शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
5
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
6
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
7
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
8
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
9
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
10
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
11
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
12
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
13
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
14
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
15
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
16
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
17
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
18
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
19
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

चिनी वस्तू वापरावर नागरिकांकडून अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 21:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : चीनच्या सूडबुद्धीला आव्हान देण्याच्या निमित्ताने बऱ्याच नागरिकांकडून चिनी वस्तूंच्या वापरावर बंदी आणली आहे. त्यानिमित्ताने ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : चीनच्या सूडबुद्धीला आव्हान देण्याच्या निमित्ताने बऱ्याच नागरिकांकडून चिनी वस्तूंच्या वापरावर बंदी आणली आहे. त्यानिमित्ताने कानुबाई, दशामाता गणेशोत्सवासाठी बाजारात विक्रीस आलेल्या चिनी वस्तूंच्या मागणीत सुमारे १५ टक्क्यांनी मागणी घटल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.सण-उत्सव म्हटला की नागरिकांकडून आकर्षक आरास, देखावा तयार करण्यावर भर दिला जातो. त्यासाठी विशेषत: चिनी वस्तूंचा अधिक वापर करण्यात येतो. या वेळी सजावटीसाठी लागणारे कमल फूल, झाड, मेटल बल्ब, लहान-मोठी लायटींग, स्पॉटलाईट, एलईडी स्ट्रीप, लेझर लाईट, नारळ, एलईडी पार लाईट, ड्रॉप लाईट अशा विविध प्रकारच्या वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. काही दिवसांपासून चीनकडून देण्यात येत असलेल्या धमक्यांमुळे देशवासीयांनी चिनी वस्तूंच्या वापरावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा चिनी वस्तूंच्या विक्री व वापरावर परिणाम झाला आहे.राख्यांमध्ये ‘मेड इन इंडिया’चाबोलबालायावर्षी कोरोनामुळे राखी बाजारावर परिणाम झाला आहे. दरवर्षी एक महिन्यापूर्वीच राख्यांची बाजारपेठ सजत होती. पण यावर्षी पाच ते सहा दिवसापूर्वी ग्रामीण भागातील बाजारात राख्यांची दुकाने पहायला मिळाली. चिनी राख्यांच्या किमतीच्या तुलनेत यावर्षी भारतीय राख्या २० टक्के महाग झाल्या. १५ रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत किंमत होती. प्रत्येक राखीची कलाकुसर आकर्षक असल्याने प्रत्येकाचे मन मोहून घेतले. मुलांसाठी कार्टून कॅरेक्टरच्या अनेक राख्या उपलब्ध होत्या. त्यात डोरेमॅन, छोटा भीम आणि लायटिंगच्या राख्यांचा समावेश होता.बाजारात जुन्या चिनी राख्यांची विक्रीशहादा शहरातील व्यापारी म्हणाले की, ज्या व्यापाऱ्यांकडे गेल्यावर्षीच्या जुन्या चिनी राख्यांचा साठा आहे , ते त्या राख्यांची विक्री करीत आहेत. यंदा चिनी राख्या कोणत्याही ठोक व्यापाºयांनी मागविल्या नाहीत. बाजारातही भारतीय बनावटीच्या राख्यांना मागणी होती. सध्या २५ टक्केही व्यवसाय झालेला नाही. जनता कर्फ्यू आणि लॉकडाऊनच्या भीतीने व्यापारी संभ्रमात आहेत.काही नागरिकांकडूनचिनी वस्तू खरेदीसध्या कोरोना विषाणूने सर्वत्र धुमाकूळ घातला असून ग्रामीण भागातील जनतेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. यामध्ये सण-उत्सवाला सुरुवात झाली आहे. काही नागरिक आर्थिक बाजू कुमकुवत जरी झाली आहे तरी सण-उत्सव साजरे करण्यावर भर देत आहेत. सजावटीसाठी लागणारे चिनी वस्तू स्वस्त दरात मिळत असल्याने चिनी वस्तू खरेदीकडे गोरगरीब जनतेचा काही प्रमाणात कल लागला आहे.