शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

खडकापाणीच्या पाड्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील व सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील खडकापाणीच्या सहा पाड्यांमधील हातपंपांना पाणी नसल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील व सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील खडकापाणीच्या सहा पाड्यांमधील हातपंपांना पाणी नसल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दरम्यान वळवीपाडा येथे एक हातपंप जेमतेम चालतो तर माथाआंबापाडा येथे सात पैकी एकच हातपंप सुरू असल्याने याठिकाणी पाणी भरण्याकरीता गर्दी होत असते. तर उर्वरित पाड्यांवरील नागरिकांना दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या झिऱ्यातून चढउतार असलेल्या पायवाटेने पाणी आणावे लागत असते.दरम्यान, काही नागरिकांना घर बांधकाम मटेरियलचे साहित्य असतानाही पाण्याअभावी घरे बांधायला अडचणी येत आहेत. तसेच पाणीटंचाईमुळे लग्नासाठी इच्छूक असलेल्या तरूणांना पालक आपल्या मुली देत नाही. या वेळी गावाचे नाव ऐकूनच मुलीवाल्यांकडून लग्नासाठी नकार दिला जात असल्याची खंत लग्नासाठी इच्छूक असलेल्या युवकाने व्यक्त केली.वळवीपाडा येथे सात हातपंपाना पाणी नसल्यामुळे या पाड्यांवरील नागरिकांना पायपीट करीत दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या झिºयातून पाणी आणावे लागत आहे. तसेच पाडवीपाडा येथे चार हातपंप आहेत. परंतु त्यातील तीन हातपंपांना पाणी नाही तर एका हातपंपाला जेमतेम पाणी येत असल्याने एक हंडाभर पाणीला दोन तास लागत असल्याने रात्री उशिरापर्यंत या परिसरातील नागरिकांना पाणी भरावे लागत आहे.पाटीलपाडा येथेही आठ हातपंप आहे. मात्र त्यातील एक हातपंप सुरू असून, त्यातही पुरेसे पाणी नसल्याने पश्चिमेला दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या झिºयामधून येथील नागरिकांना पाणी आणावे लागत आहे. माथाआंबापाडा येथेही सात हातपंप आहे. त्यातील एक हातपंप सुरू असल्याने याच हातपंपावर नागरिक पाणी भरण्यासाठी गर्दी करीत असतात. या हातपंपावर पाणी भरण्यासाठी पायवाटेने २०० ते ३०० मिटर अंतरावरून ग्रामस्थ पाणी भरण्यासाठी येत असतात.देवजीपाडा येथे तीन हातपंप असून, त्यात एक हातपंप चालू असून ज्यांना हातपंप लांब पडत असते ते माथाआंबापाडाच्या २०० मिटर अंतरावर असलेल्या दरीतुन पाणी आणावे लागत असते. डोटकीपाडा येथे सात हातपंप असून त्यात पाच हातपंप बंद असल्याने या पाड्यांवरील नागरीकांना पश्चिमेला ७०० ते ८०० मिटर अंतरावर असलेल्या हातपंपावरून पाणी आणावे लागत आहे.खडकापाणीच्या या पाड्यांवर खडकाळ भाग असल्याने २०० फुटांवर पाणी लागत नसून, हातपंप टाकून ही उपयोग होत नाही. त्यांमुळे ५०० फुटापर्यत पाईप टाकणे गरजेचे आहे. या भागात फेब्रुवारी महिन्यापासून पाण्याची टंचाई निर्माण होत असते. -दिलीप पाडवी, ग्रामस्थ, पाडवीपाडाघरकुल मजुंर असताना घरकुलासाठी लागणारे साहित्य आणून ठेवले जात आहे. मात्र पाणी नसल्याने घराचे बांधकाम करता येत नाही. जेव्हा पाण्याची सोय होते तेव्हा घराचे बांधकाम करीत असतात. शक्यतो पावसाळ्यात घराचे बांधकाम केले जाते कारण पावसाळ्यात पाण्याची अडचण निर्माण होत नाही.-गणेश वसावे, ग्रामस्थ, पाडवीपाडालग्ना योग्य तरूणांनासाठी मुलीची मागणी केली जाते. तेव्हा खडकापाणी गावाचे नाव ऐकूनच मुलीवाल्यांकडून मुली देण्यास नकार दिले जात असून, गावात पाणीटंचाई असल्याने मुली देण्यास नकार देतात.-नीतेश वसावे, युवक, पाडवीपाडा