शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

तळोद्यातील ऊस उत्पादकांची व्यथा : बहुतेक शेतक:यांना उसतोडीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : जिल्ह्याबाहेरील कारखान्यांवर अवलंबून असलेल्या तसेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे गेल्या वर्षी उसाची नोंद केली नसलेल्या शेतक:यांना यंदा उसतोड लावण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आह़े अर्थात स्थानिक कारखानदारांनी उसतोड लावून देण्याचे आश्वासन दिले आह़े परंतु तरीही सध्या नोंद असलेल्या उसाचीच तोड प्रथम केली जात आह़े यामुळे तळोद्यातील बहुतेक शेतक:यांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : जिल्ह्याबाहेरील कारखान्यांवर अवलंबून असलेल्या तसेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे गेल्या वर्षी उसाची नोंद केली नसलेल्या शेतक:यांना यंदा उसतोड लावण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आह़े अर्थात स्थानिक कारखानदारांनी उसतोड लावून देण्याचे आश्वासन दिले आह़े परंतु तरीही सध्या नोंद असलेल्या उसाचीच तोड प्रथम केली जात आह़े यामुळे तळोद्यातील बहुतेक शेतक:यांचा बिगर नोंदीचा ऊस पडून आह़े गेल्या वर्षी नगर जिल्ह्यातील संजीवनी, कोपरगांव, कोळपेवाडी, रानवड, संगमनेर, व्दारका, विठेवाडी येथील कारखान्यांबरोबरच गुजरात मधील महुवा, दाद:या, मांडवी, मरोली,  वलसाड, कुकरमुंडा अशा डझनभर कारखान्यांनी जिल्ह्यातील ऊस मोठय़ा प्रमाणात नेला होता़ या कारखान्यांनी जिल्ह्यातील साखर कारखाने व खांडसरींपेक्षा साधारणत शंभर ते दोनशे रुपये अधिक दर दिल्यामुळे शेतक:यांचा कल तिकडेच वाढला होता़ एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील कारखान्यांकडे नोंद केलेला उसदेखील त्यांनाच दिला होता़ साहजिकच गेल्या वर्षी कारखाने व खांडसरींच्या गाळपावर प्रचंड परिणाम होऊन हंगामदेखील लवकर संपला होता़ परंतु यंदाही बाहेरील कारखाने पुन्हा आपल्याकडे येतील या आशेवर जिल्ह्यातील शेतक:यांनी उसाची प्रचंड लागवड केली़ जवळपास गेल्या वर्षाच्या तुलनेत हजारो हेक्टर क्षेत्र वाढल़े शिवाय जिल्ह्यातील तिन्ही कारखान्यांकडे नोंदसुध्दा केली नाही़ मात्र यंदा राज्यभरात उसाचे विक्रमी उत्पादन वाढल्यामुळे साखर कारखानेही पूर्ण क्षमतेने गाळप करीत आहेत़ शिवाय हे कारखाने व खांडस:या आपल्याकडे नोंद केलेल्या उसालाच प्राधान्य देत आहेत़ त्यामुळे बिगर नोंद केलेल्या ऊस उत्पादक शेतक:यांची चांगलीच गोची झाली आह़े कारण बाहेरील कारखाने यंदा जिल्ह्यात आले नाहीत़ त्याचा परिसरातच मुबलक प्रमाणात उसाची लागवड झाली आह़े त्यामुळे त्यांनी इकडे पाठ फिरवल्यामुळे शेतकरीही संकटात सापडल्याची व्यथा आह़े अशा बहुतेक शेतक:यांनी सातपुडा साखर कारखान्याकडे उसतोडीसाठी कच्ची नोंद केली आह़े कारखाने नोंदणीच्या उसाचे गाळप संपल्यानंतर घेण्याचीही संमती दर्शवली आह़े मात्र नोंदलेल्या उसाचे क्षेत्र अजून मोठया प्रमाणात बाकी असल्याने आपला ऊस केव्हा तोडला जाईल? या विवंचनेत शेतकरी सापडला आह़े अनेक शेतक:यांच्या क्षेत्रावरील उसाची वेळेवर तोड होत नसल्यामुळे त्याचे वजनही घटणार असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े शिवाय, एकूणच उसाच्या तोडीबाबत शेतक:यांमध्ये प्रचंड अस्वस्थता दिसून येत आह़े त्या मुळे प्रशासनाने शेतक:यांची ही संभ्रमता दुर करण्याची मागणी करण्यात येत  आह़े