शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शहादा उपविभाग : वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : वीज वितरण कंपनीच्या शहादा ग्रामीण उपविभाग दोनअंतर्गत  येणा:या ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा व पथदिव्यांचे सुमारे 30 कोटी रुपये वीज बिल थकीत आहे. या उपविभागात येणा:या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, अक्कलकुवा तालुक्यातील काही ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : वीज वितरण कंपनीच्या शहादा ग्रामीण उपविभाग दोनअंतर्गत  येणा:या ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा व पथदिव्यांचे सुमारे 30 कोटी रुपये वीज बिल थकीत आहे. या उपविभागात येणा:या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, अक्कलकुवा तालुक्यातील काही ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.वीज वितरण कंपनीच्या शहादा उपविभागाच्या भाग दोनमध्ये 108 ग्रामपंचायती ग्राहक आहेत. यात काही मोठय़ा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यापैकी ब्राrाणपुरी कक्षमधील गणोर, सुलतानपूर, बहिरपूर, कोचरा, ब्राrाणपुरी, खेडदिगर, पाडळदा कक्षामधील अलखेड, औरंगपूर, पाडळदा, कुढावद, चिखली, चिखली पुनर्वसन, बुडीगव्हाण, म्हसावद कक्षामध्ये फत्तेपूर, वीरपूर, मडकाणी, अमोदा, जुनवणे, पिंप्री, इस्लामपूर, लक्कडकोट, तलावडी व मंदाणे कक्षातील कमरावद, कोळपांढरी, नवीन असलोद, गोवळीपाडा, भुलाणे, घोडलेपाडा, मलगाव, सोनवल, चिखली, सावखेडा, चांदसैली या ग्रामपंचायतींकडे 30 कोटी रुपयांची वीज बिलांची थकबाकी आहे. बिलांच्या वसुलीसाठी वीज कंपनीने धडक मोहीम सुरू करून गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी व पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. या कारवाईमुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पथदिवेही बंद असल्यामुळे गावागावात अंधाराचे साम्राज्य आहे.वीज कंपनीने थकीत बिले भरण्याबाबत संबंधितांना वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. मात्र ग्रामपंचायतींनी याची दखल घेतली नाही म्हणून ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने त्या त्या गावातील ग्रामस्थांना जंगलात जाऊन पाणी मिळवावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.शहादा व अक्कलकुवा तालुक्यातील मोठय़ा लोकसंख्येच्या गावांमधील पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. थकबाकीची रक्कम भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत न करण्याचा निर्णय वीज कंपनीने घेतल्याचे समजते. त्यामुळे ग्रामपंचायतींकडून जोर्पयत थकबाकीची रक्कम भरली यात नाही तोपावेतो त्या त्या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी हाल सहन करावे लागतील, असे चित्र दिसते. मोठय़ा गावांमधील पथदिवे बंद असल्याने चोरीच्या घटना होऊ शकतात. त्यामुळे याबाबत तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.