शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
4
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
5
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
6
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
7
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
8
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
9
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
10
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
11
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
12
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
13
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
14
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
15
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
16
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
17
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
18
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
19
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
20
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

शहादा उपविभाग : वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : वीज वितरण कंपनीच्या शहादा ग्रामीण उपविभाग दोनअंतर्गत  येणा:या ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा व पथदिव्यांचे सुमारे 30 कोटी रुपये वीज बिल थकीत आहे. या उपविभागात येणा:या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, अक्कलकुवा तालुक्यातील काही ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : वीज वितरण कंपनीच्या शहादा ग्रामीण उपविभाग दोनअंतर्गत  येणा:या ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा व पथदिव्यांचे सुमारे 30 कोटी रुपये वीज बिल थकीत आहे. या उपविभागात येणा:या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, अक्कलकुवा तालुक्यातील काही ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.वीज वितरण कंपनीच्या शहादा उपविभागाच्या भाग दोनमध्ये 108 ग्रामपंचायती ग्राहक आहेत. यात काही मोठय़ा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यापैकी ब्राrाणपुरी कक्षमधील गणोर, सुलतानपूर, बहिरपूर, कोचरा, ब्राrाणपुरी, खेडदिगर, पाडळदा कक्षामधील अलखेड, औरंगपूर, पाडळदा, कुढावद, चिखली, चिखली पुनर्वसन, बुडीगव्हाण, म्हसावद कक्षामध्ये फत्तेपूर, वीरपूर, मडकाणी, अमोदा, जुनवणे, पिंप्री, इस्लामपूर, लक्कडकोट, तलावडी व मंदाणे कक्षातील कमरावद, कोळपांढरी, नवीन असलोद, गोवळीपाडा, भुलाणे, घोडलेपाडा, मलगाव, सोनवल, चिखली, सावखेडा, चांदसैली या ग्रामपंचायतींकडे 30 कोटी रुपयांची वीज बिलांची थकबाकी आहे. बिलांच्या वसुलीसाठी वीज कंपनीने धडक मोहीम सुरू करून गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी व पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. या कारवाईमुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पथदिवेही बंद असल्यामुळे गावागावात अंधाराचे साम्राज्य आहे.वीज कंपनीने थकीत बिले भरण्याबाबत संबंधितांना वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. मात्र ग्रामपंचायतींनी याची दखल घेतली नाही म्हणून ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने त्या त्या गावातील ग्रामस्थांना जंगलात जाऊन पाणी मिळवावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.शहादा व अक्कलकुवा तालुक्यातील मोठय़ा लोकसंख्येच्या गावांमधील पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. थकबाकीची रक्कम भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत न करण्याचा निर्णय वीज कंपनीने घेतल्याचे समजते. त्यामुळे ग्रामपंचायतींकडून जोर्पयत थकबाकीची रक्कम भरली यात नाही तोपावेतो त्या त्या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी हाल सहन करावे लागतील, असे चित्र दिसते. मोठय़ा गावांमधील पथदिवे बंद असल्याने चोरीच्या घटना होऊ शकतात. त्यामुळे याबाबत तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.