नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ओबीसी संघटनांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरले. ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी गुरुवारी शहादा येथे एक वाजता, तर नंदुरबार येथे ३ वाजता रास्ता रोको आंदोलन करून एल्गार पुकारण्यात आला.
ओबीसींचे राजकीय आरक्षण घटनात्मक अटींच्या पूर्ततेअभावी स्थगित करण्यात आले आहे. आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध मुद्द्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नेतृत्वात राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार तसेच नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या मार्गदर्शनाने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात ओबीसी राजकीय आरक्षणाचे लाभार्थी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक यांच्यासह सर्व ओबीसी संघटना पदाधिकारी, कार्यकर्ते, परिषदेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र यावे व सरकारला आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी यांनी केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे, जिल्हा सरचिटणीस रामाशंकर माळी, उपाध्यक्ष धर्मेंद्र पाटील, शहादा तालुका अध्यक्ष जगदीश माळी, ईश्वर वारुळे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी, शहर अध्यक्ष सुरेंद्र कुवर, मधुकर माळी, रोहन माळी, मनोज माळी, वासुदेव माळी, रवींद्र माळी, शिंपी समाजाचे अध्यक्ष धनंजय शिंपी, किरण माळी, विजय यादव माळी, चंदू चौधरी, बापू माळी, गणेश न्हावी, समता सैनिक व ओबीसी समाज बांधव, पदाधिकारी उपस्थित होते.