शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

सुसरी धरणाची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:58 IST

सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यातून येणाऱ्या या सुसरी नदीवर पाणी अडविण्यासाठी सुसरी धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणामुळे परिसरातील हजारो हेक्टर ...

सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यातून येणाऱ्या या सुसरी नदीवर पाणी अडविण्यासाठी सुसरी धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणामुळे परिसरातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. पाणी अडविण्यासाठी धरणाचे दरवाजे बंद करण्यात येऊन मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा होतो. या ठिकाणी हौशी नागरिक फिरण्यासाठी तसेच मोबाईलवर सेल्फी काढण्यासाठी धरणावर येतात. नियमाने धरणावर फिरण्यासाठी मनाई आहे. मात्र सुरक्षा रक्षक नसल्याने या ठिकाणी ‘आओ जाओ घर तुम्हारा...’ अशी गत झाली आहे. काही हौशी तरुण या ठिकाणी थेट सुसरी धरणाच्या दरवाजावर चढून मोबाईलद्वारे सेल्फी काढून आनंद घेताना दिसून येतात. या ठिकाणी दुर्घटना जर घडली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सुसरी धरणानजीक तोरणमाळ या पर्यटनस्थळी जाण्यासाठी रस्ता आहे. तोरणमाळला जाणारे हौशी तरुण सुसरी धरणाला भेट देत पाणीसाठा पाहण्यासाठी गर्दी करीत असतात. तसेच पाणीसाठा पाहताना दुर्घटना घडू शकते. हा विचार करीत संबंधित विभागाने तत्काळ दखल घेऊन धरणाच्या धोक्यात आलेल्या स्थितीत सुधारणा करण्याची मागणी होत आहे.

सुरक्षा कठडे लावण्याची गरज

सुसरी धरणावर हौशी तरुण सेल्फी काढण्यासाठी येत असतात. या ठिकाणी सुरक्षा कठडे नसल्याने अनावधानाने तोल गेल्यावर मोठी दुर्घटनादेखील घडू शकते. यासाठी या ठिकाणी सुरक्षा कठडे लावण्याची गरज आहे.