शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील मजूर स्थलांतरामुळे परीक्षांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 16:08 IST

नंदुरबार :  प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या प्रथम सत्राच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. काही शाळांनी सुरुवातीलाच तोंडी परीक्षा घेण्यास सुरुवात ...

नंदुरबार :  प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या प्रथम सत्राच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. काही शाळांनी सुरुवातीलाच तोंडी परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे तर काही शाळा लेखी परीक्षेनंतर तोंडी परीक्षा घेणार आहेत. असे असले तर मजूर स्थलांतर करीत असतांना आपल्या पाल्यांना देखील घेवून जात असल्यामुळे अनेक शाळा ओस पडत आहे. परिणामी सत्र परिक्षांवर देखील परिणाम होत आहे. दरम्यान, पायाभूत चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आता विद्या प्राधिकरणाकडून न येता स्थानिक ठिकाणीच शिक्षक काढणार आहेत. त्यामुळे प्रश्नपत्रिकांचा घोळ थांबणार आहे.दुष्काळाच्या पाश्र्वभुमीवर यंदा प्रथम सत्राच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. सोमवारपासून काही शाळांमध्ये तोंडी परीक्षेला सुरुवात झाली आहे. लेखी परीक्षांना येत्या दोन दिवसात सुरूवात होणार आहे. 3 नोव्हेंबर्पयत प्रथम सत्राच्या लेखी व तोंडी परीक्षा झाल्यानंतर दिवाळीच्या सुटय़ा राहणार आहेत. साधारणत: 17 ते 21 दिवस या सुटय़ा राहणार आहेत. 20 नोव्हेंबरपासून दुस:या सत्राला सुरुवात होणार आहे. दुष्काळी पाश्र्वभुमीजिल्ह्यात दुष्काळी पाश्र्वभुमीवर यंदा शाळांच्या परीक्षा होत आहेत. अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. खरीप पीक हाताचे गेल्याने ग्रामिण भागात हलाखीची परिस्थिती निर्माण होत आहे. अशा वेळी या परीक्षा होत आहेत.मजुरांचे स्थलांतरजिल्ह्यातील अनेक गावांमधील मजुर रोजगारासाठी इतर जिल्ह्यात स्थलांतर करीत आहेत. गावोगावी ट्रका भरून मजूर परराज्या रवाना होत आहेत. मजुर आपल्यासोबत आपल्या पाल्यांना देखील घेवून जात असल्यामुळे त्यांच्या शाळेचा आणि परीक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे ग्रामिण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना मोठी कसरत करावी लागणार आहे. मुलांना परीक्षेनंतर घेवून जाण्याची विनंती काही ठिकाणी शिक्षक करीत    आहेत. पायाभूत चाचणीसाठी सर्वच विद्यार्थी उपस्थित राहणे आवश्यक असते. त्यामुळे शिक्षकांची घालमेल सुरू आहे. दुसरीकडे स्थलांतरीत होणारे मजूर व पालक आपल्या पाल्याला अर्थात विद्याथ्र्याला कुणाच्या भरोशावर गावी सोडून जावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकत  आहे. यामुळे विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यावर प्राथमिक शिक्षण विभागातर्फे पर्याय निर्माण करणे आवश्यक आहे.