शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

खरेदीपूर्वी होणार बियाणे तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 12:10 IST

बोगस बियाण्याला बसणार चाप : जिल्ह्यात सात तक्रार निवारण कक्षांची निर्मिती

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 10 : गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात 9 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केलेल्या ज्वारीची बोगस बियाण्यामुळे वाताहत झाली होती़ यातून पुन्हा शेतक:यांची फसवणूक टाळता यावी म्हणून बियाणे विक्री होण्यापूर्वी कृषी विभागाच्या पथकांकडून त्यांचे नमुने तपासण्यात येणार आहेत़ जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून येत्या 15 मे नंतर शेतकरी खरीपासाठी बियाणे खरेदी करणे सुरू करणार असल्याने विभागाकडून खबरदारीचे उपाय करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान गेल्या वर्षी नुकसान झालेल्या 800 ज्वारी उत्पादक शेतक:यांना अद्यापही ग्राहकमंचाकडून योग्य त्या प्रकारे नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने समस्या कायम आह़े ग्राहकमंचाकडे बहुतांश शेतकरी वेळावेळी पाठपुरावा करत आहेत़ मात्र वर्ष उलटूनही समाधानकारक कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात येत आह़े जिल्ह्यात गेल्या वर्षी 21 हजार हेक्टर क्षेत्रात खरीप ज्वारीची पेरणी करण्यात आली होती़ यापैकी 8 हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आलेल्या 9 नंबर ज्वारीचे बियाणे पूर्णपणे खराब आल्याने शेतक:यांच्या हाती केवळ कडबा आला होता़ याबाबत शेतक:यांनी वेळावेळी पाठपुरावा केल्यानंतर कृषी विभागाने 4 बियाणे कंपन्यांच्याविरोधात पुणे कृषी संचालनालयाकडे तक्रार केली होती़ यावर झालेल्या सुनावणीनंतर संचालकांकडून चार बियाणे विक्री करणा:या कंपन्यांचे परवाने कायम स्वरूपी रद्द करण्याचे आदेश काढले आहेत़ बोगस बियाण्याचा फटका शेतक:यांना पुन्हा बसू नये, यासाठी कृषी विभागाकडून काटेकोर अटी व शर्ती बियाणे कंपन्यांना घालून देण्यात आल्या आहेत़ यानुसार बियाण्यांची आवक करण्यापूर्वी ठोक व्यापा:यांना कृषी विभागाला माहिती देऊन बियाणे नमुने तपासणीसाठी द्यावे लागणार आहेत़  येत्या 15 मे नंतर प्रत्यक्ष बियाणे खरेदीला सुरूवात होणार असल्याने कृषी विभागाकडूनही कामकाजाला प्रारंभ होणार आह़े कृषी विभागाच्या तपासणी बियाण्यात दोष आढळल्यास संबधित कंपनीच्या बियाणे विक्रीवर बंदी आणण्याचे सांगण्यात आले आह़े दोन लाख 72 हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी करण्यात येत़े यासाठी लागणा:या बियाण्याची आवक कृषी विभागाने केलेल्या मागणीनुसार करण्यात येत़े कृषी विभागाने यंदा 37 हजार 512 क्विंटल बियाण्याची मागणी केली आह़े अद्याप पूर्णक्षमतेने बियाणे उपलब्ध झाले नसले तरी मागणी तेवढय़ाच बियाण्याचा पुरवठा होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े यासोबत कृषी विभागाने 1 लाख 14 हजार मेट्रिक टन खताची मागणी नोंदवली होती़ यानुसार 99 हजार 100 मेट्रिक टन खत विभागाला प्राप्त झाले आह़े यासोबतच विक्रेत्यांकडे गेल्यावर्षीचे बियाणे पडून असल्याने यंदा खत किंवा बियाणे टंचाई होणार नाही, याची दक्षता घेतली जात आह़े कृषी विभागाने कायमस्वरूपी परवाने रद्द केलेल्या चारही बियाणे कंपन्यांपैकी एका कंपनीचे पाच हजार पाकिट ज्वारी बियाणे विक्री होत होती़ यामुळे संबधितांकडून दुस:या ‘लेबल’खाली बियाणे विक्री करण्याची शक्यताही कृषी विभागातील सूत्रांनी बोलून दाखवली असून त्याचीही तपासणी होणा असल्याचे सांगण्यात आले आह़े