शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नंदुरबारातील मजूर स्थलांतरामुळे परीक्षांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 16:08 IST

नंदुरबार :  प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या प्रथम सत्राच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. काही शाळांनी सुरुवातीलाच तोंडी परीक्षा घेण्यास सुरुवात ...

नंदुरबार :  प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या प्रथम सत्राच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. काही शाळांनी सुरुवातीलाच तोंडी परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे तर काही शाळा लेखी परीक्षेनंतर तोंडी परीक्षा घेणार आहेत. असे असले तर मजूर स्थलांतर करीत असतांना आपल्या पाल्यांना देखील घेवून जात असल्यामुळे अनेक शाळा ओस पडत आहे. परिणामी सत्र परिक्षांवर देखील परिणाम होत आहे. दरम्यान, पायाभूत चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आता विद्या प्राधिकरणाकडून न येता स्थानिक ठिकाणीच शिक्षक काढणार आहेत. त्यामुळे प्रश्नपत्रिकांचा घोळ थांबणार आहे.दुष्काळाच्या पाश्र्वभुमीवर यंदा प्रथम सत्राच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. सोमवारपासून काही शाळांमध्ये तोंडी परीक्षेला सुरुवात झाली आहे. लेखी परीक्षांना येत्या दोन दिवसात सुरूवात होणार आहे. 3 नोव्हेंबर्पयत प्रथम सत्राच्या लेखी व तोंडी परीक्षा झाल्यानंतर दिवाळीच्या सुटय़ा राहणार आहेत. साधारणत: 17 ते 21 दिवस या सुटय़ा राहणार आहेत. 20 नोव्हेंबरपासून दुस:या सत्राला सुरुवात होणार आहे. दुष्काळी पाश्र्वभुमीजिल्ह्यात दुष्काळी पाश्र्वभुमीवर यंदा शाळांच्या परीक्षा होत आहेत. अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. खरीप पीक हाताचे गेल्याने ग्रामिण भागात हलाखीची परिस्थिती निर्माण होत आहे. अशा वेळी या परीक्षा होत आहेत.मजुरांचे स्थलांतरजिल्ह्यातील अनेक गावांमधील मजुर रोजगारासाठी इतर जिल्ह्यात स्थलांतर करीत आहेत. गावोगावी ट्रका भरून मजूर परराज्या रवाना होत आहेत. मजुर आपल्यासोबत आपल्या पाल्यांना देखील घेवून जात असल्यामुळे त्यांच्या शाळेचा आणि परीक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे ग्रामिण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना मोठी कसरत करावी लागणार आहे. मुलांना परीक्षेनंतर घेवून जाण्याची विनंती काही ठिकाणी शिक्षक करीत    आहेत. पायाभूत चाचणीसाठी सर्वच विद्यार्थी उपस्थित राहणे आवश्यक असते. त्यामुळे शिक्षकांची घालमेल सुरू आहे. दुसरीकडे स्थलांतरीत होणारे मजूर व पालक आपल्या पाल्याला अर्थात विद्याथ्र्याला कुणाच्या भरोशावर गावी सोडून जावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकत  आहे. यामुळे विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यावर प्राथमिक शिक्षण विभागातर्फे पर्याय निर्माण करणे आवश्यक आहे.