शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

कोरोनामुळे मेंढपाळ संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : गेले आठ महिने खडतर प्रवास करीत असताना पावसाची चाहूल लागली की, प्रत्येक मेंढपाळ आपल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : गेले आठ महिने खडतर प्रवास करीत असताना पावसाची चाहूल लागली की, प्रत्येक मेंढपाळ आपल्या गावाकडे प्रस्थान करीत असतात. मात्र या वर्षी मेंढपाळांना मोठ्या संकटांना समोरे जावे लागले.२२ मार्चपासून संचार बंदीमुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे मेंढपाळांना गावोगावी भटकंती करण्यास मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. चार महिने मेंढ्यांना मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होत असतो. परंतु पावसाळा गेला की, पुन्हा एकदा हा धनगर समाज आपल्या जवळील असलेला मेंढ्यांच्या कळप घेवून येत असतात.साधारण दिवाळीच्या सणामध्ये या मेंढपाळांचे शहादा तालुक्यातील जिथे चाऱ्याची सोय होईल अश्या ग्रामीण भागात आगमन होत असते. पावसाळ्यात विविध प्रकारची झाडे निर्माण होत असता. तसेच पीक घेतल्यानंतर रिकाम्या झालेल्या शेतात शेतकरी मेंढ्यांचे कळप बोलवत असतात. शेतात मेंढ्यांचा कळप आल्याने शेतातच मेंढ्यांची विष्ठा पडत असल्याने त्याचा खतासारखा वापर होत असल्याचे शेतकऱ्यांनकडून सांगितले जाते. त्यामुळे त्यांच्या चाºयाचा प्रश्नदेखील मार्गी लागत असतो.ग्रामीण भागात आल्यानंतर मेंढपाळांचा प्रपंच आज इथे तर उद्या तिथे असे आॅक्टोबर-नोव्हेंबर ते मे-जून दरम्यान उघड्यावरच असतो. सुमारे २०० ते ३०० किलोमीटर मेंढपाळांना चाºयासाठी भटकंती करावी लागत असते. पाऊस पडू लागल्याचे चिन्ह निर्माण होताच मेंढपाळ आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन घराकडे परतीची वाट धरू लागले आहे. पाऊस उशिरा पडला किंवा पावसाने दडी मारली तर मेंढपाळांचा मुक्काम वाढत असतो. मात्र यावर्षी आलेले कोरोना संकटमुळे काही मेंढपाळांनी आपला मोर्चा लवकरच गावाकडे वळविला आहे. साधारणपणे जून महिन्यात मेंढपाळ निघत असतात. काही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मार्गस्थ हात असतात. परंतु यंदा मात्र कोरोनाच्या भितीमुळे परतीच्या प्रवासात मेंढपाळ व्यस्त झालेचे चित्र पहावयास मिळत आहे.