शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

नंदुरबार रेल्वेस्थानकाची सुरक्षा व्यवस्था वा:यावर

By admin | Updated: April 27, 2017 15:34 IST

नंदुरबार रेल्वेस्थानकाची पाहणी केली़ असता येथील सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा झाले आह़े

ऑनलाइन लोकमत / संतोष सूर्यवंशी

नंदुरबार, दि. 27 - देशभरात रेल्वेस्थानक, मुख्य बाजारपेठा, धार्मिक स्थळे इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवाद्यांपासून धोका असल्याने प्रशासनाने हाय अलर्ट जारी केले आह़े या पाश्र्वभूमीवर नंदुरबार रेल्वेस्थानकाची पाहणी केली़ असता येथील सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा झाले आह़े गेल्या काही दिवसांपासून रेल्वेस्थानके तसेच रेल्वे रुळांवर काही समाजकंटकांकडून रूळ कापणे, रेल्वे रुळावर धोकादायक वस्तू ठेवणे असे प्रकार समोर आले आह़े त्यामुळे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर रेल्वेस्थानके असल्याचे यातून दिसत़े प्रशासनानेही सर्व रेल्वेस्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढविली असल्याचे सांगण्यात येत आह़े मात्र याला नंदुरबार येथील रेल्वेस्थानक अपवाद आहे की काय असा प्रश्न प्रवाशांना पडलेला आह़े याचे कारणही तेवढेच गंभीर व अनाकलनीय आह़े रेल्वे स्थानकावरील मुख्यव्दार वगळता कोठेही पोलीस यंत्रणा नाही़ रेल्वेस्थानकाचा आवाका बघता केवळ मुख्य प्रवेशव्दाराजवळच पोलीस पुरेसे आहेत काय असा प्रश्न यातून निर्माण होत आह़ेदुपारी सुरत-भुसावळ पॅसेंजर नंदुरबार रेल्वेस्थानकावर आल्यानंतर एका प्रवाशाची बॅग  रेल्वेत एका सीटवर ठेवण्यात आली़ परंतु संशयितरित्या केवळ बॅग ठेवून निघून जाणारा हा व्यक्ती कोण अशी कोणाकडूनही विचारणा करण्यात आली नाही़ सुमारे 35 मिनिटे झाल्यावरही या बॅगेचा वाली कोण असा प्रश्न ना प्रवाशांना पडला ना रेल्वे प्रशासनाला़ त्यामुळे रेल्वेस्थानक व रेल्वे किती सुरक्षित आहे हेदेखील यातून दिसून येत आह़े रेल्वे स्थानकाच्या दाद:यावरही अज्ञात नागरिक दिवसभर झोपलेले असतात.    यामुळे हे रेल्वेस्थानक आहे  की सार्वजनिक विश्रामगृह असा प्रश्न यामुळे निर्माण होत आह़े याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आह़े अशीच काहीशी परिस्थिती रेल्वेस्थानकाच्या इतरही परिसरात असल्याची दिसून आली़ यामुळे साहजिकच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आह़े कुणीही या अन स्थानकाच्या विश्रामगृहात आराम करून जा.विश्रामगृहाच्या बाहेर  नियमानुसार विश्रामगृहात कोण येत आहे याची नोंद ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून एक कर्मचारी ठेवणे आवश्यक असत़े परंतु या ठिकाणी विश्रामगृहात जात असतानाही  कोणी हटकत नाही किंवा तिकिटाची विचारणाही करीत नाही़  रेल्वे रुळावरून प्रवाशांचा वावरदाद:याचा वापर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत असत़े मात्र याकडे प्रवासी दुर्लक्ष करीत असले तरी रेल्वे प्रशासनाकडून यावर अंकुश ठेवण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही़ सुरत-भुसावळ पॅसेंजर प्लॅटफार्म क्रमांक दोनवर येते. नंदुरबारला उतरणारे प्रवासी दाद:याचा वापर न करता थेट रेल्वे रूळ ओलांडत प्लॅटफार्म क्रमांक  एकवर येत स्थानकाबाहेर जातात.अहमदाबाद-चेन्नई नवजीवन एक्स्प्रेससही याच वेळी येते. त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडणे किती महाग पडू शकते हे यातून दिसून येत आह़े मात्र प्रवासी सर्रासपणे रेल्वे रूळ ओंलाडत असतानाही रेल्वे पोलीस यंत्रणा मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आह़े