शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बारामुखी धबधबा परिसरातील सुरक्षा वा:यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे सातपुडा चांगलाच सजला आहेत. सद्यस्थितीत पाऊस बंद असून सुट्टीच्या दिवशी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे सातपुडा चांगलाच सजला आहेत. सद्यस्थितीत पाऊस बंद असून सुट्टीच्या दिवशी तरुणाईला सातपुडय़ातील निसर्ग सौंदर्याचा मोह आवरता येत नाही. त्यात बिलगाव ता.धडगाव येथील बारामुखी धबधब्याचा विशेष उल्लेख करता येतो. परंतु पर्यटकांसाठी बिलगाव येथे आवश्यक त्या सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे हे ठिकाण धोक्याचे ठरत आहे.  सातपुडय़ात यंदाच्या पावसामुळे काही प्रमाणातील नुकसान वगळता पाऊस चांगलाच  झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे पर्यटकांना खुणावणारी  सातपुडय़ातील स्थळांच्या सौंदर्यात मोठी भर पडली आहे. याशिवाय  लहान-मोठे धबधबेही ओसंडून कोसळत असल्याने हे ठिकाण जिल्ह्यातील उत्साही तरुणांना खुणावत आहे. सुटिचा दिवस राहिल्यास तरुणाईची पावले आपसुकच सातपुडय़ाकडे वळत आहे.  पर्यटकांना खुणावणा:या स्थळांमध्ये तोरणमाळनंतर बिलगाव ता. धडगाव येथील बारामुखी धबधब्याचा प्रामुख्याने उल्लेख होत आहे. याशिवाय तळोदा तालुक्यातील वाल्हेरीचा देखी उल्लेख होत आहे. बिलगावच्या धबधबा हा बारा धारांचा असल्यामुळे त्याला बारामुखी म्हटले जात असून त्याचे प्रत्येक पर्यटकांना आकर्षण आहे. तेथे भेट देणा:या पर्यटकांची संख्या लक्षात घेत तेथे सुरक्षा व्यवस्था  बळकट होणे आवश्यक आहे. सुविधेसाठी मागणीही होत आहे, परंतु कुठलीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे हे स्थळ वर्षानुवर्षे असुरक्षित राहिले  आहे. सुरक्षा व्यवस्था पुरविण्यासाठी  पर्यटन स्थळ विकासांतर्गत शासनामार्फत निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. यामुळे या ठिकाणाचा विकासापाठोपाठ तेथे सुरक्षेच्या सुविधा होतील, पर्यायाने  पर्यटकांच्या संख्येत भर पडत शिवाय स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होईल. निधीसाठी शासनस्तरावरुन कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. तीन वर्षापूर्वी तळोदा येथील तळोदा येथील सात युवक तेथे गेले होते. त्यापैकी पाटील परिवारातील दोघा संख्ख्या भावांचा या धबधब्यात बुडून दुर्दैवी अंत झाला होता. या घटनेमुळे तेथील असुरक्षीतता शासनाच्या निदर्शनास येऊन तेथे सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील असे वाटले होते. परंतु पर्यटकांची ही भाबडी आशा निराधार ठरली. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य उपाययोजांनी गरज आहे. उत्साही तरुण आकर्षणामुळे धोका पत्करुनही या ठिकाणी नेहमी वावरताना दिसून येतात. त्यांच्या सुरक्षेसाठी सुविधा करता आली नसली तरी या धबधब्याची चांगली माहिती असलेल्या व्यक्तीला तेथे नेमणे गरजेचे आहे. पावसाळ्यातही तरुणाई त्याकडे वळत असल्याने धोक्याची पातळी अधिक वाढली आहे.