शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

दुपारच्यावेळी विश्रांती घेत परप्रांतीय मजूर निघाले गावाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : लॉकडाऊनमुळे रोजगार बंद झाल्याने अनेक परप्रांतीय मजूर पायपीट करीत गावाकडे परतत आहेत. पायपीट करून ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : लॉकडाऊनमुळे रोजगार बंद झाल्याने अनेक परप्रांतीय मजूर पायपीट करीत गावाकडे परतत आहेत. पायपीट करून थकल्यानंतर दुपारच्यावेळी अनेक जण रस्त्यालगत झाडाखाली विश्रांती घेत असल्याचे चित्र शहादा-खेतिया मार्गावर जागोजागी दिसून येत आहे.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आल्याने हातमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांचे हाल होत आहेत. गुजरातमध्ये रोजगारासाठी गेलेले परप्रांतीय मजूर मिळेल त्या वाहनाने व पायपीट करीत गावाकडे परतत असल्याचे रस्त्यांवर जागोजागी दिसत आहेत.बिहार राज्यातील बाका जिल्ह्यातील ३५ मजुरांची टोळी शहादा-खेतिया मार्गावर सहकुटुंब चालत जातानाचे भीषण चित्र पहायला मिळाले. दिवसभर चालायचं, दुपारी रस्त्यावर मिळेल त्या झाडाखाली विश्रांती घ्यायची आणि संध्याकाळी व रात्रभर पायपीट करायची. जिथं मिळेल तिथं आणि कुणी देईल ते खायचं, अशी त्यांची दिनचर्या झाली आहे. गुजरात राज्यासह इतर जिल्ह्यातील कंपनीत काम करणाºया मजुरांना संबंधित कंपन्यांनी वाºयावर सोडले आहे. कंपनीने कोणतीही सोय आम्हाला उपलब्ध करुन दिलेली नाही, असा आरोप गावाकडे निघालेल्या परप्रांतीय मजुरांनी केला. घरात खायला नाही, मग तेथे राहून तरी काय उपयोग, येथे मरायचे असेल तर चालत जाऊन गावी पोहोचायचा मार्ग निवडला आहे. मरण हे कायम आहे. जर वाटेत मरण आले तरी चालेल. पण येथे थांबायचे नाही, असा विचार मनात या मजुरांनी घेतला असून ते पायपीट करीत परतीकडे निघालेले आहेत.पायी निघालेल्या मंजुरांना समाजसेवी संस्था व दानशूर व्यक्तींकडून जागोजागी मदत करण्यात येत आहे. ब्राह्मणपुरी येथील सरीबेन इंदास पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी. पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेत या मजुरांची जेवणाची सोय केली. त्याचबरोबर इतरांकडून बिस्कीट व चिवडा वाटप करण्यात आला.गेल्या दीड महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रसार कमी व्हावा यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु अडकलेल्या मजुरांचे हाल होत आहे. ज्याजागी कामाला त्या ठिकाणचे मालक मजुरांना पायी आपल्या घरी सोडून देत असल्याचे समोर आले आहे. यामुळे मजुरांना वाहनांची सोय नसल्याने त्यांना अक्षरश: पायी नाईलाजाने पायी प्रवास करावा लागत आहे.