शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

हमाल-मापाडी व व्यापारी यांच्यातील दरवाढीचा तिढा अखेर सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 13:02 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  हमाल मापाडींना १६ टक्के त्रैवार्षीक दरवाढ मिळाल्याने कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे. आता ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  हमाल मापाडींना १६ टक्के त्रैवार्षीक दरवाढ मिळाल्याने कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे. आता सुट्टीनंतर अर्थात १ डिसेंबरपासून नियमित कामकाजाला सुरवात होणार आहे. हमाल मापाडी, व्यापारी व बाजार समिती संचालक यांची संयुक्त बैठक माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. नंदुरबार बाजार समितीतील हमाल मापाडींनी त्रैवार्षीक दरवाढ मिळावी या मागणीसाठी गुरुवारपासून बंद पुकारला होता. त्यामुळे कामकाज ठप्प झाले होते. या संदर्भात बैठका होऊनही तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे शनिवारी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढत तिढा   सोडला. त्रैवार्षीक दरवाढहमाल मापाडी व व्यापारी यांच्यात दराचा करार हा तीन वर्षांसाठी असतो. त्याअंतर्गत दर तीन वर्षांनी नवीन दरवाढ लागू केली जाते. यंदा ऑक्टोबर अखेर त्रैवार्षीक मुदत संपली होती. नोव्हेंबरपासून नवीन दर लागू होणे अपेक्षीत होते. परंतु ते लागू झाले नव्हते. या संदर्भात हमाल-मापाडी व व्यापारी यांच्यात बैठकही झाली होती. दरवाढ होत नसल्याचे पाहून हमाल मापाडींनी गुरुवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे बाजार समितीचे कामकाज ठप्प झाले होते. १६ टक्के दरवाढ मान्यमाजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शनिवारी हमाल-मापाडी, व्यापारी व बाजार समिती संचालक यांची   संयुक्त बैठक घेतली. यावेळी दोन्ही बाजू ऐकुण घेण्यात आल्या. त्यानुसार रघुवंशी यांनी मार्गदर्शन केले. व्यापारी व हमाल संघटना यांनी १६ टक्के दरवाढीवर एकमत केल्याने तिढा सुटला. यावेळी व्यापारींनी हमालमापाडींचा तर हमाल मापाडींनी व्यापारी प्रतिनिधींचा औपचारिक सत्कार केला. शेतकऱ्यांना वेठीस धरू नकायावेळी मार्गदर्शन करतांना चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले, दरवाढीमुळे शेतकरी वेठीस धरला जात आहे. सद्या मिरचीचा हंगाम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. विविध शेतीमालाची आवक देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यातच वातावरण देखील ढगाळ राहत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याचा धोका आहे. त्यामुळे व्यापारी व हमाल-मापाडी प्रतिनिधींनी सामंजस्याने घेवून व सर्वसंमतीने तोडगा काढावा असे आवाहन केले. त्यानंतर दोन्ही बाजू त्यांनी ऐकुण घेत १६ टक्के दरवाढीवर एकमत करून घेत दोघा गटाला राजी केले. यावेळी हमाल-मापाडी संघटनेचे अध्यक्ष कैलास पाटील, पदाधिकारी संतोष पाटील, देवाजी माळी व पदाधिकारी तर व्यापाऱ्यांतर्फे ग्रेन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष हरेश जैन, महेश जैन, गिरीश जैन, धिरज जैस्वाल, भूपेंद्र  जैन उपस्थित होते. बाजार समितीचे सभापती  दिनेश पाटील, संचालक सयाजी मोरे, रोहिदास राठोड, भरत पाटील, किशोर पाटील, हिरालाल पाटील, सचिव योगेश अमृतकर, राजेंद्र गिरासे उपस्थित होते. 

तीन दिवस व्यवहार ठप्प कामबंद आंदोलनामुळे गेल्या तीन दिवसांपासून बाजार समितीत शेतीमाल उघड्यावर पडून होता.  शुक्रवारी लाल मिरचीचे दिडशे वाहने भरून आली होती. लिलाव होत नसल्याने शेतकरी चिडले होते. त्यानंतर दुपारून लिलाव करण्यात आले.  आता मंगळवार, १ डिसेंबरपासून नियमित कामकाज सुरू होणार आहे.