शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात मुदत संपलेल्या कीटक नाशकांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 12:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील एका खाजगी कृषी केंद्रातून मुदतपूर्ण झालेल्या कीटक नाशकाची विक्री केली जात असल्याचा व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरातील एका खाजगी कृषी केंद्रातून मुदतपूर्ण झालेल्या कीटक नाशकाची विक्री केली जात असल्याचा व जादा दराने रासायनिक खतांची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने संताप व्यक्त होत आहे.खरीप पेरणीचा हंगाम व त्यातच दोन दिवस शहर बंद राहील्याने सोमवारी बाजारात सर्वसमावेशक गर्दी झाली होती. शहरात बी-बियाण्यांच्या दुकानांवरही शेतकऱ्यांची एकच गर्दी झाली. याचा फायदा घेत की काय एका दुकानावरून मुदतपूर्ण झालेल्या कीटक नाशकाची विक्री केली गेली. हा प्रकार काही शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दुकानदारास जाब विचारला. गर्दीत हा प्रकार झाला असावा व शेतकºयांनी अशी मुदतबाह्य औषध परत आणल्यास बदलून देण्यात येईल असे सांगितल्यावर या प्रकारावर पडदा पडला.शहरातील रासायनिक खत विक्रेते सर्रासपणे जादा दराने खताची विक्री करीत असल्याची ओरड या निमित्ताने झाली. एकीकडे खताची मात्रा मागणीपेक्षा कमी उपलब्ध होत आहे तर दुसरीकडे जादा दराने विक्री करून सर्रास शेतकºयांची लूट आणि फसवणूक केली जात आहे. कृषी विभागाच्या या प्रकारावर अंकुश दिसून येत नाही. शेतकरी लॉकडाऊनमध्ये आधीच परेशान झाले असून, त्यांना नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांना तोंड द्यावे लागत आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केल्यानंतर तीन आठवडे पावसाने दडी मारल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. गेल्या दोन दिवसात समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरी बियाणे व रासायनिक खतासाठी बाजारात गर्दी करत आहे. बाजारात चढ्या भावाने रासायनिक खतांची विक्री होत असल्याने व पाहिजे तेवढे खत उपलब्ध होत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतीची कामे सोडून त्यास पूर्ण दिवस बाजारात बी-बियाणे व खत खरेदीसाठी लांब रांगेत उभे रहावे लागत असल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकरी शहरातील कृषी केंद्रातून कीटकनाशके खरेदी करीत आहे. मात्र कृषी केंद्रातून खराब व मुदतबाह्य कीटक नाशके विक्री केली जात असल्याने शेतकºयांची फसवणूक होत असल्याने नवापूर तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष जालमसिंग गावीत यांनी संबंधित कृषी केंद्रावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. दुबार पेरणीचे संकट, पुरेश्या प्रमाणात न होणारा खतसाठा, मुदत संपलेले कीटकनाशक विक्री व जादा भावाने होणारी रासायनिक खताची विक्री संदर्भात संबंधित विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.