शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

रापापूर ते माळखुर्द हा साडेपाच किलोमीटरचा रस्ता ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:20 IST

सातपुड्यातील दुर्गम भागातील अनेक गावांना धड रस्ते नाहीत. त्यामुळे स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतरदेखील तेथील आदिवासींना सपाटीपर्यंत थेट डोंगर पार करून ...

सातपुड्यातील दुर्गम भागातील अनेक गावांना धड रस्ते नाहीत. त्यामुळे स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतरदेखील तेथील आदिवासींना सपाटीपर्यंत थेट डोंगर पार करून पायपीट करत तालुक्याचे मुख्यालय असलेल्या तळोदा येथे यावे लागत असते. साहजिकच प्रशासनाने निदान आमच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी त्यांची रास्त अपेक्षा आहे. तळोद्याहून माळ खुर्द परिसरातील साधारण १० ते १२ गाव, पाड्यांना जाण्यासाठी माळ खुर्दपर्यंत कच्चा रस्ता संबंधित प्रशासनाने तयार केला होता. रापापूरपासून माळ खुर्दपर्यंत साधारण साडेपाच किलो मीटर अंतराचा हा रस्ता आहे. शासनाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून त्याचे डांबरीकरणाचे कामही नुकतेच पूर्ण केले आहे. साधारण चार कोटी ८० लाख रुपयांचा निधी यावर खर्च करण्यात आला आहे. तथापि केवळ संरक्षक कठड्यांच्या किरकोळ कामाअभावी सदर रस्ता वाहनधारकांसाठी जीवघेणा बनला आहे.

वास्तविक हा रस्ता घाट वळणाचा आहे. या रस्त्याच्या आजूबाजूला मोठ-मोठ्या खोल दऱ्या आहेत. अशी वस्तुस्थिती असताना अजूनही संबंधित यंत्रणेने संरक्षक कठड्यांचे काम का हाती घेतले नाही, असा प्रश्न येथील वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. तब्बल १० ते १२ पाड्यांमधील नागरिक दुचाकी, चारचाकीने येथून प्रवास करत असतात. ते जीव मुठीत धरून पुढे मार्गक्रमण करतात. विशेषत: दोन ते तीन ठिकाणचे वळणे अतिशय धोकेदायक आहेत. केव्हा गाडी फेल होऊन खोल दरीत कोसळेल याचा नेम नाही. तरीही संबंधित यंत्रणा दखल घ्यायला तयार नाही. याबाबत रहिवाशांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विशेषत: हा रस्ता महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अस्तंबा देवस्थानाला जोडतो. साहजिकच येथील वाहतुकीची वर्दळ अधिकच वाढणार आहे. शिवाय तेथून पुढे धडगावकडे जाणाऱ्या रस्त्याचं कामदेखील सुरू आहे. त्यामुळे संरक्षक कठड्यांची कामे हाती घेण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी आहे.

रस्त्याला लागूनच सिंचन प्रकल्प

या रस्त्याला अगदी लागूनच रापापूर हा तालुक्यातील सर्वात मोठा लघू सिंचन प्रकल्प बांधला जात आहे. रस्त्याचा साधारण १० ते १२ फुटपासून पिचिंगचे काम केले आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्याने रस्त्याचाही भराव खचण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तेथेदेखील संरक्षक कठडे बांधण्याची गरज आहे. मात्र संबंधित अधिकारी त्याकडेही साफ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. या घाट रस्त्याचा कामाच्या दर्जा बाबतीतही नागरिकांनी शंका उपस्थित करून चौकशीची मागणी केली आहे. कारण निकृष्ट काम झाल्याचा आरोप केला आहे.

स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतर आमच्या नशिबी पक्का रस्ता आता आला आहे. साहजिकच खूप आनंद झाला आहे. मात्र घाट रस्ता असल्याने या मार्गावर धोकेदायक वळणेदेखील आहेत. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन संरक्षक कठडे बांधण्याची गरज आहे. नेमके त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. संबंधित विभागाने तातडीने संरक्षक कठडे उभारावेत. - बोखा पाडवी, रहिवाशी, माळ खुर्द, ता.तळोदा