लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील व्यावसायिक दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू ठेवण्यास परवाणगी द्यावी अशी मागणी भाजपने केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्हा ग्रीन झोन झाला आहे. परिस्थितीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहे. जिल्ह्यात सकाळी ८ ते १२ व दुपारी ४ ते सायंकाळी ७ या कालावधीत दुकाने व्यवसाय सुरू करण्याची परवानगी आहे. सकाळी दुकाने सुरू झाल्यानंतर १२ वाजता पुन्हा बंद करणे, घरी जाणे आणि घरून पुन्हा चार वाजता दुकानावर येणे हे व्यापाऱ्यांच्या या दृष्टिकोनातून गैरसोयीचे आहे. वेगवेगळ्या व्यवसायिकांना आपली दुकाने सुरू करताना त्या त्या दुकानात कामगार वर्ग देखील असतो बहुतांश कामगार वर्ग हा ग्रामिण भागातील आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत त्यांना अडचण येते. याशिवाय भाजीपाला व्यवसायिकांनादेखील अडचणी येतात.पोलिस यंत्रणेवर देखील दुहेरी ताण पडत आहे. सात ते आठ तास लॉक डाउन कालावधीत सूट देत आहात ही सूट मध्ये कोणताही ब्रेक न देता नियमित करावी. सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत व्यापार-व्यवसाय दुकाने खुली करण्यास परवानगी द्यावी. भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी, खासदार हिना गावित, आमदार राजेश पाडवी, जिल्हा सरचिटणीस निलेश माळी आदी उपस्थित होते.