तातडीने योग्य दर्जाने पूर्ण करण्यात यावे, अन्यथा जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.