शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

साडेसहा हजार कुटूंबांना शिधापत्रिका मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ७५९ कुटुंबांना ३०० क्विंटल तांदुळाचे वाटप करण्यात आले आहे. योजनेअंतर्गत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ७५९ कुटुंबांना ३०० क्विंटल तांदुळाचे वाटप करण्यात आले आहे. योजनेअंतर्गत २,३९९ शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले असून ६,५०० कुटुंबांना शिधापत्रिका देण्याचे प्रशासनाचे उद्दीष्ट आहे.पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी आढावा बैठकीत शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांना धान्य देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी जिल्ह्यात मोहिम स्तरावर शिधापत्रिका देण्याचा कार्यक्रम राबविला आहे. आदिवासी कुटुंबांना शिधापत्रिका बनविण्यासाठी येणारा खर्च न्यूक्लिअस बजेटमधून करण्यात येत आहे. आदिवासी प्रकल्प कार्यालयाने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.लॉकडाऊनच्या काळात शिधापत्रिका नसलेल्यांना आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अशा कुटुंबांना सार्वजनिक वितरण प्रणालीचा नियमित लाभ व्हावा यासाठी शिधापत्रिका तयार करण्याची व वाटपाची मोहिम जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. त्यानुसार नंदुरबार तालुक्यात ४००, अक्कलकुवा २५५, तळोदा १००, अक्राणी १,३४५, नवापूर ६९ आणि शहादा तालुक्यात २३० शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे.जिल्ह्यातील ६,५०० कुटुंबांना शिधापत्रिका देण्याचे उद्दीष्ट असून कुटुंबातील ३२ हजार सदस्यांना प्रत्येकी ५ किलो मोफत तांदूळ आणि हरभरा देण्यात येणार आहे. मे आणि जून महिन्याकरिता १,८९८ क्विंटल तांदूळ आणि ९२ क्विंटल हरभराचे नियतन शासनाने उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यात ७५९ कुटुंबातील २,९७८ सदस्यांना ३०० क्विंटल तांदळाचे वाटपही करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांना पुरवठा विभागाच्या या मोहिमेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शिधापत्रिका मोहिमेमुळे आतापर्यंत सार्वजनिक वितरण प्रणालीचा लाभ न घेतलेल्या नागरिकांनादेखील हा लाभ मिळणार आहे.ही मोहिम सुरू राहणार असून नागरिकांनी शिधापत्रिका नोंदणीसाठी तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेस संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी केले आहे.