लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : रिक्षा व्यवसायामुळे गुजरातमध्ये जेमतेम व्यवसायाची घडी बसत होती. पण त्यालाही कोरोनाची दृष्ट नजर लागली असून आता रिक्षावरच आमच्या संसाराचे बिºहाड घेऊन आमच्या गावी बनारसला निघालो आहोत, ही प्रतिक्रिया आहे सुरतमधून १४०० किलोमीटर लांब आपल्या गावी रिक्षानेच परतीला निघालेल्या चंदीलाल याची.कोरोनामुळे परराज्यात उदरनिर्वाहासाठी गेलेल्या कुटुंबांचे खूपच हाल होत आहेत. या कुटुंबांना आता आपल्या गावाची ओढ लागली असून कसे का असेना गावी पोहोचावे या भावनेतून रोज हजारो कुटुंब रस्त्यावर दिसत आहेत. असेच सायन (सुरत) मधून रिक्षावरच आपला संसार घेऊन गावी निघालेल्या कुटुंबांचे हाल खूपच वाईट आहेत. नंदुरबार-प्रकाशा रस्त्यावरुन सलग एका रांगेत रिक्षा जात होत्या. हे कुटुंब दुपारच्यावेळी सावलीत एका झाडाखाली विसावले होते. या वेळी त्यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, आम्ही मूळ बनारसचे (उत्तर प्रदेश) आहोत. १५ वर्षापूर्वी रोजगारासाठी सुरतेला आलो. तेथेच रिक्षा व्यवसाय करू लागलो. त्याठिकाणी आम्ही सर्वजण एकाच इमारतीत राहत होतो. आता कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाली. रोजगारही बुडाला. घरमालकाला देण्यासाठी भाडे नव्हते. त्यामुळे घरमालकाने दोन महिन्याऐवजी किमान एका महिन्याचे तरी भाडे द्या आणि घर खाली करा, असा तगादा लावला. त्यामुळे आम्ही सर्वांनी आपल्या गावी परत जाण्याचा निर्णय घेतला. रिक्षातच सर्व सामान घेऊन आम्ही गावाकडे निघालो आहोत.
संसाराचे बिºहाड घेऊन रिक्षा चालकांचा १४०० किलोमीटरचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 12:49 IST