शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

संसाराचे बिºहाड घेऊन रिक्षा चालकांचा १४०० किलोमीटरचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादे : रिक्षा व्यवसायामुळे गुजरातमध्ये जेमतेम व्यवसायाची घडी बसत होती. पण त्यालाही कोरोनाची दृष्ट नजर ...

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : रिक्षा व्यवसायामुळे गुजरातमध्ये जेमतेम व्यवसायाची घडी बसत होती. पण त्यालाही कोरोनाची दृष्ट नजर लागली असून आता रिक्षावरच आमच्या संसाराचे बिºहाड घेऊन आमच्या गावी बनारसला निघालो आहोत, ही प्रतिक्रिया आहे सुरतमधून १४०० किलोमीटर लांब आपल्या गावी रिक्षानेच परतीला निघालेल्या चंदीलाल याची.कोरोनामुळे परराज्यात उदरनिर्वाहासाठी गेलेल्या कुटुंबांचे खूपच हाल होत आहेत. या कुटुंबांना आता आपल्या गावाची ओढ लागली असून कसे का असेना गावी पोहोचावे या भावनेतून रोज हजारो कुटुंब रस्त्यावर दिसत आहेत. असेच सायन (सुरत) मधून रिक्षावरच आपला संसार घेऊन गावी निघालेल्या कुटुंबांचे हाल खूपच वाईट आहेत. नंदुरबार-प्रकाशा रस्त्यावरुन सलग एका रांगेत रिक्षा जात होत्या. हे कुटुंब दुपारच्यावेळी सावलीत एका झाडाखाली विसावले होते. या वेळी त्यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, आम्ही मूळ बनारसचे (उत्तर प्रदेश) आहोत. १५ वर्षापूर्वी रोजगारासाठी सुरतेला आलो. तेथेच रिक्षा व्यवसाय करू लागलो. त्याठिकाणी आम्ही सर्वजण एकाच इमारतीत राहत होतो. आता कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाली. रोजगारही बुडाला. घरमालकाला देण्यासाठी भाडे नव्हते. त्यामुळे घरमालकाने दोन महिन्याऐवजी किमान एका महिन्याचे तरी भाडे द्या आणि घर खाली करा, असा तगादा लावला. त्यामुळे आम्ही सर्वांनी आपल्या गावी परत जाण्याचा निर्णय घेतला. रिक्षातच सर्व सामान घेऊन आम्ही गावाकडे निघालो आहोत.