शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

आठवडाभरात शिवभोजनही डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 11:25 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सर्वसामान्य गरिबांसाठी सुरू करण्यात आलेल्या शिवभोजनलाही लॉकडाऊन आणि संचारबंदीचा फटका बसला ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सर्वसामान्य गरिबांसाठी सुरू करण्यात आलेल्या शिवभोजनलाही लॉकडाऊन आणि संचारबंदीचा फटका बसला आहे. नंदुरबारातील दोन केंद्रात दिवसाला ४०० जणांना जेवन देण्याचे टार्गेट असते. आठवडाभरात ३२०० थाळींपैकी केवळ ६०१ जणांनी जेवन नेले केले. पैकी बाजार समितीतील केंद्र तर सहा दिवसांपासून बंदच आहे. आता लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर एक केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होत आहे.शिवसेनेची व विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या शिवभोजनाचा आधार लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणावर होईल अशी अपेक्षा होती. मात्र, घरातून बाहेर न पडू देणे, संचारबंदी यामुळे शिवभोजनकडे अनेकांनी इच्छा असूनही पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिवभोजनमधील थाळींची संख्या २५ टक्केही झाली नसल्याचे चित्र आठवडाभराच्या एकुण परिस्थतीवरून दिसून येत आहे.नंदुरबारात दोन ठिकाणीनंदुरबारात दोन ठिकाणी शिवभोजन सुरू आहे. जिल्हा रुग्णालयात स्त्री शक्ती संघटनेतर्फे तर कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजार समिती प्रशासनातर्फे ते चालविले जाते. दोन्ही ठिकाणी भोजनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अवघ्या १० रुपयात जेवन दिले जाते. एक भाजी, पोळी, दाळ-भात किंवा खिचडी यांचा समावेश आहे.२० ग्रॅम वजनाच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम भात व १०० ग्रॅम वरण यांचा समावेश आहे. काही ठिकाणी चालविणाऱ्यांकडून लोणचे किंवा कांदा देखील दिला जातो. प्रत्येकी केंद्रावर २०० जण दिवसातून जेवन करून जातील अशी सोय आहे. त्यासाठी १२ ते २ ही वेळ देण्यात आली आहे.जिल्हा रुग्णालय आणि बाजार समिती या दोन्ही केंद्रात सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासाठी स्वतंत्र अ‍ॅप असून त्यात सर्व डाटा संकलीत करावा लागतो.लॉकडाऊनमुळे परिणाममंगळवार २४ मार्च रात्रीपासून देशभरात आणि सोमवार २३ मार्च रात्रीपासून राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. शिवाय २२ मार्च रविवारी जनता कर्फ्यू होता. परिणामी गेल्या आठवडाभरात या योजनेतील थाळींची संख्या कमालीची रोडावली आहे. संचारबंदीमुळे कुणालाही बाहेर निघू दिले जात नाही. त्यामुळे शिवभोजन केंद्रांकडे कुणी फिरकत नाही. परिणामी बाजार समितीमधील केंद्र २२ मार्चपासून बंद करावे लागले आहे.जिल्हा रुग्णालयातील केंद्र सुरू असले तरी त्या ठिकाणी देखील संख्या मंदावली आहे. गेल्या २१ मार्च रोजी १२३ जणांनी त्या ठिकाणी जेवन केले. परंतु २२ रोजी जनता कर्फ्यूमुळे ते बंद होते. २३ रोजी देखील बंद राहिले. २४ पासून तेथे बसून जेवन करण्यास मनाई करण्यात आली. त्याऐवजी टिफीन देण्यात येवू लागले. त्या दिवशी ३७ जणांनी टिफीन नेला.२५ रोजी गुढीपाडवा असतांनाही बंद होते. २६ रोजी ३१, २७ रोजी १४२ तर २८ रोजी १६१ जणांनी टिफीन नेला. बाजार समितीतील केंद्रात २१ मार्च रोजी १०७ जणांनी जेवन केले. नंतर २२ मार्च पासून हे केंद्र बंदच झाले. आता ते सुरू करण्यासाठी सुचाना देण्यात येत आहे.४सर्वसामान्य व उघड्यावर राहणाºयांना सध्याच्या परिस्थितीत शिवभोजन हे मोठा आधार ठरणार आहे. त्यासाठी शासन, प्रशासनही सरसावले आहे.४शिवभोजनकडे जाणाºयांना संचारबंदी काळात कुठलाही अडथळा आणू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शासनाने आता या केंद्राच्या वेळेत देखील बदल करून ती वाढविली आहे.४सध्या १२ ते २ ही वेळ होती आता सकाळी ११ ते दुपारी ३ अशी वेळ राहणार आहे. शिवाय दहा ऐवजी पाच रुपये थाळी राहणार आहे. त्यामुळे अनेकांना ते सोयीचे ठरणार आहे. याशिवाय आता नंदुरबार शिवाय शहादा, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या तालुक्याच्या मुख्यालयी देखील शिवभोजन केंद्र सुरू करण्यात येत आहे.४१ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. लॉकडाऊनमुळे जास्तीत जास्त निराधार, गरीबांना त्याचा फायदा घेता यावा हा उद्देश त्यामागे आहे.