लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : गेले आठ महिने खडतर प्रवास करीत असताना पावसाची चाहूल लागली की, प्रत्येक मेंढपाळ आपल्या गावाकडे प्रस्थान करीत असतात. मात्र या वर्षी मेंढपाळांना मोठ्या संकटांना समोरे जावे लागले.२२ मार्चपासून संचार बंदीमुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे मेंढपाळांना गावोगावी भटकंती करण्यास मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. चार महिने मेंढ्यांना मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होत असतो. परंतु पावसाळा गेला की, पुन्हा एकदा हा धनगर समाज आपल्या जवळील असलेला मेंढ्यांच्या कळप घेवून येत असतात.साधारण दिवाळीच्या सणामध्ये या मेंढपाळांचे शहादा तालुक्यातील जिथे चाऱ्याची सोय होईल अश्या ग्रामीण भागात आगमन होत असते. पावसाळ्यात विविध प्रकारची झाडे निर्माण होत असता. तसेच पीक घेतल्यानंतर रिकाम्या झालेल्या शेतात शेतकरी मेंढ्यांचे कळप बोलवत असतात. शेतात मेंढ्यांचा कळप आल्याने शेतातच मेंढ्यांची विष्ठा पडत असल्याने त्याचा खतासारखा वापर होत असल्याचे शेतकऱ्यांनकडून सांगितले जाते. त्यामुळे त्यांच्या चाºयाचा प्रश्नदेखील मार्गी लागत असतो.ग्रामीण भागात आल्यानंतर मेंढपाळांचा प्रपंच आज इथे तर उद्या तिथे असे आॅक्टोबर-नोव्हेंबर ते मे-जून दरम्यान उघड्यावरच असतो. सुमारे २०० ते ३०० किलोमीटर मेंढपाळांना चाºयासाठी भटकंती करावी लागत असते. पाऊस पडू लागल्याचे चिन्ह निर्माण होताच मेंढपाळ आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन घराकडे परतीची वाट धरू लागले आहे. पाऊस उशिरा पडला किंवा पावसाने दडी मारली तर मेंढपाळांचा मुक्काम वाढत असतो. मात्र यावर्षी आलेले कोरोना संकटमुळे काही मेंढपाळांनी आपला मोर्चा लवकरच गावाकडे वळविला आहे. साधारणपणे जून महिन्यात मेंढपाळ निघत असतात. काही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मार्गस्थ हात असतात. परंतु यंदा मात्र कोरोनाच्या भितीमुळे परतीच्या प्रवासात मेंढपाळ व्यस्त झालेचे चित्र पहावयास मिळत आहे.
कोरोनामुळे मेंढपाळ संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:42 IST