शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीपूर्वी होणार बियाणे तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 12:10 IST

बोगस बियाण्याला बसणार चाप : जिल्ह्यात सात तक्रार निवारण कक्षांची निर्मिती

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 10 : गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात 9 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केलेल्या ज्वारीची बोगस बियाण्यामुळे वाताहत झाली होती़ यातून पुन्हा शेतक:यांची फसवणूक टाळता यावी म्हणून बियाणे विक्री होण्यापूर्वी कृषी विभागाच्या पथकांकडून त्यांचे नमुने तपासण्यात येणार आहेत़ जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून येत्या 15 मे नंतर शेतकरी खरीपासाठी बियाणे खरेदी करणे सुरू करणार असल्याने विभागाकडून खबरदारीचे उपाय करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान गेल्या वर्षी नुकसान झालेल्या 800 ज्वारी उत्पादक शेतक:यांना अद्यापही ग्राहकमंचाकडून योग्य त्या प्रकारे नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने समस्या कायम आह़े ग्राहकमंचाकडे बहुतांश शेतकरी वेळावेळी पाठपुरावा करत आहेत़ मात्र वर्ष उलटूनही समाधानकारक कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात येत आह़े जिल्ह्यात गेल्या वर्षी 21 हजार हेक्टर क्षेत्रात खरीप ज्वारीची पेरणी करण्यात आली होती़ यापैकी 8 हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आलेल्या 9 नंबर ज्वारीचे बियाणे पूर्णपणे खराब आल्याने शेतक:यांच्या हाती केवळ कडबा आला होता़ याबाबत शेतक:यांनी वेळावेळी पाठपुरावा केल्यानंतर कृषी विभागाने 4 बियाणे कंपन्यांच्याविरोधात पुणे कृषी संचालनालयाकडे तक्रार केली होती़ यावर झालेल्या सुनावणीनंतर संचालकांकडून चार बियाणे विक्री करणा:या कंपन्यांचे परवाने कायम स्वरूपी रद्द करण्याचे आदेश काढले आहेत़ बोगस बियाण्याचा फटका शेतक:यांना पुन्हा बसू नये, यासाठी कृषी विभागाकडून काटेकोर अटी व शर्ती बियाणे कंपन्यांना घालून देण्यात आल्या आहेत़ यानुसार बियाण्यांची आवक करण्यापूर्वी ठोक व्यापा:यांना कृषी विभागाला माहिती देऊन बियाणे नमुने तपासणीसाठी द्यावे लागणार आहेत़  येत्या 15 मे नंतर प्रत्यक्ष बियाणे खरेदीला सुरूवात होणार असल्याने कृषी विभागाकडूनही कामकाजाला प्रारंभ होणार आह़े कृषी विभागाच्या तपासणी बियाण्यात दोष आढळल्यास संबधित कंपनीच्या बियाणे विक्रीवर बंदी आणण्याचे सांगण्यात आले आह़े दोन लाख 72 हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी करण्यात येत़े यासाठी लागणा:या बियाण्याची आवक कृषी विभागाने केलेल्या मागणीनुसार करण्यात येत़े कृषी विभागाने यंदा 37 हजार 512 क्विंटल बियाण्याची मागणी केली आह़े अद्याप पूर्णक्षमतेने बियाणे उपलब्ध झाले नसले तरी मागणी तेवढय़ाच बियाण्याचा पुरवठा होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े यासोबत कृषी विभागाने 1 लाख 14 हजार मेट्रिक टन खताची मागणी नोंदवली होती़ यानुसार 99 हजार 100 मेट्रिक टन खत विभागाला प्राप्त झाले आह़े यासोबतच विक्रेत्यांकडे गेल्यावर्षीचे बियाणे पडून असल्याने यंदा खत किंवा बियाणे टंचाई होणार नाही, याची दक्षता घेतली जात आह़े कृषी विभागाने कायमस्वरूपी परवाने रद्द केलेल्या चारही बियाणे कंपन्यांपैकी एका कंपनीचे पाच हजार पाकिट ज्वारी बियाणे विक्री होत होती़ यामुळे संबधितांकडून दुस:या ‘लेबल’खाली बियाणे विक्री करण्याची शक्यताही कृषी विभागातील सूत्रांनी बोलून दाखवली असून त्याचीही तपासणी होणा असल्याचे सांगण्यात आले आह़े