शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

खरेदीपूर्वी होणार बियाणे तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 12:10 IST

बोगस बियाण्याला बसणार चाप : जिल्ह्यात सात तक्रार निवारण कक्षांची निर्मिती

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 10 : गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात 9 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केलेल्या ज्वारीची बोगस बियाण्यामुळे वाताहत झाली होती़ यातून पुन्हा शेतक:यांची फसवणूक टाळता यावी म्हणून बियाणे विक्री होण्यापूर्वी कृषी विभागाच्या पथकांकडून त्यांचे नमुने तपासण्यात येणार आहेत़ जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून येत्या 15 मे नंतर शेतकरी खरीपासाठी बियाणे खरेदी करणे सुरू करणार असल्याने विभागाकडून खबरदारीचे उपाय करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान गेल्या वर्षी नुकसान झालेल्या 800 ज्वारी उत्पादक शेतक:यांना अद्यापही ग्राहकमंचाकडून योग्य त्या प्रकारे नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने समस्या कायम आह़े ग्राहकमंचाकडे बहुतांश शेतकरी वेळावेळी पाठपुरावा करत आहेत़ मात्र वर्ष उलटूनही समाधानकारक कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात येत आह़े जिल्ह्यात गेल्या वर्षी 21 हजार हेक्टर क्षेत्रात खरीप ज्वारीची पेरणी करण्यात आली होती़ यापैकी 8 हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आलेल्या 9 नंबर ज्वारीचे बियाणे पूर्णपणे खराब आल्याने शेतक:यांच्या हाती केवळ कडबा आला होता़ याबाबत शेतक:यांनी वेळावेळी पाठपुरावा केल्यानंतर कृषी विभागाने 4 बियाणे कंपन्यांच्याविरोधात पुणे कृषी संचालनालयाकडे तक्रार केली होती़ यावर झालेल्या सुनावणीनंतर संचालकांकडून चार बियाणे विक्री करणा:या कंपन्यांचे परवाने कायम स्वरूपी रद्द करण्याचे आदेश काढले आहेत़ बोगस बियाण्याचा फटका शेतक:यांना पुन्हा बसू नये, यासाठी कृषी विभागाकडून काटेकोर अटी व शर्ती बियाणे कंपन्यांना घालून देण्यात आल्या आहेत़ यानुसार बियाण्यांची आवक करण्यापूर्वी ठोक व्यापा:यांना कृषी विभागाला माहिती देऊन बियाणे नमुने तपासणीसाठी द्यावे लागणार आहेत़  येत्या 15 मे नंतर प्रत्यक्ष बियाणे खरेदीला सुरूवात होणार असल्याने कृषी विभागाकडूनही कामकाजाला प्रारंभ होणार आह़े कृषी विभागाच्या तपासणी बियाण्यात दोष आढळल्यास संबधित कंपनीच्या बियाणे विक्रीवर बंदी आणण्याचे सांगण्यात आले आह़े दोन लाख 72 हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी करण्यात येत़े यासाठी लागणा:या बियाण्याची आवक कृषी विभागाने केलेल्या मागणीनुसार करण्यात येत़े कृषी विभागाने यंदा 37 हजार 512 क्विंटल बियाण्याची मागणी केली आह़े अद्याप पूर्णक्षमतेने बियाणे उपलब्ध झाले नसले तरी मागणी तेवढय़ाच बियाण्याचा पुरवठा होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े यासोबत कृषी विभागाने 1 लाख 14 हजार मेट्रिक टन खताची मागणी नोंदवली होती़ यानुसार 99 हजार 100 मेट्रिक टन खत विभागाला प्राप्त झाले आह़े यासोबतच विक्रेत्यांकडे गेल्यावर्षीचे बियाणे पडून असल्याने यंदा खत किंवा बियाणे टंचाई होणार नाही, याची दक्षता घेतली जात आह़े कृषी विभागाने कायमस्वरूपी परवाने रद्द केलेल्या चारही बियाणे कंपन्यांपैकी एका कंपनीचे पाच हजार पाकिट ज्वारी बियाणे विक्री होत होती़ यामुळे संबधितांकडून दुस:या ‘लेबल’खाली बियाणे विक्री करण्याची शक्यताही कृषी विभागातील सूत्रांनी बोलून दाखवली असून त्याचीही तपासणी होणा असल्याचे सांगण्यात आले आह़े