शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार रेल्वेस्थानकाची सुरक्षा व्यवस्था वा:यावर

By admin | Updated: April 27, 2017 15:34 IST

नंदुरबार रेल्वेस्थानकाची पाहणी केली़ असता येथील सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा झाले आह़े

ऑनलाइन लोकमत / संतोष सूर्यवंशी

नंदुरबार, दि. 27 - देशभरात रेल्वेस्थानक, मुख्य बाजारपेठा, धार्मिक स्थळे इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवाद्यांपासून धोका असल्याने प्रशासनाने हाय अलर्ट जारी केले आह़े या पाश्र्वभूमीवर नंदुरबार रेल्वेस्थानकाची पाहणी केली़ असता येथील सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा झाले आह़े गेल्या काही दिवसांपासून रेल्वेस्थानके तसेच रेल्वे रुळांवर काही समाजकंटकांकडून रूळ कापणे, रेल्वे रुळावर धोकादायक वस्तू ठेवणे असे प्रकार समोर आले आह़े त्यामुळे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर रेल्वेस्थानके असल्याचे यातून दिसत़े प्रशासनानेही सर्व रेल्वेस्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढविली असल्याचे सांगण्यात येत आह़े मात्र याला नंदुरबार येथील रेल्वेस्थानक अपवाद आहे की काय असा प्रश्न प्रवाशांना पडलेला आह़े याचे कारणही तेवढेच गंभीर व अनाकलनीय आह़े रेल्वे स्थानकावरील मुख्यव्दार वगळता कोठेही पोलीस यंत्रणा नाही़ रेल्वेस्थानकाचा आवाका बघता केवळ मुख्य प्रवेशव्दाराजवळच पोलीस पुरेसे आहेत काय असा प्रश्न यातून निर्माण होत आह़ेदुपारी सुरत-भुसावळ पॅसेंजर नंदुरबार रेल्वेस्थानकावर आल्यानंतर एका प्रवाशाची बॅग  रेल्वेत एका सीटवर ठेवण्यात आली़ परंतु संशयितरित्या केवळ बॅग ठेवून निघून जाणारा हा व्यक्ती कोण अशी कोणाकडूनही विचारणा करण्यात आली नाही़ सुमारे 35 मिनिटे झाल्यावरही या बॅगेचा वाली कोण असा प्रश्न ना प्रवाशांना पडला ना रेल्वे प्रशासनाला़ त्यामुळे रेल्वेस्थानक व रेल्वे किती सुरक्षित आहे हेदेखील यातून दिसून येत आह़े रेल्वे स्थानकाच्या दाद:यावरही अज्ञात नागरिक दिवसभर झोपलेले असतात.    यामुळे हे रेल्वेस्थानक आहे  की सार्वजनिक विश्रामगृह असा प्रश्न यामुळे निर्माण होत आह़े याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आह़े अशीच काहीशी परिस्थिती रेल्वेस्थानकाच्या इतरही परिसरात असल्याची दिसून आली़ यामुळे साहजिकच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आह़े कुणीही या अन स्थानकाच्या विश्रामगृहात आराम करून जा.विश्रामगृहाच्या बाहेर  नियमानुसार विश्रामगृहात कोण येत आहे याची नोंद ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून एक कर्मचारी ठेवणे आवश्यक असत़े परंतु या ठिकाणी विश्रामगृहात जात असतानाही  कोणी हटकत नाही किंवा तिकिटाची विचारणाही करीत नाही़  रेल्वे रुळावरून प्रवाशांचा वावरदाद:याचा वापर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत असत़े मात्र याकडे प्रवासी दुर्लक्ष करीत असले तरी रेल्वे प्रशासनाकडून यावर अंकुश ठेवण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही़ सुरत-भुसावळ पॅसेंजर प्लॅटफार्म क्रमांक दोनवर येते. नंदुरबारला उतरणारे प्रवासी दाद:याचा वापर न करता थेट रेल्वे रूळ ओलांडत प्लॅटफार्म क्रमांक  एकवर येत स्थानकाबाहेर जातात.अहमदाबाद-चेन्नई नवजीवन एक्स्प्रेससही याच वेळी येते. त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडणे किती महाग पडू शकते हे यातून दिसून येत आह़े मात्र प्रवासी सर्रासपणे रेल्वे रूळ ओंलाडत असतानाही रेल्वे पोलीस यंत्रणा मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आह़े