शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

परतीच्या पावसाचा कालावधी वाढतोय

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: July 22, 2018 13:23 IST

पर्यावरणातील बदल : 2010 ते 2017 र्पयतचा ‘रेन विड्रोलेशन पिरियड’

ठळक मुद्देएकदाही परतीच्या पावसाला सुरुवात ही 1 सप्टेंबर पासून झालेली नाही़  पश्चिम राजस्थानातून परतीचा पाऊस सुरूपावसाचे दिवस हे साधारणत 70

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या आठ वर्षापासून परतीच्या पावसाची वाटचाल चिंताजनक होत असल्याचे दिसून येत आह़े वर्षागणिक परतीच्या पावसाचा कालावधी वाढत असून ऋतुमधील ही असमानता पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरू पाहत आह़े यंदाही महाराष्ट्रातील परतीच्या पावसाला ऑक्टोबर महिन्यातील शेवटचा आठवडा उजाडणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात येत आह़े 2010 पासून ते 2017 र्पयतचा ‘रेन विड्रोलेशन पिरियड’ पाहिला असता, 2010 साली 27 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून परतीच्या पावसाला सुरुवात झाली होती़ महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला सुरुवात 10 ऑक्टोबरपासून होत साधारणत: 20 ऑक्टोबर्पयत महाराष्ट्रातून परतीच्या  पावसाचा कालावधी पूर्णत्वास आला होता़ 2011 मध्ये 23 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून परतीच्या पावसाला सुरुवात झाली होती़ त्या वर्षी साधारणत: तीन आठवडे उशिराने परतीच्या पावसाला सुरुवात झालेली होती़ त्यानंतर 30 सप्टेंबर र्पयत महाराष्ट्रातून परतीचा पाऊस सुरू झाला होता़ परंतु त्यात कमी दाबाचा पट्टा व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्री वादळामुळे या ठिकाणी ‘ब्रेक डाऊन’ निर्माण झाला होता़ परिणामी महाराष्ट्रातून परतीचा पाऊस जाण्यास 25 ऑक्टोबर उजाडला होता़2012 मध्ये पश्चिम राजस्थानातून 24 सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली होती़ त्यानंतर साधातरण 27 सप्टेंबरपासून दक्षिण गुजरात व कच्छ येथून परतीचा पाऊस सुरू झाला होता़ त्यानंतर साधारणत: 30 ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्रातून परतीचा पाऊस सुरू झाला होता़ 2013 मध्ये 9 ऑक्टोबरपासून पश्चिम राजस्थानातून परतीच्या पावसाने सुरुवात केली होती़ तसेच 17 ऑक्टोबरपासून महाराष्ट्र सीमा हद्दीतून परतीचा पाऊस सुरू होत 20 ऑक्टोबर्पयत तो पूर्णपणे परतला होता़ 2014 मध्ये 23 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून परतीचा पाऊस सुरू झाला होता़ त्यानंतर 5 ऑक्टोबरपासून महाराष्ट्राच्या हद्दीतून परतीचा पाऊस सुरू होऊन 17 ऑक्टोबर्पयत महाराष्ट्रातून पूर्णपणे परतीचा पाऊस निघून गेला़ 2015 मध्ये 4 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून परतीच्या पावसाने सुरुवात केली होती़ 6 ऑक्टोबरपासून त्याने महाराष्ट्रातून परतीला सुरुवात करून 18 ऑक्टोबर्पयत तो पूर्णपणे परतला होता़  2016 साली परतीच्या पावसाला पुन्हा विलंबाने सुरुवात झाली होती़ 15 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून परतीचा पाऊस सुरू झाला होता़ तब्बल एक महिन्याने म्हणजे 14 ऑक्टोबरपासून परतीच्या पावसाने महाराष्ट्र हद्दीतून सुरुवात करुन 18 ऑक्टोबर्पयत तो पूर्णपणे परतला होता़ 2017 साली पश्चिम राजस्थानातून परतीच्या पावसाने तब्बल 27 सप्टेंबरपासून सुरुवात केली होती़ 15 ऑक्टोबरपासून त्याने महाराष्ट्राच्या हद्दीतून परतण्यास सुरुवात करून 25 ऑक्टोबर्पयत तो पूर्णपणे महाराष्ट्राच्या हद्दीतून परतला होता़ पावसाचा सामान्य कालावधी जून ते सप्टेंबर इतका असतो़ त्यातील पावसाचे दिवस हे साधारणत 70 इतके समजण्यात येत असतात़ 1 सप्टेंबरपासून पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होत असत़े परंतु पर्यावरणाचे बिघडते चक्र म्हणून की काय, गेल्या आठ वर्षांपासून एकदाही परतीच्या पावसाला सुरुवात ही 1 सप्टेंबर पासून झालेली नाही़ 

साधारणत 1 सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला पश्चिम राजस्थानातून सुरुवात होत असत़े परंतु गेल्या काही वर्षापासून परतीचा पाऊस सप्टेंबरच्या शेवटापासून सुरु होत आह़े परतीच्या पावसाचा वाढता कालावधी चिंतेचा विषय आह़े    डॉ़ शुभांगी भुते,    शास्त्रज्ञ, कुलाबा वेधशाळा़