शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

नंदुरबारात ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त सजला बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 17:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारात ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त बाजार चांगलाच सजला असल्याचे दिसून येत आह़े  सात दिवसाचे सात वेगवेगळे ‘डे’ साजरा करतांना त्यासाठी लागणा:या साहित्याचीही मोठी विक्री होत आहे. दरम्यान, व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासंदर्भातील विरोधाचा सूर उमटू लागल्याने विक्रीवर परिणाम होऊ लागला आहे.14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेमदिन साजरा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारात ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त बाजार चांगलाच सजला असल्याचे दिसून येत आह़े  सात दिवसाचे सात वेगवेगळे ‘डे’ साजरा करतांना त्यासाठी लागणा:या साहित्याचीही मोठी विक्री होत आहे. दरम्यान, व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासंदर्भातील विरोधाचा सूर उमटू लागल्याने विक्रीवर परिणाम होऊ लागला आहे.14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेमदिन साजरा होतो. त्यानिमित्ताने तरुणाईमध्ये गेल्या आठवडय़ापासूनच उत्सूकता आणि उत्साह दिसून येत आहे. त्या आधीच्या सात दिवसात विविध डे साजरा करण्याचेही फॅड असल्यामुळे ते देखील साजरा केले जात आहेत. गेल्या तीन दिवसात रोझ डे,  प्रपोझ डे, चॉकलेट डे, टेडी ड साजरा करण्यात आला. रविवारी प्रॉमीस डे, सोमवारी किस डे तर मंगळवारी हग डे साजरा होणार आहे. बुधवारी व्हॅलेंटाई डे साजरा होईल. रोझ डे च्या दिवशी  मोठय़ा प्रमाणावर गुलाबाचे फूल विकले गेले होते. येथील विक्रेत्यांनी शिर्डी येथून फुलांची मागणी केली होती. दररोज दोन ते तीन रुपयांना विकले जाणारे गुलाबाचे फूल त्या दिवशी पाच ते दहा रुपयांना विकले गेले. चॉकलेट डे ला अर्थात             शुक्रवारी चॉकलेटलाही मोठी              मागणी होती. विविध कंपन्यांनी त्यासाठी विशेष पॅकींगमध्ये चॉकलेट उपलब्ध करून दिले होते. दहा रुपयांपासून 200 रुपयांर्पयत चॉकलेट बाजारात उपलब्ध होते.      टेडी डेसाठी देखील मोठय़ा            प्रमाणावर विविध आकार व प्रकारातील टेडी गिप्ट स्वरूपात विक्रीस आले होते. 50 रुपयांपासून 500 रुपयांर्पयतचे टेडी येथील बाजारात उपलब्ध होते.  व्हॅलेंटाईन डे ला भेट म्हणून दिले जाणारे किचेन, बेल्ट, ब्रासलेट, घडय़ाळ, अंगठी, नेकलेस विविध आकार व प्रकारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्यांनाही मोठय़ा प्रमाणावर मागणी असल्याचे येथील विक्रेते योगेश चौधरी यांनी सांगितले.गेल्या काही वर्षापासून काही पक्ष व संघटना व्हॅलेंटाईन डे ला विरोध करीत आहेत. हा दिवस साजरा होऊ नये म्हणून शाळा, महाविद्यालयांमध्ये जावून प्रबोधन देखील केले जात होते. त्यामुळे या दिनानिमित्त विक्री होणा:या वस्तूंवर देखील मोठा परिणाम होत होता. यंदा मात्र सर्वत्र शांतता असल्यामुळे विक्रेत्यांमध्येही समाधान आहे. परंतु नेहमीच्या अनुभवाप्रमाणे काही विक्रेत्यांनी अशा वस्तू विक्री होत नसल्याचा मागील अनुभवावरून कमी प्रमाणात अशा वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत.