शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

उन्हाच्या कडाक्याने रोजा जातोय जड; भक्तीची अग्निपरीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:31 IST

पवित्र रमजान महिन्यात आतापर्यंत १५ उपवास पार पडले असून, यंदा रोजेधारकांचा चांगलाच कस लागला आहे. असे असले तरी रोजा ...

पवित्र रमजान महिन्यात आतापर्यंत १५ उपवास पार पडले असून, यंदा रोजेधारकांचा चांगलाच कस लागला आहे. असे असले तरी रोजा ठेवणाऱ्या मुस्लिम भाविकांच्या उत्साहात मात्र कमीपणा झाल्याचे अजिबात दिसत नाही. मुस्लिम बांधवांमध्ये आत्मशुद्धी आणि अल्लाहवरील भक्तीचे प्रतीक म्हणून रमजान महिना पाळला जातो. इस्लाम धर्मामध्ये मोहम्मद पैगंबर यांनी सांगितलेल्या इमान, नमाज, रोजा, जकात, हज या पाच कर्तव्यांपैकी रोजा हे पवित्र कर्तव्य मानले जाते. तसेच हजसाठी ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे, तेच करतात. तराबीच्या नमाजमध्ये पूर्ण कुराणपठण केले जाते आणि हे याच महिन्यात करण्यात येत असते. या पवित्र महिन्यात कुराणपठण, रोजे, तराबीची नमाज याला फार महत्त्व असते.

रमजान महिन्यामध्ये अल्लाहजवळ आपली पवित्र भक्ती व्यक्त केली जाते. तसेच या पवित्र महिन्यात पहाटे ६ नंतर संपूर्ण दिवस अन्नपाण्याविना राहणे, चांगले विचार आणि आचार ठेवणे व कुराणपठण करत राहणे आणि इफ्तारच्या वेळी रोजा सोडणे, असा रमजान महिन्यातील दिनक्रम असतो. संध्याकाळी सूर्यास्तानंतर मशिदीमध्ये उपवास सोडला जातो. तसेच आर्थिक उत्पन्नापेक्षा २.५० टक्के रक्कम रमजान महिन्यात द्यावी लागते, यालाच जकात म्हणतात. मुस्लिम बांधवांसाठी हा महिना वर्षातील पवित्र महिना मानला जातो. या पवित्र महिन्यात हिंदू-बांधवांकडून मुस्लिम बांधवांसाठी पार्टीचे आयोजन करण्यात येत असते. यामुळे या महिन्यात सामाजिक व ऐक्याची भावना निर्माण होत असते. त्यामुळे समाजात भाईचारा वाढत जातो. रमजान महिना म्हणजे उपासना करणे व आभार प्रदर्शनाचा महिना मानला जातो. या शब्दाचा अर्थ असा आहे की, इस्लाम म्हणजे मानवाचे ईश्वराला आत्मसमर्पण. ईश्वराच्या प्रत्येक आज्ञेचे पालन केले जाईल. या महिन्यात दान-धर्म करण्याला विशेष महत्त्व आहे. तसेच याच महिन्यात तरहवीच्या नमाजला फार महत्त्व असते. तरहवीच्या नमाजमध्ये २० वेळा नमाजपठण करावी लागते. याच महिन्यात पवित्र कुराण उतरविण्यात आली आहे. रमझान महिना हा शांतीचा प्रेमाचा महिना मानला जातो. एक महिनाभर पवित्र अशा रमजान सणामध्ये हिंदू-मुस्लिम एकत्र मोठ्या गुण्यागोविंदाने राहतात. इफ्तार पार्टी करून जगाला एक चांगल्या प्रकारे संदेश देतात.

४२ ते ४४ डिग्री उष्णता व भयंकर तापमान असताना मुस्लिम बांधवांना मात्र कर्तव्य असलेले रोजे ठेवून नमाज, कुराणपठण असे कार्य करावेच लागतात. इफ्तारच्या वेळेपर्यंत रोजेदार पाण्यावाचून व्याकूळ होतो. मात्र, महंमद पैगंबरांनी ईश्वरभक्ती आणि रोजाच्या माध्यमातून अन्न-पाण्याची किंमत आणि संयम काय आहे, ही शिकवण मिळते. -नजमुद्दीन मन्यार, बामखेडा