लोकमत न्यूज नेटवर्कनवापुर : तालुक्यातील पाटीबेडकी येथील अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळा ठिबकत असल्याने विद्याथ्र्याची गळती सुरु झाली आह़े विद्याथ्र्याना शाळेत बसणेच शक्य नसल्याने विद्याथ्र्याना सक्तीने गैरहजर रहावे लागत आह़े पाटीबेडकी शाळा आणि अंगणवाडीची गळतीची समस्या गेल्या वर्षांपासून सुरुच असल्यामुळे शिक्षक आणि सेविकांनी पंचायत समितीकडे दुरुस्तीसाठी प्रस्ताव दिला होता़ परंतू पेसा अंतर्गत थेट निधी ग्रामपंचायतीत येतो त्यातून दुरुस्ती करावी असे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी यांनी कळवले होत़े परंतू यानंतरही त्यावर कारवाई झालेली नसल्याने विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत आह़े ग्रामपंचायतीने याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे यासाठी पाठपुरावा करुन लक्ष दिले जात नसल्याचे सांगण्यात आल़े विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान टाळले जावे यासाठी शिक्षकांनी विद्याथ्र्याची बैठक व्यवस्था शाळेजवळ असलेल्या एका सामाजिक सभागृहात केली आह़े याठिकाणी तिसरी आणि चौथीच्या विद्याथ्र्याना एकत्रित बसवले जात आह़े यामुळे त्यांच्या अभ्यासवर परिणाम होत आह़े तसेच यातून विद्यार्थी गैरहजेरीचे प्रमाण वाढून विद्याथ्र्याच्या शिक्षणावर परिणाम होत आह़े याकडे पंचायत समिती प्रशासन किंवा ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष द्यावे अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे. गळणा:या छताची समस्या कायम असताना शाळेत विद्याथ्र्यासाठी ग्रामपंचायतीने पेसा निधीच्या पाच टक्क्यातून वॉटर फिल्टर घेतले होते. तेही बंद अवस्थेत आहे. यातून विद्याथ्र्यांना अशुद्ध पाणी प्यावे लागत असल्याने विद्याथ्र्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आह़े
पाटीबेडकीची शाळा आणि अंगणवाडी ठिबकत असल्याने विद्याथ्र्याची गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 20:35 IST