शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरात शिवभोजनही डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 11:25 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सर्वसामान्य गरिबांसाठी सुरू करण्यात आलेल्या शिवभोजनलाही लॉकडाऊन आणि संचारबंदीचा फटका बसला ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सर्वसामान्य गरिबांसाठी सुरू करण्यात आलेल्या शिवभोजनलाही लॉकडाऊन आणि संचारबंदीचा फटका बसला आहे. नंदुरबारातील दोन केंद्रात दिवसाला ४०० जणांना जेवन देण्याचे टार्गेट असते. आठवडाभरात ३२०० थाळींपैकी केवळ ६०१ जणांनी जेवन नेले केले. पैकी बाजार समितीतील केंद्र तर सहा दिवसांपासून बंदच आहे. आता लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर एक केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होत आहे.शिवसेनेची व विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या शिवभोजनाचा आधार लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणावर होईल अशी अपेक्षा होती. मात्र, घरातून बाहेर न पडू देणे, संचारबंदी यामुळे शिवभोजनकडे अनेकांनी इच्छा असूनही पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिवभोजनमधील थाळींची संख्या २५ टक्केही झाली नसल्याचे चित्र आठवडाभराच्या एकुण परिस्थतीवरून दिसून येत आहे.नंदुरबारात दोन ठिकाणीनंदुरबारात दोन ठिकाणी शिवभोजन सुरू आहे. जिल्हा रुग्णालयात स्त्री शक्ती संघटनेतर्फे तर कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजार समिती प्रशासनातर्फे ते चालविले जाते. दोन्ही ठिकाणी भोजनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अवघ्या १० रुपयात जेवन दिले जाते. एक भाजी, पोळी, दाळ-भात किंवा खिचडी यांचा समावेश आहे.२० ग्रॅम वजनाच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम भात व १०० ग्रॅम वरण यांचा समावेश आहे. काही ठिकाणी चालविणाऱ्यांकडून लोणचे किंवा कांदा देखील दिला जातो. प्रत्येकी केंद्रावर २०० जण दिवसातून जेवन करून जातील अशी सोय आहे. त्यासाठी १२ ते २ ही वेळ देण्यात आली आहे.जिल्हा रुग्णालय आणि बाजार समिती या दोन्ही केंद्रात सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासाठी स्वतंत्र अ‍ॅप असून त्यात सर्व डाटा संकलीत करावा लागतो.लॉकडाऊनमुळे परिणाममंगळवार २४ मार्च रात्रीपासून देशभरात आणि सोमवार २३ मार्च रात्रीपासून राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. शिवाय २२ मार्च रविवारी जनता कर्फ्यू होता. परिणामी गेल्या आठवडाभरात या योजनेतील थाळींची संख्या कमालीची रोडावली आहे. संचारबंदीमुळे कुणालाही बाहेर निघू दिले जात नाही. त्यामुळे शिवभोजन केंद्रांकडे कुणी फिरकत नाही. परिणामी बाजार समितीमधील केंद्र २२ मार्चपासून बंद करावे लागले आहे.जिल्हा रुग्णालयातील केंद्र सुरू असले तरी त्या ठिकाणी देखील संख्या मंदावली आहे. गेल्या २१ मार्च रोजी १२३ जणांनी त्या ठिकाणी जेवन केले. परंतु २२ रोजी जनता कर्फ्यूमुळे ते बंद होते. २३ रोजी देखील बंद राहिले. २४ पासून तेथे बसून जेवन करण्यास मनाई करण्यात आली. त्याऐवजी टिफीन देण्यात येवू लागले. त्या दिवशी ३७ जणांनी टिफीन नेला.२५ रोजी गुढीपाडवा असतांनाही बंद होते. २६ रोजी ३१, २७ रोजी १४२ तर २८ रोजी १६१ जणांनी टिफीन नेला. बाजार समितीतील केंद्रात २१ मार्च रोजी १०७ जणांनी जेवन केले. नंतर २२ मार्च पासून हे केंद्र बंदच झाले. आता ते सुरू करण्यासाठी सुचाना देण्यात येत आहे.४सर्वसामान्य व उघड्यावर राहणाºयांना सध्याच्या परिस्थितीत शिवभोजन हे मोठा आधार ठरणार आहे. त्यासाठी शासन, प्रशासनही सरसावले आहे.४शिवभोजनकडे जाणाºयांना संचारबंदी काळात कुठलाही अडथळा आणू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शासनाने आता या केंद्राच्या वेळेत देखील बदल करून ती वाढविली आहे.४सध्या १२ ते २ ही वेळ होती आता सकाळी ११ ते दुपारी ३ अशी वेळ राहणार आहे. शिवाय दहा ऐवजी पाच रुपये थाळी राहणार आहे. त्यामुळे अनेकांना ते सोयीचे ठरणार आहे. याशिवाय आता नंदुरबार शिवाय शहादा, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या तालुक्याच्या मुख्यालयी देखील शिवभोजन केंद्र सुरू करण्यात येत आहे.४१ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. लॉकडाऊनमुळे जास्तीत जास्त निराधार, गरीबांना त्याचा फायदा घेता यावा हा उद्देश त्यामागे आहे.