शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

सी-लेज ठरणार ग्रामविकासाचा माईलस्टोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 12:12 IST

सिटी टू व्हिलेज अर्थात सी-लेज हा शेतकऱ्यांना स्थानिक ठिकाणीच संशोधीत उत्पादनातून आर्थिक स्तर वाढविण्याचा उपक्रम आहे. कबचौ विद्यापीठ, केव्हीके, बायफ , विज्ञान व तंत्रज्ञान आयोग बीआरसी मिळून जिल्ह्यात हा उपक्रम राबवीत आहे.-प्रा.जे.बी.जोशी

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कराजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग यांच्या सहकार्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाला सी-लेज प्रकल्प मंजुर झाला आहे. विज्ञान व तंत्रज्ञानातून समृद्धी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील बारीपाडा, खांडबारा, शितलपाडा, नगाव, बालआमराई या गावांचा समावेश करण्यात आला आहे. हा उपक्रम ग्रामविकासाचा माईलस्टोन ठरणार असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे माजी संचालक पद्मश्री प्रा.जे.बी.जोशी यांनी केले.प्रश्न : सी-लेज उपक्रमाचा उद्देश काय आहे, त्यातून काय निष्पन्न होईल?उत्तर : सी-लेजचाच अर्थ शहरातून गावात असा आहे. आतापर्यंत जे ही संशोधन होते, प्रयोग होतात ते शहर केंद्रीत राहतात. त्यामुळे गाव हा केंद्रबिंदू माणून त्या अनुषंगाने शेतकरी आणि गावकरी समृद्ध झाला पाहिजे हा उद्देश आहे. शेतीचा कस वाढविणे, शेतातून निर्माण होणारा घन कचºयाचा उपयोग करणे व त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळवून देणे हे देखील अपेक्षीत आहे.प्रश्न : शेतकºयांना याचा फायदा काय व कसा मिळू शकतो?उत्तर : आजच्या स्थितीत शेतातून साधारणत: ६०० मिलीयन टन घनकचरा निघतो. यातून डिझेल बनविता येऊ शकते, कोळसा कांडी तयार करता येऊ शकते. खत तयार करता येते. त्यातील काही भाग शेतातच वापरला तर शेतीचा कस वाढवता येऊ शकतो. उत्पादकता वाढविता येऊ शकते. याच घनकचºयाचा उपयोग बायोगॅससाठी देखील करता येऊ शकतो का? याचे संशोधन करण्यात येत आहे.प्रश्न : आतापर्यंत असे प्रयोग किंवा उपक्रम कुठे सुरू आहेत?उत्तर : उपक्रम म्हणण्यापेक्षा आम्ही विविध भागात भेटी देवून तेथील शेतकरी, उत्पादक समृद्ध कसा होईल, काय संशोधन करता येईल याची चाचपणी केली आहे. कोकण आणि विदर्भाचा पूर्व भागात गेलो आहेत. काजू फळापासून इथेनॉल तयार करता येते. परंतु त्यापुढे जावून आम्ही संशोधन करीत आहोत.१२ प्राध्यापक, २४ संशोधक विद्यार्थी....विद्यापीठाच्या उपक्रमाअंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये संशोधन करणे, पहाणी करणे यासाठी रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे १२ प्राध्यापक, २४ संशोधक विद्यार्थी प्रा.जोशी यांच्या सोबत आहेत. विविध बाबींचा आढावा घेवून, माहिती घेवून आणि याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पहाणी हे पथक दोन दिवसात करणार आहे.उत्तर मिळाले ते वापरले गेले पाहिजे...कुठल्याही संशोधनातून उत्तर मिळाले तर ते वापरले गेले पाहिजे त्याचा उपयोग झाला पाहिजे. परंतु आपल्याकडे ते फार कमी दिसून येते. या उपक्रमातून संशोधनातून निघालेल्या निष्कार्षाचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे हा आग्रह राहणार आहे. सोशल मार्इंडसेट पदरात पाडून घेतला गेला पाहिजे. संशोधक विद्यार्थ्यांना त्यासाठीच प्रोत्साहित केले जात असते.