शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या कडाक्याने रोजा जातोय जड; भक्तीची अग्निपरीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:31 IST

पवित्र रमजान महिन्यात आतापर्यंत १५ उपवास पार पडले असून, यंदा रोजेधारकांचा चांगलाच कस लागला आहे. असे असले तरी रोजा ...

पवित्र रमजान महिन्यात आतापर्यंत १५ उपवास पार पडले असून, यंदा रोजेधारकांचा चांगलाच कस लागला आहे. असे असले तरी रोजा ठेवणाऱ्या मुस्लिम भाविकांच्या उत्साहात मात्र कमीपणा झाल्याचे अजिबात दिसत नाही. मुस्लिम बांधवांमध्ये आत्मशुद्धी आणि अल्लाहवरील भक्तीचे प्रतीक म्हणून रमजान महिना पाळला जातो. इस्लाम धर्मामध्ये मोहम्मद पैगंबर यांनी सांगितलेल्या इमान, नमाज, रोजा, जकात, हज या पाच कर्तव्यांपैकी रोजा हे पवित्र कर्तव्य मानले जाते. तसेच हजसाठी ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे, तेच करतात. तराबीच्या नमाजमध्ये पूर्ण कुराणपठण केले जाते आणि हे याच महिन्यात करण्यात येत असते. या पवित्र महिन्यात कुराणपठण, रोजे, तराबीची नमाज याला फार महत्त्व असते.

रमजान महिन्यामध्ये अल्लाहजवळ आपली पवित्र भक्ती व्यक्त केली जाते. तसेच या पवित्र महिन्यात पहाटे ६ नंतर संपूर्ण दिवस अन्नपाण्याविना राहणे, चांगले विचार आणि आचार ठेवणे व कुराणपठण करत राहणे आणि इफ्तारच्या वेळी रोजा सोडणे, असा रमजान महिन्यातील दिनक्रम असतो. संध्याकाळी सूर्यास्तानंतर मशिदीमध्ये उपवास सोडला जातो. तसेच आर्थिक उत्पन्नापेक्षा २.५० टक्के रक्कम रमजान महिन्यात द्यावी लागते, यालाच जकात म्हणतात. मुस्लिम बांधवांसाठी हा महिना वर्षातील पवित्र महिना मानला जातो. या पवित्र महिन्यात हिंदू-बांधवांकडून मुस्लिम बांधवांसाठी पार्टीचे आयोजन करण्यात येत असते. यामुळे या महिन्यात सामाजिक व ऐक्याची भावना निर्माण होत असते. त्यामुळे समाजात भाईचारा वाढत जातो. रमजान महिना म्हणजे उपासना करणे व आभार प्रदर्शनाचा महिना मानला जातो. या शब्दाचा अर्थ असा आहे की, इस्लाम म्हणजे मानवाचे ईश्वराला आत्मसमर्पण. ईश्वराच्या प्रत्येक आज्ञेचे पालन केले जाईल. या महिन्यात दान-धर्म करण्याला विशेष महत्त्व आहे. तसेच याच महिन्यात तरहवीच्या नमाजला फार महत्त्व असते. तरहवीच्या नमाजमध्ये २० वेळा नमाजपठण करावी लागते. याच महिन्यात पवित्र कुराण उतरविण्यात आली आहे. रमझान महिना हा शांतीचा प्रेमाचा महिना मानला जातो. एक महिनाभर पवित्र अशा रमजान सणामध्ये हिंदू-मुस्लिम एकत्र मोठ्या गुण्यागोविंदाने राहतात. इफ्तार पार्टी करून जगाला एक चांगल्या प्रकारे संदेश देतात.

४२ ते ४४ डिग्री उष्णता व भयंकर तापमान असताना मुस्लिम बांधवांना मात्र कर्तव्य असलेले रोजे ठेवून नमाज, कुराणपठण असे कार्य करावेच लागतात. इफ्तारच्या वेळेपर्यंत रोजेदार पाण्यावाचून व्याकूळ होतो. मात्र, महंमद पैगंबरांनी ईश्वरभक्ती आणि रोजाच्या माध्यमातून अन्न-पाण्याची किंमत आणि संयम काय आहे, ही शिकवण मिळते. -नजमुद्दीन मन्यार, बामखेडा