शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

संपुर्ण संचारबंदीमुळे शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रशासनाने शहरात रविवारपासून संपुर्ण संचारबंदी लागू केली असून भाजीपाला व किराणा दुकानेही बंद ठेवण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रशासनाने शहरात रविवारपासून संपुर्ण संचारबंदी लागू केली असून भाजीपाला व किराणा दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत. दवाखाना व औषध खरेदी व्यतिरिक्त कुणालाही रस्त्यावर फिरण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे शहरात सकाळपासूनच शुकशुकाट होता. पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरीकेड्स देखील लावले होते. शिवाय एसआरपीची तुकडीही तैणात केली आहे.जिल्ह्यालगतच्या काही शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी त्याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे शहरात दिवसभर पुर्ण शुकशुकाट होता.स्वयंस्फूर्त आणि सक्तीची...तीन आठवड्यापूर्वी अर्थात २२ मार्च रोजी पंतप्रधानांच्या आवाहानानुसार नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळला होता. त्या दिवशी जसा शुकशुकाट होता तसाच शुकशुकाट रविवार, १२ एप्रिल रोजी दिसून आला. २३ मार्च पासून लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली असली तरी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सूट देण्यात आली होती. त्यामुळे नागरिक खरेदीसाठी बाजारात गर्दी करीत होते. त्यामुळे वेळ ठरवून ती सकाळी ८ ते १२ करण्यात आली. तरीही गर्दीवर नियंत्रण राहत नव्हते. अखेर बाजारपेठ परिसरच सील करण्यात आल्याने त्यावर नियंत्रण मिळाले. परंतु रविवारी संपुर्ण संचारबंदी लागू करीत प्रशासनाने सक्तीने वागण्याचे ठरविल्याचे दिसून आले.भाजीपाला, किराणाही बंदरविवारी भाजीपाला विक्री, किराणा दुकान, फळ विक्री संपुर्णत: बंद करण्यात आली होती. केवळ दूध विक्री केंद्र ठराविक वेळेपुरते सुरू होते. औषधी दुकाने व हॉस्पीटल पुर्ण दिवस सुरू होते. पोलिसांनी शहरातील चारही प्रमुख चौफुलींवर बंदोबस्त तैणात केला होता. प्रत्येकाची चौकशी करूनच सोडले जात होते. ठिकठिकाणी आणि चौकाचौकात बंदोबस्त वाढविण्यात आला होता. एसआरपीची तुकडीही ठिकठिकाणी तैणात करण्यात आली होती. नागरिकांनीही प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.धानोरा येथे पाहुणे म्हणून आलेल्या तिघांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते गावात आले होते. याबाबतची कुणकुण गावातील लोकांना लागल्यावर प्रशासनाला कळविण्यात आले. प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने तिघांना शोधून काढले. त्यांना नंदुरबार येथील क्वारंटाईन केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या दोघांचीही तपासणी करून त्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले. दरम्यान इतरही गावांमध्ये असे कुणी पाहुणे आले असल्यास तातडीने प्रशासनाला कळवावे. नागरिकांनी देखील सतर्क राहून बाहेरच्या व्यक्तींना येवू देवू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.