शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
4
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
5
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
7
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
8
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
9
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
10
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
11
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
12
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
13
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
14
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
15
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
16
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
17
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
18
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
19
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
20
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

संपुर्ण संचारबंदीमुळे शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रशासनाने शहरात रविवारपासून संपुर्ण संचारबंदी लागू केली असून भाजीपाला व किराणा दुकानेही बंद ठेवण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रशासनाने शहरात रविवारपासून संपुर्ण संचारबंदी लागू केली असून भाजीपाला व किराणा दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत. दवाखाना व औषध खरेदी व्यतिरिक्त कुणालाही रस्त्यावर फिरण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे शहरात सकाळपासूनच शुकशुकाट होता. पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरीकेड्स देखील लावले होते. शिवाय एसआरपीची तुकडीही तैणात केली आहे.जिल्ह्यालगतच्या काही शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी त्याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे शहरात दिवसभर पुर्ण शुकशुकाट होता.स्वयंस्फूर्त आणि सक्तीची...तीन आठवड्यापूर्वी अर्थात २२ मार्च रोजी पंतप्रधानांच्या आवाहानानुसार नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळला होता. त्या दिवशी जसा शुकशुकाट होता तसाच शुकशुकाट रविवार, १२ एप्रिल रोजी दिसून आला. २३ मार्च पासून लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली असली तरी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सूट देण्यात आली होती. त्यामुळे नागरिक खरेदीसाठी बाजारात गर्दी करीत होते. त्यामुळे वेळ ठरवून ती सकाळी ८ ते १२ करण्यात आली. तरीही गर्दीवर नियंत्रण राहत नव्हते. अखेर बाजारपेठ परिसरच सील करण्यात आल्याने त्यावर नियंत्रण मिळाले. परंतु रविवारी संपुर्ण संचारबंदी लागू करीत प्रशासनाने सक्तीने वागण्याचे ठरविल्याचे दिसून आले.भाजीपाला, किराणाही बंदरविवारी भाजीपाला विक्री, किराणा दुकान, फळ विक्री संपुर्णत: बंद करण्यात आली होती. केवळ दूध विक्री केंद्र ठराविक वेळेपुरते सुरू होते. औषधी दुकाने व हॉस्पीटल पुर्ण दिवस सुरू होते. पोलिसांनी शहरातील चारही प्रमुख चौफुलींवर बंदोबस्त तैणात केला होता. प्रत्येकाची चौकशी करूनच सोडले जात होते. ठिकठिकाणी आणि चौकाचौकात बंदोबस्त वाढविण्यात आला होता. एसआरपीची तुकडीही ठिकठिकाणी तैणात करण्यात आली होती. नागरिकांनीही प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.धानोरा येथे पाहुणे म्हणून आलेल्या तिघांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते गावात आले होते. याबाबतची कुणकुण गावातील लोकांना लागल्यावर प्रशासनाला कळविण्यात आले. प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने तिघांना शोधून काढले. त्यांना नंदुरबार येथील क्वारंटाईन केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या दोघांचीही तपासणी करून त्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले. दरम्यान इतरही गावांमध्ये असे कुणी पाहुणे आले असल्यास तातडीने प्रशासनाला कळवावे. नागरिकांनी देखील सतर्क राहून बाहेरच्या व्यक्तींना येवू देवू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.