शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सी-लेज ठरणार ग्रामविकासाचा माईलस्टोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 12:12 IST

सिटी टू व्हिलेज अर्थात सी-लेज हा शेतकऱ्यांना स्थानिक ठिकाणीच संशोधीत उत्पादनातून आर्थिक स्तर वाढविण्याचा उपक्रम आहे. कबचौ विद्यापीठ, केव्हीके, बायफ , विज्ञान व तंत्रज्ञान आयोग बीआरसी मिळून जिल्ह्यात हा उपक्रम राबवीत आहे.-प्रा.जे.बी.जोशी

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कराजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग यांच्या सहकार्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाला सी-लेज प्रकल्प मंजुर झाला आहे. विज्ञान व तंत्रज्ञानातून समृद्धी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील बारीपाडा, खांडबारा, शितलपाडा, नगाव, बालआमराई या गावांचा समावेश करण्यात आला आहे. हा उपक्रम ग्रामविकासाचा माईलस्टोन ठरणार असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे माजी संचालक पद्मश्री प्रा.जे.बी.जोशी यांनी केले.प्रश्न : सी-लेज उपक्रमाचा उद्देश काय आहे, त्यातून काय निष्पन्न होईल?उत्तर : सी-लेजचाच अर्थ शहरातून गावात असा आहे. आतापर्यंत जे ही संशोधन होते, प्रयोग होतात ते शहर केंद्रीत राहतात. त्यामुळे गाव हा केंद्रबिंदू माणून त्या अनुषंगाने शेतकरी आणि गावकरी समृद्ध झाला पाहिजे हा उद्देश आहे. शेतीचा कस वाढविणे, शेतातून निर्माण होणारा घन कचºयाचा उपयोग करणे व त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळवून देणे हे देखील अपेक्षीत आहे.प्रश्न : शेतकºयांना याचा फायदा काय व कसा मिळू शकतो?उत्तर : आजच्या स्थितीत शेतातून साधारणत: ६०० मिलीयन टन घनकचरा निघतो. यातून डिझेल बनविता येऊ शकते, कोळसा कांडी तयार करता येऊ शकते. खत तयार करता येते. त्यातील काही भाग शेतातच वापरला तर शेतीचा कस वाढवता येऊ शकतो. उत्पादकता वाढविता येऊ शकते. याच घनकचºयाचा उपयोग बायोगॅससाठी देखील करता येऊ शकतो का? याचे संशोधन करण्यात येत आहे.प्रश्न : आतापर्यंत असे प्रयोग किंवा उपक्रम कुठे सुरू आहेत?उत्तर : उपक्रम म्हणण्यापेक्षा आम्ही विविध भागात भेटी देवून तेथील शेतकरी, उत्पादक समृद्ध कसा होईल, काय संशोधन करता येईल याची चाचपणी केली आहे. कोकण आणि विदर्भाचा पूर्व भागात गेलो आहेत. काजू फळापासून इथेनॉल तयार करता येते. परंतु त्यापुढे जावून आम्ही संशोधन करीत आहोत.१२ प्राध्यापक, २४ संशोधक विद्यार्थी....विद्यापीठाच्या उपक्रमाअंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये संशोधन करणे, पहाणी करणे यासाठी रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे १२ प्राध्यापक, २४ संशोधक विद्यार्थी प्रा.जोशी यांच्या सोबत आहेत. विविध बाबींचा आढावा घेवून, माहिती घेवून आणि याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पहाणी हे पथक दोन दिवसात करणार आहे.उत्तर मिळाले ते वापरले गेले पाहिजे...कुठल्याही संशोधनातून उत्तर मिळाले तर ते वापरले गेले पाहिजे त्याचा उपयोग झाला पाहिजे. परंतु आपल्याकडे ते फार कमी दिसून येते. या उपक्रमातून संशोधनातून निघालेल्या निष्कार्षाचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे हा आग्रह राहणार आहे. सोशल मार्इंडसेट पदरात पाडून घेतला गेला पाहिजे. संशोधक विद्यार्थ्यांना त्यासाठीच प्रोत्साहित केले जात असते.