लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागातील तोरणमाळपासून नर्मदा काठावरील सावºया दिगर या गावापर्यंत जोडणाºया प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून होत असलेल्या ६४.२ किलोमीटर रस्त्याच्या कामाची नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी पाहणी केली. दुर्गम भागातील नागरिकांच्या विकासासाठी प्रगतीचा मार्ग ठरू पाहणाºया या रस्त्याचे काम चालू वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होऊन हा रस्ता वाहतुकीस खुला होईल, अशी अपेक्षा त्यांनी या पाहणीनंतर व्यक्त केली.सातपुड्याच्या दुर्गम भागात दळणवळणाची सुविधा नसल्यामुळे या परिसरात राहणाºया नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. दैनंदिन वापरासाठी लागणाºया वस्तूंबरोबरच आरोग्य, शिक्षण व इतर सुविधांसाठी शहर व तालुक्याच्या ठिकाणी संपर्क साधण्याकरिता या भागातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन शासनाने तोरणमाळ ते झापी, फलईमार्गे सावºया दिगरपर्यंत ६४.२ किलोमीटर अंतराचा रस्ता बांधण्यासाठी परवानगी दिली होती. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून हा रस्ता तयार करण्यात येत आहे. या रस्त्यावर लहान-मोठे १३२ पूल व फरशांचे बांधकाम करण्यात येणार आहेत. त्यापैकी बहुतांश पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.या रस्त्यापैकी आतापावेतो १२ किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. ४० किलोमीटर रस्त्याचे मातीकाम झाले असून त्यापैकी ३० किलोमीटर रस्त्याचे खडीकरणही पूर्ण झाले आहे. मे २०२० पर्यंत यापैकी ३८ किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होणार असून या रस्त्यावर वाहतूक सुरू होणार आहे. डिसेंबर २०२० पर्यंत संपूर्ण ६४.२ किलोमीटर रस्ता वाहतुकीसाठी खुला होणे अपेक्षित आहे.या रस्त्याच्या कामाच्या पाहणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी भेट दिली. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता एन.एस. नाईक व कनिष्ठ अभियंता सायसिंग पावरा यांनी यावेळी त्यांना कामाबाबत सविस्तर माहिती सांगितली. धडगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे व इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते.
सावऱ्या दिगर रस्ता प्रगतीचा मार्ग ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:49 IST