शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

खडकापाणीच्या पाड्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील व सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील खडकापाणीच्या सहा पाड्यांमधील हातपंपांना पाणी नसल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील व सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील खडकापाणीच्या सहा पाड्यांमधील हातपंपांना पाणी नसल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दरम्यान वळवीपाडा येथे एक हातपंप जेमतेम चालतो तर माथाआंबापाडा येथे सात पैकी एकच हातपंप सुरू असल्याने याठिकाणी पाणी भरण्याकरीता गर्दी होत असते. तर उर्वरित पाड्यांवरील नागरिकांना दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या झिऱ्यातून चढउतार असलेल्या पायवाटेने पाणी आणावे लागत असते.दरम्यान, काही नागरिकांना घर बांधकाम मटेरियलचे साहित्य असतानाही पाण्याअभावी घरे बांधायला अडचणी येत आहेत. तसेच पाणीटंचाईमुळे लग्नासाठी इच्छूक असलेल्या तरूणांना पालक आपल्या मुली देत नाही. या वेळी गावाचे नाव ऐकूनच मुलीवाल्यांकडून लग्नासाठी नकार दिला जात असल्याची खंत लग्नासाठी इच्छूक असलेल्या युवकाने व्यक्त केली.वळवीपाडा येथे सात हातपंपाना पाणी नसल्यामुळे या पाड्यांवरील नागरिकांना पायपीट करीत दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या झिºयातून पाणी आणावे लागत आहे. तसेच पाडवीपाडा येथे चार हातपंप आहेत. परंतु त्यातील तीन हातपंपांना पाणी नाही तर एका हातपंपाला जेमतेम पाणी येत असल्याने एक हंडाभर पाणीला दोन तास लागत असल्याने रात्री उशिरापर्यंत या परिसरातील नागरिकांना पाणी भरावे लागत आहे.पाटीलपाडा येथेही आठ हातपंप आहे. मात्र त्यातील एक हातपंप सुरू असून, त्यातही पुरेसे पाणी नसल्याने पश्चिमेला दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या झिºयामधून येथील नागरिकांना पाणी आणावे लागत आहे. माथाआंबापाडा येथेही सात हातपंप आहे. त्यातील एक हातपंप सुरू असल्याने याच हातपंपावर नागरिक पाणी भरण्यासाठी गर्दी करीत असतात. या हातपंपावर पाणी भरण्यासाठी पायवाटेने २०० ते ३०० मिटर अंतरावरून ग्रामस्थ पाणी भरण्यासाठी येत असतात.देवजीपाडा येथे तीन हातपंप असून, त्यात एक हातपंप चालू असून ज्यांना हातपंप लांब पडत असते ते माथाआंबापाडाच्या २०० मिटर अंतरावर असलेल्या दरीतुन पाणी आणावे लागत असते. डोटकीपाडा येथे सात हातपंप असून त्यात पाच हातपंप बंद असल्याने या पाड्यांवरील नागरीकांना पश्चिमेला ७०० ते ८०० मिटर अंतरावर असलेल्या हातपंपावरून पाणी आणावे लागत आहे.खडकापाणीच्या या पाड्यांवर खडकाळ भाग असल्याने २०० फुटांवर पाणी लागत नसून, हातपंप टाकून ही उपयोग होत नाही. त्यांमुळे ५०० फुटापर्यत पाईप टाकणे गरजेचे आहे. या भागात फेब्रुवारी महिन्यापासून पाण्याची टंचाई निर्माण होत असते. -दिलीप पाडवी, ग्रामस्थ, पाडवीपाडाघरकुल मजुंर असताना घरकुलासाठी लागणारे साहित्य आणून ठेवले जात आहे. मात्र पाणी नसल्याने घराचे बांधकाम करता येत नाही. जेव्हा पाण्याची सोय होते तेव्हा घराचे बांधकाम करीत असतात. शक्यतो पावसाळ्यात घराचे बांधकाम केले जाते कारण पावसाळ्यात पाण्याची अडचण निर्माण होत नाही.-गणेश वसावे, ग्रामस्थ, पाडवीपाडालग्ना योग्य तरूणांनासाठी मुलीची मागणी केली जाते. तेव्हा खडकापाणी गावाचे नाव ऐकूनच मुलीवाल्यांकडून मुली देण्यास नकार दिले जात असून, गावात पाणीटंचाई असल्याने मुली देण्यास नकार देतात.-नीतेश वसावे, युवक, पाडवीपाडा