शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

नवापूर तालुक्यातील खडकी येथे पाणलोट योजनेच्या कामांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील खडकी येथे एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार डॉ.हीना गावीत व  आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी केले. या कार्यक्रमात एकात्मिक पाणलोट अंतर्गत राबविण्यात येणा:या योजनेतील कामांचा आढावा घेऊन माहिती देण्यात आली. संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष सुभाष गावीत, जि.प. सदस्य अंकुश गावीत, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील खडकी येथे एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार डॉ.हीना गावीत व  आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी केले. या कार्यक्रमात एकात्मिक पाणलोट अंतर्गत राबविण्यात येणा:या योजनेतील कामांचा आढावा घेऊन माहिती देण्यात आली. संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष सुभाष गावीत, जि.प. सदस्य अंकुश गावीत, भीमसिंग गावीत, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक दीपक पटेल, शहादा वनविभागाचे उपवनसंरक्षक एस.पी. केवठे, उपप्रकल्प व्यवस्थापक एस.आर. महाले, अक्राणीचे सहायक  वनसंरक्षक एस.आर. चौधरी, जिल्हा प्रकल्प अधिकारी सचिन मांघाडे, तालुका कृषी अधिकारी वसंत  चौधरी, सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, भाजप जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सविता जयस्वाल, भाजपचे तालुका अध्यक्ष प्रदीप वळवी, खडकीचे सरपंच विनायक गावीत, उपसरपंच रुवाजी गावीत, भीमसिंग गावीत, चिंचपाडाचे वनक्षेत्रपाल पवार आदी उपस्थित होते. खासदार डॉ.हीना गावीत म्हणाल्या की, एकत्मिक पाणलोटअंतर्गत अनेक योजना सरकारने दिल्या आहेत. त्यात           रॅाकेल विक्री, शेळीपालन, कुक्कुटपालन यासाठी 44 लोकांची निवड करण्यात आली आहे. शेतक:यांसाठीच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेत 296 लाभार्थीची निवड करण्यात आली आहे. जोड व्यवसायासाठी 24 हजार अनुदान व महिला बचत गटासाठी 25 हजार अनुदान व कौशल्य विकास अंतर्गत दहावी व बारावी उत्तीर्ण  मुलांसाठी ऑनलाईन व संगणक प्रशिक्षण, आर्थिक सक्षमीकरणासाठी स्वत:चा व्यवसाय सुरु करु शकतात असे सांगून महिला बचत गटाव्दारे बिनव्याजाने कर्ज उपलब्ध करण्यात आले आहे. उज्वला लाभार्थी योजनेत नंदुरबार जिल्ह्यात दोन लाख गॅस जोडणी  मंजूर असून 50 हजार जोडणी वाटप झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.  आमदार डॉ.विजयकुमार गावीत म्हणाले की, पाणलोट ही योजना सन 2008 पासून सुरु आहे. त्यात  ग्रीन हाऊस योजना, उपसा सिंचन योजना, जोड व्यवसायात कुक्कटपालन, शेळीपालन, संजय निराधार योजना व विविध आजारांसाठी योजना अशा 11 ते 12 योजना असल्याचे त्यांनी सांगितले. खडकीच्या माजी सरपंच सविता सुभाष गावीत, चितवीचे सरपंच दिनेश गावीत, रमेश गावीत, दौलत कोकणी, जयपाल गावीत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन वागदीचे सरपंच किसन गावीत यांनी तर आभार उमेश भदाणे यांनी मानले.