शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या फेरीतही नंदुरबार जिल्हा मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 19:32 IST

आरटीई : जिल्ह्यातून केवळ ४२१ आॅनलाईन प्रवेश अर्ज दाखल

नंदुरबार : २५ टक्के मोफत प्रवेश (आरटीई) अंतर्गत जिल्ह्यातून ४७० जागांसाठी केवळ ४२१ आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत़ पहिल्या फेरीपर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात राज्यात ‘सेकंड लास्ट’ असलेला नंदुरबार जिल्हा दुसऱ्या फेरीत शेवटी फेकला गेला असल्याचे दिसून येत आहे़ ३० मार्चपर्यंत आरटीईअंतर्गत प्रवेश करण्याची मुदत पालकांना देण्यात आलेली आहे़जिल्ह्यात एकूण ४७ शाळांच्या माध्यमातून ४७० जागांसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे़ यांतर्गत आतापर्यंत जिल्हाभरातून केवळ ४२१ अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ पैकी, ४२० अर्ज आॅनलाईन पध्दतीने तर एक अर्ज मोबाईल अ‍ॅप्लीकेशनव्दारे सादर करण्यात आलेला आहे़ पहिल्या प्रवेश फेरीपर्यंत राज्यात सर्वाधिक पिछाडीवर असलेल्या सिंधुदूर्ग जिल्ह्याने नंदुरबारला मागे टाकले आहे़ सिंधुदूर्ग जिल्ह्यातून ३५३ आरटीई जागांसाठी एकूण ५१० आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़खान्देशात जळगाव आघाडीवरजळगाव, धुळे व नंदुरबारचा विचार करता आरटीई प्रवेश प्रक्रियेत आॅनलाईन अर्ज सादर करण्यामध्ये जळगाव सर्वाधिक आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे़ जळगावात एकूण २७४ शाळांमार्फत आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे़ एकूण ३ हजार ७१७ जागांपैकी ६ हजार २२८ आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ तर १७ अर्ज मोबाईल अप्लीकेशनव्दारे सादर करण्यात आलेले आहेत़ अशा प्रकारे एकूण ६ हजार २४५ आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ धुळ्यात ९७ शाळांमार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे़ यासाठी १ हजार २३७ जागांसाठी २ हजार ९१ आॅनलाईन अर्ज व ५ अर्ज मोबाईल अ‍ॅप्लीकेशनव्दारे असे एकूण २ हजार ९६ अर्ज दाखल झालेले आहे़इतर आदिवासी जिल्हे नंदुरबारच्या पुढेचआरटीई प्रवेश प्रक्रियेत नंदुरबार जिल्ह्याच्या तुलनेत इतर अनेक आदिवासी तसेच मागास जिल्हे पुढे असल्याचे दिसून येत आहे़ गडचिरोलीत ८२ शाळांच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे़ तेथे एकूण ७८४ जागांसाठी १ हजार २७ इतके आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ पालघर जिल्ह्यात एकूण २२२ शाळांच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे़एकूण जागार ४ हजार २५२ असून त्यासाठी १ हजार १६८ अर्ज दाखल झालेले आहेत़ यवतमाळ जिल्ह्यात १९६ शाळांच्या माध्यमातून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून एकूण जागा १ हजार ७४४ आहेत़ यासाठी तब्बल ४ हजार ४८७ आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़अर्जांची छाननी प्रक्रिया...अद्याप पालकांकडून आॅनलाईन पध्दतीने आरटीई प्रवेशासाठी अर्ज दाखल करण्यात येत आहे़ यासाठी मुदत वाढवून ती ३० मार्च करण्यात आलेली आहे़ या तारखेपर्यंत आलेल्या एकूण अर्जांची व सोबतच्या कागदपत्रांची विभागाकडून छाननी करण्यात येणार आहे़ यातून अनेक प्रस्ताव त्रुटींमुळे रिजेक्ट होण्याचीदेखील शक्यता असते़ त्यामुळे आधीच कमी आलेले प्रस्ताव व त्यात त्रुटींमुळे रिजेक्ट होणारे प्रस्ताव यामुळे परिणामी यंदाही आरटीईच्या जागा रिक्त राहणार की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे़मागील वर्षी आरटीईअंतर्गत जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाला चार प्रवेश फेºया घेण्याची वेळ आली होती़ तरीदेखील मागील वर्षी एकूण १३७ आरटीईच्या जागा शिल्लक होत्या़ तेच आताही होतय की काय अशी भिती शिक्षण विभागाकडून व्यक्त केली जात आहे़ आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत शिक्षण विभागाकडून वारंवार वेळापत्रकात बदल, तारखांचा घोळ आदी सावळा गोंधळ झाला होता़ तसेच आरटीई प्रवेशासाठी अनेकांकडून लॉबिंगदेखील सुरु असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे़